शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

जिल्ह्यात कांदा लिलाव बंद; कोट्यवधीची उलाढाल ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2021 01:28 IST

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव तसेच मार्च एण्डच्या कामामुळे लासलगावसह जिल्ह्यातील कांदा बाजारपेठेत शुक्रवारपासून (दि.२७) लिलाव बंद झाल्याने,  दररोज किमान दोन तर तीन करोड रुपयांचे व्यवहार   ठप्प होणार आहेत. सलग तीन ते चार  दिवस  लिलाव  बंद असल्याने,   करोडो रुपयांचे व्यवहार ठप्प  झाले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांसह व्यापारी, हमाल, ट्रक चालक-मालक व व्यावसायिकांचे नुकसान होणार आहे.

ठळक मुद्देऐन काढणी हंगामात बाजार समित्या बंद

लासलगाव : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव तसेच मार्च एण्डच्या कामामुळे लासलगावसह जिल्ह्यातील कांदा बाजारपेठेत शुक्रवारपासून (दि.२७) लिलाव बंद झाल्याने,  दररोज किमान दोन तर तीन करोड रुपयांचे व्यवहार   ठप्प होणार आहेत. सलग तीन ते चार  दिवस  लिलाव  बंद असल्याने,   करोडो रुपयांचे व्यवहार ठप्प  झाले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांसह व्यापारी, हमाल, ट्रक चालक-मालक व व्यावसायिकांचे नुकसान होणार आहे. धुळवड सणामुळे  लासलगावसह जिल्ह्यातील   सर्व शेतीमालाच्या लिलाव बंद राहिल्याने अर्थकारण ठप्प झाले आहे. सुमारे दीड ते दोन लाख क्विंटल विक्री होणाऱ्या या शेतीमालाचे लिलाव बंद राहिले. त्यामुळे वीस कोटींचा फटका बसला असून, विविध व्यवसाय ठप्प झाले आहेत. सलग लिलाव बंदमुळे केवळ शेतकऱ्यांचेच  नव्हे, तर व्यापारी     हमाल, मापारी, ट्रक मालक,  चालक, मालक व्यावसायिकांच्या दुकानाचे व्यवहार  ठप्प होणार आहेत. लासलगाव  ही देशातील कांद्याची सर्वात मोठी बाजारपेठ आहे. देशाच्या विविध भागांत जिल्ह्यातून कांदा निर्यात होत असो, एकट्या लासलगाव बाजार समितीत दिवसाला कांद्याची सुमारे ३० ते  ३५ हजार क्विंटल आवक होते, तर पिंपळगाव, नाशिक, दिंडोरी, कळवण विविध  बाजार समित्यांमध्ये प्रतिदिन एकूण दोन लाख हजार क्विंटल कांदा आवक होते.  मात्र, उद्या व परवा सलग दोन दिवस जिल्ह्यातील कांद्याबरोबरच शेतीमालाचे  लिलाव बंद असल्याने, कांदा पिकासह भाजीपाला याची प्रथमच कोंडी होत आहे. 

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव, मार्चअखेर केले जाणारे ऑडिट, बँकांचे बंद असणारे व्यवहार अशी करणे देत, जिल्ह्यातील सर्व बाजार समित्यांमध्ये दि. ४ एप्रिलपर्यंत व्यवहार बंद ठेवण्यात आले आहेत. काही ठिकाणी या बाजार समित्या ८ ते १० दिवस बंद राहणार आहेत. ऐन कांदा काढणी हंगामात बाजार समित्यांचे कामकाज बंद राहणार असल्याने, शेतकऱ्यांना शेतमाल विक्री करण्यात अडचणी येणार आहेत.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गत वर्षात प्रतिबंधित क्षेत्र जाहीर झाल्यानंतर अनेक ठिकाणी बाजार समिती परिसर बंद, तर पुन्हा चालू करण्याचा निर्णय घेण्यात आले होते. 

टॅग्स :NashikनाशिकAPMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीonionकांदाFarmerशेतकरी