शहरं
Join us  
Trending Stories
1
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
2
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
3
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
4
“हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का?”; भाजपाचा सवाल
5
धक्कादायक! रात्री ३ वाजता मुलीच्या खोलीत दिसले भयंकर दृश्य; वडिलांनी पाहताच पायाखालची जमीन सरकली
6
रीलस्टारलाही नॅशनल अवॉर्ड पण टीव्ही स्टार्सला नाही! स्पष्टच बोलली अनुपमा, म्हणाली- "आता स्मृती इराणींनी कमबॅक केलंय तर..."
7
"इतक्या दूरची नोकरी..."; रिक्षा चालकाने महिलेला रस्त्याच्या मध्येच सोडलं अन् विचारला प्रश्न
8
तिसऱ्या बाईच्या प्रेमासाठी दुसऱ्या पत्नीला संपवलं; नवऱ्याचं प्लॅनिंग, तान्ह्या बाळासमोर घडलं क्रूर कृत्य
9
जबरदस्त! ११३७ कोटींच्या मोहिमेसाठी सारा तेंडुलकरची निवड, सचिनच्या लेकीला मिळाली मोठी जबाबदारी
10
Baba Ramdev: "हिंदू धर्मात जन्मलेले काही लोक..." जितेंद्र आव्हांडाच्या वक्तव्यावर बाबा रामदेव यांची प्रतिक्रिया
11
मुलाची इंजिनियरिंग कॉलेजमध्ये निवड, पण फी चे पैसे जमवणे शक्य झाले नाही, हतबल पित्याने संपवलं जीवन
12
अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटातून मिळाली प्रेरणा; फुटपाथवरुन सुरू झाला प्रवास, आता बनले व्यवसाय क्षेत्रातील 'शहंशाह'
13
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
14
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
15
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
16
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
17
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
18
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य
19
Video - बँड-बाजा अन् शेवटचा निरोप! गाव रडलं पण 'तो' मित्राच्या अंत्ययात्रेत आनंदाने नाचला, कारण...
20
Lunchbox Recipe: परवलाचं चमचमीत भरीतही होऊ शकतं, कधी ट्राय केलंय का? पहा सोप्पी रेसिपी

बळीराजा मेटाकुटीला! ढगाळ वातावरणामुळे कांद्याची लाली, द्राक्षाचा गोडवा धोक्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2022 12:50 IST

येवला/मानोरी : नाशिक जिल्ह्यात शनिवारी (दि.२२) सकाळपासून अचानक पुन्हा आकाशात मोठ्या प्रमाणात ढग दाटून आल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत मोठी भर ...

येवला/मानोरी : नाशिक जिल्ह्यात शनिवारी (दि.२२) सकाळपासून अचानक पुन्हा आकाशात मोठ्या प्रमाणात ढग दाटून आल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत मोठी भर पडली आहे. निसर्गाच्या लहरीपणाचा विचित्र खेळ प्रत्येक महिन्याला बळीराजाला अनुभवायला मिळत असून कधी ढगाळ वातावरण, कधी दाट धुके तर कधी अवकाळी पावसामुळे यंदा शेतकऱ्यांच्या रब्बी हंगामातील पिकावर मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होत असल्याचे दिसून येत आहे. गहू ,हरभरा सारख्या पिकांवर माव्याचा प्रादुर्भाव झाला असून उन्हाळ कांदा लागवडीवर दाट धुके तर ढगाळ वातावरणामुळे कांदे पिवळसर पडत चालले आहेत. रब्बी हंगामातील पिके वाचवण्यासाठी शेतकऱ्यांना महागड्या दराने औषधे खरेदी करून पिकांवर फवारणी करून पिके जगविण्याची वेळ आली आहे.

येवला तालुक्यातील मानोरी बुद्रुक, देशमाने, मुखेड, जळगाव नेऊर, शिरसगाव, पिंपळगाव लेप, जऊळके आदी परिसरात अवकाळी पाऊस तसेच खराब वातावरणामुळे रोपांचे अतोनात नुकसान झाल्यानंतर नव्याने रोपे विकत घेऊन उन्हाळ कांदा लागवड करण्यात शेतकरी व्यस्त आहे; मात्र ही नव्याने केलेली कांदा लागवड ढगाळ वातावरण, दाट धुके आणि अवकाळी पावसाच्या कचाट्यात सापडली असून कांद्याचे शेंडे पिवळसर पडण्याच्या भीतीने शेतकरी वर्गाकडून औषध फवारणी केली जात असून मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका शेतकऱ्यांना बसत आहे. अनेक ठिकाणी लाल कांदा काढणीला आला असून, काही ठिकाणी सुरुवात देखील केली आहे. अशातच या अवकाळी पावसाच्या धास्तीने कांदा उत्पादक शेतकरी चांगलाच चिंतेत सापडला असल्याचे सर्वत्र दिसून आले आहे.

सतत औषध फवारणी

ढगाळ वातावरणामुळे आणि अवकाळी पावसामुळे रब्बी हंगामातील पिकांबरोबर द्राक्ष उत्पादक शेतकरी देखील पूर्णतः धास्तावला आहे. द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचा हंगाम हा अंतिम टप्प्यात आला असून पुढील काही दिवसात द्राक्ष फळ तोडणीला सुरुवात होणार आहे. वातावरणातील बदलामुळे सातत्याने औषध फवारणी करून द्राक्ष बाग जगवलेली असताना आता चांगल्या प्रकारे फळे लागली असून हवामान खात्याने यानंतर ही पुढील दोन महिन्यात ढगाळ वातावरण आणि अवकाळी पावसासह गारपिटीचा अंदाज देखील वर्तवल्याने द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची चांगलीच त्रेधा उडाली आहे.

 

टॅग्स :onionकांदाNashikनाशिक