कोणार्कनगरला एकवेळ पाणीपुरवठा
By Admin | Updated: August 24, 2016 01:27 IST2016-08-24T01:27:05+5:302016-08-24T01:27:18+5:30
नागरिकांची गैरसोय : दोन वर्षांपासून समस्या ‘जैसे थे

कोणार्कनगरला एकवेळ पाणीपुरवठा
’पंचवटी : गंगापूर धरणातील जलसाठ्यात वाढ झाल्यानंतर महापालिका प्रशासनाने शहरातील एकवेळची पाणीकपात रद्द करून सर्वत्र दोनवेळा पाणीपुरवठा सुरू केला आहे. गेल्या आठवड्यापासून सर्वत्र दोनवेळा पाणीपुरवठा करण्याची घोषणा महापौर अशोक मुर्तडक यांनी केली असली तरी आडगाव शिवारातील कोणार्कनगर परिसरात एकवेळच पाणीपुरवठा होत असल्याची तक्रार परिसरातील नागरिकांनी केली आहे. मागील दोन वर्षांपासून परिसरातील नागरिकांना पिण्याच्या पाण्याच्या समस्येला तोंड द्यावे लागत असून, पाणीकपात रद्द केल्यानंतरही एकच वेळ पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. कोणार्कनगरला दोन वेळ व पुरेशा दाबाने पाणीपुरवठा करावा, अशी मागणी कोणार्कनगर को-आॅप. हौसिंग सोसायटीतील रहिवाशांनी महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडे निवेदनाद्वारे केली आहे. (वार्ताहर)