शहरं
Join us  
Trending Stories
1
‘हिंडेनबर्ग’ने भारतीयांच्या स्वप्नांवरच घातला घाला; गौतम अदानींचं भागधारकांना पत्र, म्हणाले...
2
APMC निवडणूक घ्या, प्रशासक नियुक्ती रद्द; उच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले
3
आजचे राशीभविष्य- २५ सप्टेंबर २०२५, प्रगतीच्या संधी चालून येतील, आर्थिक लाभ होईल
4
नवी मुंबईत ‘गाेल्डन मेट्रो’चे पुढचे पाऊल; डीपीआरचे पुनरावलोकन, ३० मिनिटांत गाठा विमानतळे
5
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
6
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; अभिनेत्याची फरमाईश अन् संजनाची डायलॉगबाजी (VIDEO)
7
कुजबुज! आता पवार कुटुंब एकत्र दिसणार का?; ‘झालं गेलं गंगेला मिळू द्या, महाराष्ट्र हितासाठी...'
8
मंत्रिमंडळाऐवजी पायाभूत समितीला अंतिम अधिकार; फडणवीस सरकारनं हा निर्णय का घेतला?
9
मुंबईत दुहेरी हत्याकांड! २३ वर्षीय तरुणाने वडील, आजोबांची केली हत्या; काकांवरही केला चाकू हल्ला
10
विरोधात लिहिले की पत्रकारांचा छळ सुरू होतो; हायकाेर्टानं नोंदवलं महत्त्वपूर्ण निरीक्षण
11
"माझ्या बेडरुममध्ये ये, तुला परदेशात फिरायला घेऊन जातो"; स्वयंघोषित बाबानं केला १७ मुलींचा छळ
12
बोलघेवड्याचा बोलाचा भात...! रशिया-युक्रेन युद्धाला डोनाल्ड ट्रम्प यांच्या विधानानं नवं वळण?
13
मायबाप सरकार, फक्त कागदावर नको, बांधांवर या! निकष बाजूला सारून मदतीचा हात पुढे केला पाहिजे
14
विमानाच्या चाकातील 'त्याच्या' प्रवासाचा जीवघेणा थरार! हृदयाचा थरकाप उडवणारी एक कहाणी
15
मैदानावर क्रिकेट खेळा, खुन्नस कसली काढता?; राजकीय ‘आकां’ना आपण जाब विचारला पाहिजे
16
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
17
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
18
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
19
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
20
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ

गंगापूर धरणातून एक हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2018 00:16 IST

जीवनदायिनी गोदावरी नदीला गेल्या अनेक दिवसांपासून पाणी नसल्याने कोरडेठाक पात्र पाहणाऱ्या नाशिककरांना रविवारी दिलासा मिळाला. गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात आल्याने दुथडी भरून वाहणारी गोदावरी बघून ऐन उन्हाळ्यात थंडावा जाणवला, परंतु हा दिलासा नाशिककरांना असला तरी लाभ मात्र नगरकरांना होणार आहे. अहमदनगर जिल्ह्यातील राहाता आणि कोपरगावसाठी हे पाणी सोडण्यात आले आहे.

नाशिक : जीवनदायिनी गोदावरी नदीला गेल्या अनेक दिवसांपासून पाणी नसल्याने कोरडेठाक पात्र पाहणाऱ्या नाशिककरांना रविवारी दिलासा मिळाला. गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात आल्याने दुथडी भरून वाहणारी गोदावरी बघून ऐन उन्हाळ्यात थंडावा जाणवला, परंतु हा दिलासा नाशिककरांना असला तरी लाभ मात्र नगरकरांना होणार आहे. अहमदनगर जिल्ह्यातील राहाता आणि कोपरगावसाठी हे पाणी सोडण्यात आले आहे. गोदावरी नदीला गेल्या अनेक दिवसांपासून पाणी नसल्याने पात्र अत्यंत अस्वस्थ करणारे दिसत होते. या रामवाडी परिसरात नदी पात्र कधीही कोरडे दिसले नाही, त्या भागात नदीपात्राचे मैदान झाल्याने मुलांनी त्यावर क्रिकेटचा आनंदही लुटला, तर काही ठिकाणी नदीपात्रातील साचलेल्या पाण्यावर पाणवेली आणि अन्य वनस्पती दिसल्याने निळ्या पाण्याऐवजी चक्क हिरवे गालीचे अंथरलेले दिसत होते. नदीचे हे भीषण स्वरूप बघून नाशिककर अस्वस्थ होत होते. त्यामुळे नदीचे साचलेपण जाण्यासाठी गोदापात्र प्रवाही राहिली पाहिजे, अशी मागणीही होत होती. त्याच दरम्यान, रविवारी गोदावरी नदीला मोठ्याप्रमाणात पाणी सोडण्यात आल्याने रामकुंड परिसरात नागरिकांची धावपळ उडाली तर भरलेले नदीपात्र पाहून नागरिक आणि पर्यावरणप्रेमी मात्र सुखावले. रामनवमीच्या दिवशी गोदावरीचे स्वरूप सुखद झाल्याने रामभक्तांनाही आनंद झाला आहे. एकादशीच्या दिवशी निघणाºया रामरथाच्या वेळी या रामकुंडातच मूर्तींना स्नान घातले जाते. नदीपात्रात सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे मात्र काही प्रमाणात गोदाकाठी असलेल्या विक्रेत्यांची तारांबळ उडाली. सदरचे पाणी सोडल्यानंतर नाशिककरांना दिलासा मिळाला असला तरी मुळातच हे पाणी अहमदनगर जिल्ह्यातील राहाता आणि कोपरगाव येथील कालव्यांसाठी सोडण्यात आले असून, तेथील शेतीला त्याचा लाभ होणार आहे, असे जलसंपदा विभागाच्या वतीने सांगण्यात आले.

टॅग्स :DamधरणWaterपाणी