शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
2
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
3
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
4
Dharali floods: 43 किमी वेग... 1230 उंच डोंगरावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
5
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
6
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
7
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
8
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
9
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
10
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
11
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...
12
निळेशार डोळे असलेल्या मॉडेलचं डोनाल्ड ट्रम्प का करतायत तोंडभरून कौतुक? कारण खूपच खास
13
Vivo Y400 5G: एमोलेड डिस्प्ले, ६००० mAh बॅटरी आणि बरेच काही; विवो व्हाय ४०० भारतात लॉन्च!
14
Video - "पळ भावा पळ..."; ढिगाऱ्यात अडकलेल्या दोघांनी मृत्यूला दिला चकवा, पुरात चमत्कार
15
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
16
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
17
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
18
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
19
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
20
तयारीला लागा! उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश; मनसेसोबतच्या युतीबाबत म्हणाले...

गंगापूर धरणातून एक हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2018 00:16 IST

जीवनदायिनी गोदावरी नदीला गेल्या अनेक दिवसांपासून पाणी नसल्याने कोरडेठाक पात्र पाहणाऱ्या नाशिककरांना रविवारी दिलासा मिळाला. गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात आल्याने दुथडी भरून वाहणारी गोदावरी बघून ऐन उन्हाळ्यात थंडावा जाणवला, परंतु हा दिलासा नाशिककरांना असला तरी लाभ मात्र नगरकरांना होणार आहे. अहमदनगर जिल्ह्यातील राहाता आणि कोपरगावसाठी हे पाणी सोडण्यात आले आहे.

नाशिक : जीवनदायिनी गोदावरी नदीला गेल्या अनेक दिवसांपासून पाणी नसल्याने कोरडेठाक पात्र पाहणाऱ्या नाशिककरांना रविवारी दिलासा मिळाला. गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात आल्याने दुथडी भरून वाहणारी गोदावरी बघून ऐन उन्हाळ्यात थंडावा जाणवला, परंतु हा दिलासा नाशिककरांना असला तरी लाभ मात्र नगरकरांना होणार आहे. अहमदनगर जिल्ह्यातील राहाता आणि कोपरगावसाठी हे पाणी सोडण्यात आले आहे. गोदावरी नदीला गेल्या अनेक दिवसांपासून पाणी नसल्याने पात्र अत्यंत अस्वस्थ करणारे दिसत होते. या रामवाडी परिसरात नदी पात्र कधीही कोरडे दिसले नाही, त्या भागात नदीपात्राचे मैदान झाल्याने मुलांनी त्यावर क्रिकेटचा आनंदही लुटला, तर काही ठिकाणी नदीपात्रातील साचलेल्या पाण्यावर पाणवेली आणि अन्य वनस्पती दिसल्याने निळ्या पाण्याऐवजी चक्क हिरवे गालीचे अंथरलेले दिसत होते. नदीचे हे भीषण स्वरूप बघून नाशिककर अस्वस्थ होत होते. त्यामुळे नदीचे साचलेपण जाण्यासाठी गोदापात्र प्रवाही राहिली पाहिजे, अशी मागणीही होत होती. त्याच दरम्यान, रविवारी गोदावरी नदीला मोठ्याप्रमाणात पाणी सोडण्यात आल्याने रामकुंड परिसरात नागरिकांची धावपळ उडाली तर भरलेले नदीपात्र पाहून नागरिक आणि पर्यावरणप्रेमी मात्र सुखावले. रामनवमीच्या दिवशी गोदावरीचे स्वरूप सुखद झाल्याने रामभक्तांनाही आनंद झाला आहे. एकादशीच्या दिवशी निघणाºया रामरथाच्या वेळी या रामकुंडातच मूर्तींना स्नान घातले जाते. नदीपात्रात सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे मात्र काही प्रमाणात गोदाकाठी असलेल्या विक्रेत्यांची तारांबळ उडाली. सदरचे पाणी सोडल्यानंतर नाशिककरांना दिलासा मिळाला असला तरी मुळातच हे पाणी अहमदनगर जिल्ह्यातील राहाता आणि कोपरगाव येथील कालव्यांसाठी सोडण्यात आले असून, तेथील शेतीला त्याचा लाभ होणार आहे, असे जलसंपदा विभागाच्या वतीने सांगण्यात आले.

टॅग्स :DamधरणWaterपाणी