शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
2
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
3
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
4
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
5
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
6
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
7
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
8
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
9
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
10
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
11
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
12
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
13
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
14
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
15
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
16
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
17
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
18
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
19
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
20
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक

नाशिक विभागात दहावी, बारावीच्या उत्तरपत्रिकांचे शंभर टक्के संकलन पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2020 15:46 IST

दहावी व बारावी परीक्षांमधील उत्तर पत्रिकांची तपासणी पूर्ण झाली असून या सर्व उत्तर पत्रिकांची संकलन प्रक्रिया नाशिक विभागीय मंडळाने शंभर टक्के पूर्ण केली आहे. नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील व  जळगावातील मुक्ताईनगर, भुसावळ भागातील उत्तरपत्रिकांचे संकलनास विलंब झाला असला तरी नाशिक विभागीय मंडळाने विभागातील अन्य भागातून फिजिकल डिस्टन्स कोरोना प्रतिबंधात्मक योग्य ती उपाययोजना करून शंभर टक्के उत्तर पत्रिकांचे संकलन पूर्ण केले आहे.

ठळक मुद्देदहावी,बारावीच्या उत्तर पत्रिकांचे संकलन पूर्णमालेगावसाठी केले स्वतंत्र नियोजन नाशिक विभागीय शिक्षण मंडळाचे यश

नाशिक : कोरोनाच्या सावखाली झालेल्या दहावी व बारावी परीक्षांमधील उत्तर पत्रिकांची तपासणी पूर्ण झाली असून या सर्व उत्तर पत्रिकांची संकलन प्रक्रिया नाशिक विभागीय मंडळाने शंभर टक्के पूर्ण केली आहे.  प्रामुख्याने नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील व  जळगावातील मुक्ताईनगर, भुसावळ भागातील उत्तरपत्रिकांचे संकलनास विलंब झाला असला तरी नाशिक विभागीय मंडळाने विभागातील अन्य भागातून फिजिकल डिस्टन्स कोरोना प्रतिबंधात्मक योग्य ती उपाययोजना करून शंभर टक्के उत्तर पत्रिकांचे संकलन पूर्ण केल्याने आता निकाल तयार करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून जून अखेर अथवा जुलैच्या पहिल्या आठवड्यात निकाल जाहीर होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. कोरोनाच्या सावटात बारावीच्या परीक्षा पूर्ण झाल्यानंतर दहावीची परीक्षाही अंतिम टप्प्यात आलेली असताना शेवटचा  भुगोलाचा पेपर होण्यापूर्वीच शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दहावीची परीक्षा ३१ मार्चपर्यंत स्थगित करण्याचा निर्णय जाहीर केला व पुढे देशात कोरोनाचा कहर वाढल्याने हा पेपर रद्द करून अन्य विषयांच्या सरासरी गुणांप्रमाणे निकाल जाहीर करण्याचा निर्णय झाला.  परंतु, कोरोनाच्या संकटामुळे महाराष्ट्रात  राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे  घेण्यात येणाऱ्या दहावी, बारावी परीक्षेच्या उत्तरपत्रिका तपासण्याचे आणि त्या पुन्हा संकलित करून निकाल तयार करण्याचे आव्हान मंडळासमोर निर्माण झाले होते. लॉकडाऊनच्या काळात परीक्षक शिक्षकांना व नियामकांना घरातून बाहेर पडणे शक्य नव्हते. त्यामुळे पेपरची तपासणी पूर्ण होऊनही ते वेळेत नियमकांपर्यंत पोहोचू शकले नाही. तर नियमकांनाही त्यांना प्राप्त झालेल्या उत्तरपत्रिका विभागीय मंडळापर्यंत पोहोचविण्यात अडचणी आल्या. या काळात विभागीय मंडळाने पोलीस व जिल्हा प्रशासनाची विशेष परवानगी घेऊन उत्तर पत्रिका संकलनाचे काम पूर्ण केले.  दहावीचे सुमारे सात हजारहून अधिक परीक्षक व साडेनऊशे नियामकांसह बारावीच्या साडेसहाशे नियामक व सुमारे सहा हजार शिक्षक व विभागीय मंडळाच्या कर्मचाऱ्यांनी या प्रक्रियेत सक्रीय योगदान दिल्याने नाशिक विभागातील संपूर्ण उत्तर पत्रिकांचे संकलन पूर्ण होऊ शकले आहे. 

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रNashikनाशिकssc examदहावीSSC Resultदहावीचा निकालHSC / 12th Exam12वी परीक्षा