शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

नाशिक विभागात दहावी, बारावीच्या उत्तरपत्रिकांचे शंभर टक्के संकलन पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2020 15:46 IST

दहावी व बारावी परीक्षांमधील उत्तर पत्रिकांची तपासणी पूर्ण झाली असून या सर्व उत्तर पत्रिकांची संकलन प्रक्रिया नाशिक विभागीय मंडळाने शंभर टक्के पूर्ण केली आहे. नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील व  जळगावातील मुक्ताईनगर, भुसावळ भागातील उत्तरपत्रिकांचे संकलनास विलंब झाला असला तरी नाशिक विभागीय मंडळाने विभागातील अन्य भागातून फिजिकल डिस्टन्स कोरोना प्रतिबंधात्मक योग्य ती उपाययोजना करून शंभर टक्के उत्तर पत्रिकांचे संकलन पूर्ण केले आहे.

ठळक मुद्देदहावी,बारावीच्या उत्तर पत्रिकांचे संकलन पूर्णमालेगावसाठी केले स्वतंत्र नियोजन नाशिक विभागीय शिक्षण मंडळाचे यश

नाशिक : कोरोनाच्या सावखाली झालेल्या दहावी व बारावी परीक्षांमधील उत्तर पत्रिकांची तपासणी पूर्ण झाली असून या सर्व उत्तर पत्रिकांची संकलन प्रक्रिया नाशिक विभागीय मंडळाने शंभर टक्के पूर्ण केली आहे.  प्रामुख्याने नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील व  जळगावातील मुक्ताईनगर, भुसावळ भागातील उत्तरपत्रिकांचे संकलनास विलंब झाला असला तरी नाशिक विभागीय मंडळाने विभागातील अन्य भागातून फिजिकल डिस्टन्स कोरोना प्रतिबंधात्मक योग्य ती उपाययोजना करून शंभर टक्के उत्तर पत्रिकांचे संकलन पूर्ण केल्याने आता निकाल तयार करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून जून अखेर अथवा जुलैच्या पहिल्या आठवड्यात निकाल जाहीर होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. कोरोनाच्या सावटात बारावीच्या परीक्षा पूर्ण झाल्यानंतर दहावीची परीक्षाही अंतिम टप्प्यात आलेली असताना शेवटचा  भुगोलाचा पेपर होण्यापूर्वीच शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दहावीची परीक्षा ३१ मार्चपर्यंत स्थगित करण्याचा निर्णय जाहीर केला व पुढे देशात कोरोनाचा कहर वाढल्याने हा पेपर रद्द करून अन्य विषयांच्या सरासरी गुणांप्रमाणे निकाल जाहीर करण्याचा निर्णय झाला.  परंतु, कोरोनाच्या संकटामुळे महाराष्ट्रात  राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे  घेण्यात येणाऱ्या दहावी, बारावी परीक्षेच्या उत्तरपत्रिका तपासण्याचे आणि त्या पुन्हा संकलित करून निकाल तयार करण्याचे आव्हान मंडळासमोर निर्माण झाले होते. लॉकडाऊनच्या काळात परीक्षक शिक्षकांना व नियामकांना घरातून बाहेर पडणे शक्य नव्हते. त्यामुळे पेपरची तपासणी पूर्ण होऊनही ते वेळेत नियमकांपर्यंत पोहोचू शकले नाही. तर नियमकांनाही त्यांना प्राप्त झालेल्या उत्तरपत्रिका विभागीय मंडळापर्यंत पोहोचविण्यात अडचणी आल्या. या काळात विभागीय मंडळाने पोलीस व जिल्हा प्रशासनाची विशेष परवानगी घेऊन उत्तर पत्रिका संकलनाचे काम पूर्ण केले.  दहावीचे सुमारे सात हजारहून अधिक परीक्षक व साडेनऊशे नियामकांसह बारावीच्या साडेसहाशे नियामक व सुमारे सहा हजार शिक्षक व विभागीय मंडळाच्या कर्मचाऱ्यांनी या प्रक्रियेत सक्रीय योगदान दिल्याने नाशिक विभागातील संपूर्ण उत्तर पत्रिकांचे संकलन पूर्ण होऊ शकले आहे. 

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रNashikनाशिकssc examदहावीSSC Resultदहावीचा निकालHSC / 12th Exam12वी परीक्षा