शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
2
अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
3
'कॉन्फिगरेशन एरर'मुळे २४१ लोकांचा मृत्यू ?; अहमदाबाद विमान अपघातामागील हे मोठे कारण असू शकते
4
राजाच्या हत्येनंतर आणखी एक टार्गेट, ज्याची हत्या करणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहचा नवा खुलासा
5
Air India Plane Crash: बोइंग विमानांचे ६ हजाराहून अधिक अपघात, तरीही १५० देश का खरेदी करतात?; इंजिनिअरचा खुलासा
6
बोइंगने घेतलेले शॉर्टकट पडले महागात, ड्रीमलाइनरवरील संशय वाढला; अमेरिकी माध्यमांत होतेय कंपनीच्या त्रुटींवर चर्चा; यापूर्वी देण्यात आले होते चौकशीचे आदेश
7
आमची मुलगी सोनमपेक्षा कमी नाही! जावयाच्या जीवाची भीती व्यक्त करत आईनेच गाठलं पोलीस स्टेशन! म्हणाली... 
8
Ahmedabad Plane Crash: त्यावेळी नेमकं काय घडलं असावं?
9
Gold Price 13 June: १ लाखांच्या पार पोहोचला सोन्याचा दर; Israel-Iran संघर्षामुळे वाढल्या किंमती, पाहा लेटेस्ट रेट्स
10
Viral Video: समुद्रकिनाऱ्यावर तरुणी काढत होती सेल्फी, तितक्यात मोठी लाट आली अन्...; व्हिडीओ व्हायरल
11
Accident: अग्निशामक दलाच्या गाडीने सहा जणांना चिरडले, बाप-लेकासह तिघे जागीच ठार, लेक वाचली
12
सांगलीतील लाच प्रकरणी आयएएस अधिकारी शुभम गुप्तांच्या अडचणी वाढल्या; आणखी कारनामे उघडकीस
13
एअर इंडियाच्या विमानाला अपघात का झाला? कारण ६ महिन्यांनी कळणार
14
WTC मध्ये राडा! हाताने चेंडूने जमिनीवर टाकला तरीही फलंदाज नाबाद; ऑस्ट्रेलिया टीम हैराण, नियम काय?
15
Air India Flight Emergency Landing : Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
16
पुण्याला मुसळधार पावसाने झोडपले; सिंहगड रोडवरील नाल्यात ज्येष्ठ महिला वाहून गेली
17
Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू 
18
तीन लग्न, ४ मुलं, करिश्मा कपूरच्या एक्स पती किती होता श्रीमंत?, मागे सोडली इतकी संपत्ती
19
विमान, वेग अन् विनाश : हे आहेत जगभरातील आतापर्यंतचे सर्वात मोठे विमान अपघात
20
Nandita Mahtani : रणबीर कपूरला केलं डेट, विराट कोहलीशीही कनेक्शन; संजय कपूरची पहिली पत्नी कोण?

मुंबईपासून ‘ओखी’ ६७० कि.मीवर : नाशिकच्या किमान तपमानाचा पारा थेट १६.१ अंशावर; ‘ओखी’ वादळाचा परिणाम

By azhar.sheikh | Updated: December 4, 2017 16:22 IST

पश्चिम भागात पावसाची शक्यता असून उत्तर महाराष्ट्रत ढगाळ हवामान काही दिवस राहणार असून थंडी गायब झाल्याचा अनुभव नागरिकांना येऊ शकतोढगाळ हवामानामुळे किमान तपमानात वाढ होत असून दक्षिण भारताला तडाखा दिलेल्या ‘ओखी’ वादळाचा हा परिणाम असण्याची शक्यता हवामान निरिक्षण केंद्राकडून वर्तविली जात आहे.

ठळक मुद्देओखी वादळ मुंबईपासून अवघ्या ६७० किलोमीटरओखी वादळ गुजरातच्या दिशेने सरकत असल्याचे पुणे वेधशाळेचे निरिक्षण पश्चिम भागात पावसाची शक्यता असून उत्तर महाराष्ट्रात ढगाळ हवामान

नाशिक : मागील दोन दिवसांपासून नाशिकच्या किमान तपमानाचा पारा अचानकपणे वेगाने वाढत असल्याने शहरातून थंडी गायब झाल्याचा अनुभव नाशिककरांना येऊ लागला आहे; मात्र ढगाळ हवामान झाल्यामुळे दिनकराचे दर्शनही याबरोबर दुर्लभ झाले आहे. १०.२ अंशापर्यंत घसरलेला किमान तपमानाचा पारा थेट १६.१ अंशावर पोहचला आहे. मागील दोन दिवसांमध्ये सहा अंशाने ही वाढ झाल्याचे निरिक्षण हवामान खात्याच्या निरिक्षण केंद्राने नोंदविले. ओखी वादळ मुंबईपासून अवघ्या ६७० किलोमीटर अंतरावर असून वादळ पुढे गुजरातच्या दिशेने सरकत असल्याचे पुणे वेधशाळेचे म्हणणे आहे. यामुळे पश्चिम भागात पावसाची शक्यता असून उत्तर महाराष्ट्रत ढगाळ हवामान काही दिवस राहणार असून थंडी गायब झाल्याचा अनुभव नागरिकांना येऊ शकतोढगाळ हवामानामुळे किमान तपमानात वाढ होत असून दक्षिण भारताला तडाखा दिलेल्या ‘ओखी’ वादळाचा हा परिणाम असण्याची शक्यता हवामान निरिक्षण केंद्राकडून वर्तविली जात आहे. कारण दोन दिवसांपुर्वी शहराचे हवामान उत्तम होते. थंडीची तीव्रताही जाणवत होती आणि सुर्यप्रकाशही पडत होता; मात्र अचानकपणे रविवारपासून वातावरणात कमालीचा बदल होऊन ढग दाटण्यास सुरुवात झाली. सोमवारी (दि.४) पहाटेपासून थंडीचा कडाका कमी झाला होता. १६.१ इतके जास्त किमान तपमान नोंदविले गेले.

गेल्या वर्षी मात्र डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात कडाक्याची थंडी होती. काही दिवसांपुर्वी सातत्याने घसरत असलेला किमान तपमानाचा पारा लक्षात घेता डिसेंबरचा पहिला आठवडा हा क डाक्याच्या थंडीचा असू शकतो असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविला गेला होता; मात्र अचाकपणे लहरी निसर्गाने आपले रुप बदलले असून दोन दिवसांपासून कमालीचे ढग दाटत असल्याने हवामानात आर्द्रता वाढू लागल्याने किमान तपमानात वाढ होत आहे.

भारताच्या दक्षिण किनारपट्टीवर धडकलेल्या ‘ओखी’ वादळाचे थैमानाने ३५ बळी घेतले आहेत. ताशी १३० कि. मी वेगाने हे वादळ लक्षद्वीपवर आदळले. तामिळनाडू, केरळ या राज्यांना ‘ओखी’ ने जबर तडाखा दिला असून पुढे हे वादळ गुजरातच्या दिशेने सरकण्याचा इशाराही हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.

टॅग्स :Ockhi Cycloneओखी चक्रीवादळGujaratगुजरातMumbaiमुंबईRainपाऊसNashikनाशिक