शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
2
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
3
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
4
पिंपरी-चिंचवडमध्ये ठाकरेंची 'मशाल' विझली; शहराध्यक्ष संजोग वाघेरेंचा राजीनामा; भाजपमध्ये प्रवेश निश्चित
5
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
6
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
7
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
8
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
9
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
10
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
11
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
12
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
13
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
14
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
15
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
16
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
17
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
18
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
19
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
20
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
Daily Top 2Weekly Top 5

इगतपुरीत संततधार ; भात शेती पाण्याखाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2019 19:03 IST

घोटी : इगतपुरी तालुक्याच्या सर्व भागात शनिवारी दिवसभर पावसाची धो-धो सुरूच आहे. धरणांतील पाणीसाठा धोक्याच्या पातळीपर्यंत गेल्याने विसर्ग सुरू ...

ठळक मुद्देधरणे ओव्हरफ्लो, पर्यटकांना धरण भागात जाण्यास मज्जाव

घोटी : इगतपुरी तालुक्याच्या सर्व भागात शनिवारी दिवसभर पावसाची धो-धो सुरूच आहे. धरणांतील पाणीसाठा धोक्याच्या पातळीपर्यंत गेल्याने विसर्ग सुरू करण्यात आला आहे. भाम, भावली, दारणा, वाकी खापरी धरण परिसरात जाण्यासाठी पर्यटकांना मज्जाव करण्यात आला आहे. धोकादायक पुलांवरून वाहतूक थांबविण्यात आली असून, प्रशासन आणि पोलीस यंत्रणेला सतर्कता राखण्यास सांगण्यात आले आहे.भाताच्या जमिनीत मोठ्या प्रमाणावर पाणी साठल्याने शेतांना नद्यांचे स्वरूप आले आहे. भातशेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या जमिनीचे पंचनामे करून नुकसानभरपाई देण्याची मागणी गोंदे दुमालाचे सरपंच गणपत जाधव यांनी केली आहे. इगतपुरी-त्र्यंबकेश्वरचे प्रांताधिकारी राहुल पाटील यांनी आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा आणि पोलिसांना सूक्ष्म लक्ष ठेवण्याच्या सूचना केल्या आहेत. तहसीलदार वंदना खरमाळे-मांडगे यांच्या देखरेखीखाली तालुक्यातील घटनांवर लक्ष ठेवले जात आहे.तालुक्यात १२ तासांत २२१ मिमी पाऊस पडला असून, संततधार सुरूच आहे. आतापर्यंत पडलेल्या ३०५२ मिमी पावसाने नद्या, नाले, धरणे भरली आहेत. शनिवार अखेर ९१.७९ टक्के पाऊस नोंदविला गेला आहे. कोणत्याही क्षणी इगतपुरी तालुक्यात पाऊस शंभरी गाठण्याची शक्यता वाढली आहे. परिणामी जनजीवन पूर्णपणे ठप्प झाले आहे. अनेक रस्त्यांवरील पुलांवर पाणी आल्यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. धरणाकडे जाणाºया मार्गावरील वाहतूक आणि पर्यटकांची वाहने पोलिसांकडून वळविण्यात आली आहे. पावसाने झोडपून काढल्यामुळे ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाणी साचून राहिले आहे. काही ठिकाणी झाडे पडल्याचे समजते आहे. अतिपावसामुळे रस्त्यांची अवस्था केविलवाणी झाली आहे. शेतीची कामे थंडावलीसंपूर्ण इगतपुरी तालुक्यातील बहुतांशी भातशेती पाण्याखाली गेली आहे. शेतांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचले असून वाहत आहे. यामुळे भाताच्या लागवडीवर दुष्परिणाम झाला आहे. काही गावांमध्ये वाहत्या पाण्यामुळे भात पीक वाहून गेले आहे. त्यामुळे भाताची रोपे नव्याने मिळविण्यासाठी शेतकऱ्यांना आटापिटा करावा लागेल.अपर वैतरणा धरण ओव्हरफ्लोमुंबईला पाणीपुरवठा करणारे सर्वात महत्त्वाचे अपर वैतरणा धरण शनिवार अखेर ओव्हरफ्लो झाले. धरणाचे पाचही दरवाजे तीन फुटाने उघडण्यात आले असून, ९२०० क्युसेसने विसर्ग सुरू करण्यात आला आहे. मुंबईकरांना अपर वैतरणा धरण भरल्यामुळे दिलासा मिळाला असून, मुंबईकरांचा पाणीप्रश्न मिटणार आहे.इतिहासामध्ये अपर वैतरणा धरण बांधल्यापासून प्रथमच धरणातील पाणीसाठा मृतसाठ्याजवळ गेला होता. दरम्यान, धरण गतवर्षी भरणार की नाही अशी चर्चा रंगू लागली होती; मात्र धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस झाल्याने शनिवार अखेर धरण भरल्याने मुंबईकरांसह धरण परिसरातील शेतकºयांना दिलासा मिळाला आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या चोवीस तासांपासून संततधार सुरू असल्याने धरणाचा पाणीसाठा वेगाने वाढत आहे. वैतरणा धरणाचे पाचही दरवाजे उघडून विसर्ग सुरू झाल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नदीला पुराचे स्वरूप प्राप्त झाले आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरूच असल्याने धरणामधून विसर्ग वाढविण्यात येऊ शकतो, असे प्रशासनाने सांगितले.———————————————-गोंदे दुमाला आणि तालुक्याच्या अनेक भागातील शेतकरी अतिपावसामुळे नुकसानग्रस्त झाले आहे. प्रशासनाने नुकसानग्रस्त शेतांचे पंचनामे करून शेतकºयांना नुकसानभरपाई देण्याची कार्यवाही करणे आवश्यक आहे.- गणपत जाधव, सरपंच गोंदे दुमाला——————————————पाणी वाहत असल्यास वाहने पाण्यात घालू नये. पर्यटकांना वाहत्या पाणी परिसरात बंदी करण्यात आली आहे. विजेच्या खांबांना आणि उपकरणांना स्पर्श करू नये. धुक्यात वाहनांचे लाइट आणि इंडिकेटर सुरू करावे. आपत्कालीन प्रसंगासाठी तालुका प्रशासन सज्ज आहे. नागरिकांनी घाबरून न जाता प्रशासनाची मदत घ्यावी.- वंदना खरमाळे-मांडगे, तहसीलदार इगतपुरी————————

टॅग्स :NashikनाशिकfloodपूरFarmerशेतकरीagricultureशेती