शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
2
'ऑपरेशन सिंदूरद्वारे विस्फोट पाकिस्तानात, अन् झोप उडाली काँग्रेसची', पीएम मोदींचा घणाघात...
3
IND vs AUS : वॉशिंग्टनची अति 'सुंदर' बॅटिंग! विक्रमी विजयासह टीम इंडियानं केली ऑस्ट्रेलियाची बरोबरी
4
सरकारी निवासस्थानी प्रेयसीसोबत झोपले होते अधिकारी, पत्नीने रंगेहात पकडले आणि घरात कोंडले, त्यानंतर... 
5
शिंदेसेना म्हणजे दिल्या भाकरीचे अन् सांगितल्या कामाचे; अंबादास दानवेंची खरमरीत टीका
6
'सरकारने SIT ची घोषणा केली, पण नियुक्तीच नाही'; सुषमा अंधारे फलटण पोलीस ठाण्यात जाऊन विचारणार जाब
7
लोअर बर्थ आरक्षणाचे नियम बदलले! 'या' प्रवाशांना मिळणार प्राधान्य; बसणे-झोपण्याच्या वेळेतही बदल
8
IND vs SA Womens World Cup 2025 Final :आफ्रिकेनं जिंकला टॉस, फायनल जिंकण्यासाठी टीम इंडिया सेट करणार टार्गेट
9
Crime: पोलिसांनी गाडी थांबवली, माजी आमदार म्हणाले,"कागदपत्रे नाहीत, गाडीही चोरीची!"
10
"दिल्लीमध्ये बसून गणित करणाऱ्यांनी येऊन बघावं, हवा कोणत्या दिशेची आहे?"; PM मोदींकडून बिहारच्या जनतेला मोठी आश्वासनं
11
'गाझा' नंतर आता इस्रायलची नजर या मुस्लिम देशावर, भयंकर हल्ला करण्याची धमकी
12
Rahul Gandhi : राहुल गांधींनी मासे पकडण्यासाठी तलावात मारली उडी अन्...; Video तुफान व्हायरल
13
टीनएजर्ससाठी अलर्ट! सुंदर दिसण्याची हौस भलतीच महागात; 'स्किनकेअर'ची क्रेझ धोकादायक
14
IND vs AUS : टिम डेविडची वादळी खेळी! पठ्ठ्यानं मोडला सूर्या दादाचा मोठा विक्रम
15
कामगाराच्या खात्यात चुकून आले ₹८७,०००००, त्याने बोनस म्हणून उडवले, बॉसवर आली डोक्यावर हात मारण्याची वेळ 
16
iPhone 16: आयफोन १६ प्लसच्या खरेदीवर २५००० रुपये वाचवा; कुठं मिळतोय इतका स्वस्त?
17
६० का लगता नही कहीं से! अक्षय कुमारच्या शाहरुखला हटके शुभेच्छा; म्हणाला, "शकल से ४०..."
18
"56 इंचाची छाती असून, अमेरिकेपुढे झुकतात", राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर निशाणा
19
युक्रेनकडून रशियावर भीषण ड्रोनहल्ला, तुआप्से बंदरात घडवला मोठा विध्वंस, ऑईल टर्मिलन जळाले  
20
PM किसानचा २१वा हप्ता कधी येणार? मोठी अपडेट समोर! 'या' शेतकऱ्यांना मिळणार नाहीत २००० रुपये

इगतपुरीत संततधार ; भात शेती पाण्याखाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2019 19:03 IST

घोटी : इगतपुरी तालुक्याच्या सर्व भागात शनिवारी दिवसभर पावसाची धो-धो सुरूच आहे. धरणांतील पाणीसाठा धोक्याच्या पातळीपर्यंत गेल्याने विसर्ग सुरू ...

ठळक मुद्देधरणे ओव्हरफ्लो, पर्यटकांना धरण भागात जाण्यास मज्जाव

घोटी : इगतपुरी तालुक्याच्या सर्व भागात शनिवारी दिवसभर पावसाची धो-धो सुरूच आहे. धरणांतील पाणीसाठा धोक्याच्या पातळीपर्यंत गेल्याने विसर्ग सुरू करण्यात आला आहे. भाम, भावली, दारणा, वाकी खापरी धरण परिसरात जाण्यासाठी पर्यटकांना मज्जाव करण्यात आला आहे. धोकादायक पुलांवरून वाहतूक थांबविण्यात आली असून, प्रशासन आणि पोलीस यंत्रणेला सतर्कता राखण्यास सांगण्यात आले आहे.भाताच्या जमिनीत मोठ्या प्रमाणावर पाणी साठल्याने शेतांना नद्यांचे स्वरूप आले आहे. भातशेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या जमिनीचे पंचनामे करून नुकसानभरपाई देण्याची मागणी गोंदे दुमालाचे सरपंच गणपत जाधव यांनी केली आहे. इगतपुरी-त्र्यंबकेश्वरचे प्रांताधिकारी राहुल पाटील यांनी आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा आणि पोलिसांना सूक्ष्म लक्ष ठेवण्याच्या सूचना केल्या आहेत. तहसीलदार वंदना खरमाळे-मांडगे यांच्या देखरेखीखाली तालुक्यातील घटनांवर लक्ष ठेवले जात आहे.तालुक्यात १२ तासांत २२१ मिमी पाऊस पडला असून, संततधार सुरूच आहे. आतापर्यंत पडलेल्या ३०५२ मिमी पावसाने नद्या, नाले, धरणे भरली आहेत. शनिवार अखेर ९१.७९ टक्के पाऊस नोंदविला गेला आहे. कोणत्याही क्षणी इगतपुरी तालुक्यात पाऊस शंभरी गाठण्याची शक्यता वाढली आहे. परिणामी जनजीवन पूर्णपणे ठप्प झाले आहे. अनेक रस्त्यांवरील पुलांवर पाणी आल्यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. धरणाकडे जाणाºया मार्गावरील वाहतूक आणि पर्यटकांची वाहने पोलिसांकडून वळविण्यात आली आहे. पावसाने झोडपून काढल्यामुळे ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाणी साचून राहिले आहे. काही ठिकाणी झाडे पडल्याचे समजते आहे. अतिपावसामुळे रस्त्यांची अवस्था केविलवाणी झाली आहे. शेतीची कामे थंडावलीसंपूर्ण इगतपुरी तालुक्यातील बहुतांशी भातशेती पाण्याखाली गेली आहे. शेतांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचले असून वाहत आहे. यामुळे भाताच्या लागवडीवर दुष्परिणाम झाला आहे. काही गावांमध्ये वाहत्या पाण्यामुळे भात पीक वाहून गेले आहे. त्यामुळे भाताची रोपे नव्याने मिळविण्यासाठी शेतकऱ्यांना आटापिटा करावा लागेल.अपर वैतरणा धरण ओव्हरफ्लोमुंबईला पाणीपुरवठा करणारे सर्वात महत्त्वाचे अपर वैतरणा धरण शनिवार अखेर ओव्हरफ्लो झाले. धरणाचे पाचही दरवाजे तीन फुटाने उघडण्यात आले असून, ९२०० क्युसेसने विसर्ग सुरू करण्यात आला आहे. मुंबईकरांना अपर वैतरणा धरण भरल्यामुळे दिलासा मिळाला असून, मुंबईकरांचा पाणीप्रश्न मिटणार आहे.इतिहासामध्ये अपर वैतरणा धरण बांधल्यापासून प्रथमच धरणातील पाणीसाठा मृतसाठ्याजवळ गेला होता. दरम्यान, धरण गतवर्षी भरणार की नाही अशी चर्चा रंगू लागली होती; मात्र धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस झाल्याने शनिवार अखेर धरण भरल्याने मुंबईकरांसह धरण परिसरातील शेतकºयांना दिलासा मिळाला आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या चोवीस तासांपासून संततधार सुरू असल्याने धरणाचा पाणीसाठा वेगाने वाढत आहे. वैतरणा धरणाचे पाचही दरवाजे उघडून विसर्ग सुरू झाल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नदीला पुराचे स्वरूप प्राप्त झाले आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरूच असल्याने धरणामधून विसर्ग वाढविण्यात येऊ शकतो, असे प्रशासनाने सांगितले.———————————————-गोंदे दुमाला आणि तालुक्याच्या अनेक भागातील शेतकरी अतिपावसामुळे नुकसानग्रस्त झाले आहे. प्रशासनाने नुकसानग्रस्त शेतांचे पंचनामे करून शेतकºयांना नुकसानभरपाई देण्याची कार्यवाही करणे आवश्यक आहे.- गणपत जाधव, सरपंच गोंदे दुमाला——————————————पाणी वाहत असल्यास वाहने पाण्यात घालू नये. पर्यटकांना वाहत्या पाणी परिसरात बंदी करण्यात आली आहे. विजेच्या खांबांना आणि उपकरणांना स्पर्श करू नये. धुक्यात वाहनांचे लाइट आणि इंडिकेटर सुरू करावे. आपत्कालीन प्रसंगासाठी तालुका प्रशासन सज्ज आहे. नागरिकांनी घाबरून न जाता प्रशासनाची मदत घ्यावी.- वंदना खरमाळे-मांडगे, तहसीलदार इगतपुरी————————

टॅग्स :NashikनाशिकfloodपूरFarmerशेतकरीagricultureशेती