शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Election 2026: "राज ठाकरेंची भाषणं भारी, पण कामाच्या नावानं पाटी कोरी" असं कुणी म्हटलं? 
2
भाईंदरमध्ये आचार संहितेचा भंग, आठ दिवसानंतर गुन्हा दाखल, लोकमतच्या बातमीचा इम्पॅक्ट!
3
Pakistan Accident: पाकिस्तानमध्ये भीषण अपघात; खेळाडूंना घेऊन जाणाऱ्या बसची व्हॅनला धडक, १५ जणांचा मृत्यू
4
'लोकपाल'साठी आता ५ कोटी रुपयांच्या बीएमडब्ल्यू कार खरेदी केल्या जाणार नाहीत; निविदा केल्या रद्द
5
Nagpur: सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणाऱ्यांना महापालिकेचा दणका; एकाच दिवसात ४४ जणांवर कारवाई!
6
Google: नव्या वर्षात गुगल पिक्सेल १० खरेदी करा आणखी स्वस्तात; फ्लिपकार्टची जबरदस्त ऑफर्स!
7
"उत्तर भारतीयांना मारहाण करणाऱ्यांना अटक करा, नाहीतर..."; शिंदेसेनेचे नेते संजय निरुपमांचा इशारा
8
Nagpur: पूर्व नागपुरात ‘तूतू-मैमै’, खोपडे पिता-पुत्र आमदार वंजारींवर बरसले
9
इराणमध्ये लोक रस्त्यावर उतरले, सुरक्षा जवानांसोबत झटापट; काही जण दगावले, नेमकं काय घडले?
10
दुर्गापूजा, जन्माष्टमी, सरस्वती पूजन... सगळ्या सुट्या रद्द ! बांग्लादेशमध्ये हिंदूंवर आघात
11
Switzerland Blast: स्वित्झर्लंडमधील बारमधील स्फोट, दहशतवादी हल्ला की आणखी काही? पोलिसांनी केला मोठा खुलासा; आतापर्यंत १२ जणांचा मृत्यू
12
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील सिद्धीविनायकाचे घेतले दर्शन, पाहा फोटो
13
रोहित–विराटच्या निवृत्तीनंतर वनडे क्रिकेटच संपणार? अश्विन म्हणाला, FIFA फॉर्म्युलाच ठरेल 'तारणहार'
14
विरोधकांचे अर्ज ठरवून बाद करायचे आणि महायुतीचे बिनविरोध विजयी करायचे हे षडयंत्र, मनसेचा आरोप
15
Viral Video: स्टेडियमला पोहोचण्यासाठी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंवर आली टॅक्सीला धक्का मारण्याची वेळ
16
Jammu and Kashmir Champions League: भारतीय क्रिकेटपटूच्या हेल्मेटवर पॅलेस्टिनी ध्वज, पोलिसांनी चौकशीसाठी बोलावलं, कोण आहे तो?
17
बांगलादेशमध्ये आणखी एका हिंदू व्यक्तीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न, पेट्रोल टाकून केला हल्ला
18
तेजस्वी घोसाळकरांविरोधात मैत्रीणच रिंगणात! उद्धव ठाकरेंनी 'या' महिलेला दिली उमेदवारी 
19
Ahilyanagar: मनसेच्या दोन उमेदवारांचे अपहरण? पक्षाची कोतवाली पोलीस ठाण्यात धाव!
20
सावधान! फास्ट फूड बेतलं जीवावर; बर्गर, नूडल्स खाणाऱ्या विद्यार्थिनीचा मेंदूत २० गाठी झाल्याने मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

कार्यालयातील लग्न सोहळे आता शेतामध्ये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 00:18 IST

चांदोरी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विवाह सोहळ्यासाठी बंधने आहेत. यामुळे ग्रामीण भागात लग्नासाठी मंगल कार्यालाऐवजी शेतीतच विवाह सोहळा करण्यास पसंती दिली जात आहे. ग्रामीण भागातील अनेक विवाह सोहळे शासनाचे नियम पाळत शेतीमध्ये होताना दिसत आहेत.

ठळक मुद्देगुलाबाचे फुलऐवजी आलेल्यांना मास्क व अक्षता

चांदोरी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विवाह सोहळ्यासाठी बंधने आहेत. यामुळे ग्रामीण भागात लग्नासाठी मंगल कार्यालाऐवजी शेतीतच विवाह सोहळा करण्यास पसंती दिली जात आहे. ग्रामीण भागातील अनेक विवाह सोहळे शासनाचे नियम पाळत शेतीमध्ये होताना दिसत आहेत.राज्यात लॉकडाऊन लागल्यानंतर विवाह सोहळ्यासाठी शासनाने कडक निर्बंध घालून दिल्याने विवाह सोहळे कमीत कमी लोकांमध्ये व कमी वेळात साजरे करावे लागत आहेत. जिल्ह्यात ग्रामीण भागात मात्र विवाहाचे मुहूर्त साधत साध्या पद्धतीने आपल्या शेतात छोटासा मंडप टाकून विवाह सोहळे होताना दिसत आहे.यामुळे खर्चाला मोठा आळा, तसेच मोजक्याच मंडळींच्या उपस्थित, कमी गर्दी असल्याने यासाठी वेगळी उपाय योजना करण्याची गरज भासत नाही. विवाह समारंभ निश्चितच करूनदिलेली संख्या थोडी वाढली तरी चालते असेही बोलले जात आहे.त्यामुळे हा शेतातील सोहळ्याचा पर्याय वर-वधूकडील मंडळी निवडत असल्याचे पाहावयास मिळत आहे. विवाह समारंभाबाबत अनेकांच्या इच्छा अपेक्षा असतात. सोहळा थाटामाटात संपन्न व्हावा, जेवढी वऱ्हाडी मंडळींची उपस्थिती तेवढे मोठे लग्न म्हणून पत्रिका, मूळ पत्रिका हजारोंनी दिल्या जायच्या. जेवणावळी उठायच्या. त्यासाठी वेगवेगळे मेनू तयार करायचे. परंतु आताच्या काळात हे सगळं स्वप्नवत झाले आहे.अत्तराऐवजी सॅनिटायझर तर फुलांऐवजी मास्कअगोदर विवाह सोहळ्याप्रसंगी आलेल्या पाहुण्यांचे अत्तर वा सुगंधी पाणी मारून स्वागत करायचे. आता मात्र त्याची जागा सॅनिटायझरने घेतली असून पाहुण्यांना हातावर सॅनिटायझर दिले जाते.मंडपात प्रवेश करताना गुलाबाचे फुल आणि अक्षता दिल्या जायच्या. आता त्याऐवजी आलेल्यांना मास्क व अक्षता दिल्या जात असल्याचे विवाह सोहळ्याचे हे नवे रूप पाहावयास मिळत आहे.शेतातील आखाड्यावर स्वयंपाकशेतात एक छोटासा मंडप, आजूबाजूला असलेली झाडांची सावली. तिथेच पत्र्याच्या शेडमध्ये अथवा शेतातील आखाड्यावर स्वयंपाक होत आहे. आलेली पाहुणे मंडळी शेतात सावलीसाठी झाडांचा आसरा घेत त्याचा वेगळा आनंद उपमोगतआहेत.

कार्यालयातील लग्न सोहळे आता शेतातचांदोरी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विवाह सोहळ्यासाठी बंधने आहेत. यामुळे ग्रामीण भागात लग्नासाठी मंगल कार्यालयाऐवजी शेतातच विवाह सोहळा उरकण्यास पसंती दिली जात आहे. ग्रामीण भागातील अनेक विवाह सोहळे शासनाचे नियम पाळत शेतीमध्ये होताना दिसत आहेत.शासनाने कडक निर्बंध घालून दिल्याने विवाह सोहळे कमीत कमी लोकांमध्ये व कमी वेळात साजरे करावे लागत आहेत. जिल्ह्यात ग्रामीण भागात मात्र विवाहाचे मुहूर्त साधत साध्या पद्धतीने आपल्या शेतातच छोटासा मंडप टाकून विवाह सोहळे होताना दिसत आहे. अगोदर विवाह सोहळ्याप्रसंगी आलेल्या पाहुण्यांचे अत्तर वा सुगंधी पाणी मारून स्वागत करायचे. आता मात्र त्याची जागा सॅनिटायझरने घेतली असून पाहुण्यांना हातावर सॅनिटायझर दिले जाते. मंडपात प्रवेश करताना गुलाबाचे फुल आणि अक्षता दिल्या जायच्या. आता त्याऐवजी आलेल्यांना मास्क व अक्षता दिल्या जात असल्याचे विवाह सोहळ्याचे हे नवे रूप पाहावयास मिळत आहे.शेतातील आखाड्यावर स्वयंपाकशेतात एक छोटासा मंडप, आजूबाजूला असलेली झाडांची सावली. तिथेच पत्र्याच्या शेडमध्ये अथवा शेतातील आखाड्यावर स्वयंपाक होत आहे. आलेली पाहुणे मंडळी शेतात सावलीसाठी झाडांचा आसरा घेत त्याचा वेगळा आनंद उपभोगत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

टॅग्स :marriageलग्नagricultureशेती