शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

कार्यालयातील लग्न सोहळे आता शेतामध्ये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 00:18 IST

चांदोरी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विवाह सोहळ्यासाठी बंधने आहेत. यामुळे ग्रामीण भागात लग्नासाठी मंगल कार्यालाऐवजी शेतीतच विवाह सोहळा करण्यास पसंती दिली जात आहे. ग्रामीण भागातील अनेक विवाह सोहळे शासनाचे नियम पाळत शेतीमध्ये होताना दिसत आहेत.

ठळक मुद्देगुलाबाचे फुलऐवजी आलेल्यांना मास्क व अक्षता

चांदोरी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विवाह सोहळ्यासाठी बंधने आहेत. यामुळे ग्रामीण भागात लग्नासाठी मंगल कार्यालाऐवजी शेतीतच विवाह सोहळा करण्यास पसंती दिली जात आहे. ग्रामीण भागातील अनेक विवाह सोहळे शासनाचे नियम पाळत शेतीमध्ये होताना दिसत आहेत.राज्यात लॉकडाऊन लागल्यानंतर विवाह सोहळ्यासाठी शासनाने कडक निर्बंध घालून दिल्याने विवाह सोहळे कमीत कमी लोकांमध्ये व कमी वेळात साजरे करावे लागत आहेत. जिल्ह्यात ग्रामीण भागात मात्र विवाहाचे मुहूर्त साधत साध्या पद्धतीने आपल्या शेतात छोटासा मंडप टाकून विवाह सोहळे होताना दिसत आहे.यामुळे खर्चाला मोठा आळा, तसेच मोजक्याच मंडळींच्या उपस्थित, कमी गर्दी असल्याने यासाठी वेगळी उपाय योजना करण्याची गरज भासत नाही. विवाह समारंभ निश्चितच करूनदिलेली संख्या थोडी वाढली तरी चालते असेही बोलले जात आहे.त्यामुळे हा शेतातील सोहळ्याचा पर्याय वर-वधूकडील मंडळी निवडत असल्याचे पाहावयास मिळत आहे. विवाह समारंभाबाबत अनेकांच्या इच्छा अपेक्षा असतात. सोहळा थाटामाटात संपन्न व्हावा, जेवढी वऱ्हाडी मंडळींची उपस्थिती तेवढे मोठे लग्न म्हणून पत्रिका, मूळ पत्रिका हजारोंनी दिल्या जायच्या. जेवणावळी उठायच्या. त्यासाठी वेगवेगळे मेनू तयार करायचे. परंतु आताच्या काळात हे सगळं स्वप्नवत झाले आहे.अत्तराऐवजी सॅनिटायझर तर फुलांऐवजी मास्कअगोदर विवाह सोहळ्याप्रसंगी आलेल्या पाहुण्यांचे अत्तर वा सुगंधी पाणी मारून स्वागत करायचे. आता मात्र त्याची जागा सॅनिटायझरने घेतली असून पाहुण्यांना हातावर सॅनिटायझर दिले जाते.मंडपात प्रवेश करताना गुलाबाचे फुल आणि अक्षता दिल्या जायच्या. आता त्याऐवजी आलेल्यांना मास्क व अक्षता दिल्या जात असल्याचे विवाह सोहळ्याचे हे नवे रूप पाहावयास मिळत आहे.शेतातील आखाड्यावर स्वयंपाकशेतात एक छोटासा मंडप, आजूबाजूला असलेली झाडांची सावली. तिथेच पत्र्याच्या शेडमध्ये अथवा शेतातील आखाड्यावर स्वयंपाक होत आहे. आलेली पाहुणे मंडळी शेतात सावलीसाठी झाडांचा आसरा घेत त्याचा वेगळा आनंद उपमोगतआहेत.

कार्यालयातील लग्न सोहळे आता शेतातचांदोरी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विवाह सोहळ्यासाठी बंधने आहेत. यामुळे ग्रामीण भागात लग्नासाठी मंगल कार्यालयाऐवजी शेतातच विवाह सोहळा उरकण्यास पसंती दिली जात आहे. ग्रामीण भागातील अनेक विवाह सोहळे शासनाचे नियम पाळत शेतीमध्ये होताना दिसत आहेत.शासनाने कडक निर्बंध घालून दिल्याने विवाह सोहळे कमीत कमी लोकांमध्ये व कमी वेळात साजरे करावे लागत आहेत. जिल्ह्यात ग्रामीण भागात मात्र विवाहाचे मुहूर्त साधत साध्या पद्धतीने आपल्या शेतातच छोटासा मंडप टाकून विवाह सोहळे होताना दिसत आहे. अगोदर विवाह सोहळ्याप्रसंगी आलेल्या पाहुण्यांचे अत्तर वा सुगंधी पाणी मारून स्वागत करायचे. आता मात्र त्याची जागा सॅनिटायझरने घेतली असून पाहुण्यांना हातावर सॅनिटायझर दिले जाते. मंडपात प्रवेश करताना गुलाबाचे फुल आणि अक्षता दिल्या जायच्या. आता त्याऐवजी आलेल्यांना मास्क व अक्षता दिल्या जात असल्याचे विवाह सोहळ्याचे हे नवे रूप पाहावयास मिळत आहे.शेतातील आखाड्यावर स्वयंपाकशेतात एक छोटासा मंडप, आजूबाजूला असलेली झाडांची सावली. तिथेच पत्र्याच्या शेडमध्ये अथवा शेतातील आखाड्यावर स्वयंपाक होत आहे. आलेली पाहुणे मंडळी शेतात सावलीसाठी झाडांचा आसरा घेत त्याचा वेगळा आनंद उपभोगत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

टॅग्स :marriageलग्नagricultureशेती