शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी, प्रस्ताव मिळताच मदतनिधी देणार; PM नरेंद्र मोदींचं आश्वासन
2
आजचे राशीभविष्य, २७ सप्टेंबर २०२५: जमीन, घर अथवा वाहन खरेदीसाठी आजचा दिवस अनुकूल नाही
3
ठाण्यात भाजपा-शिंदेसेनेत संघर्ष; एकनाथ शिंदेंच्या अध्यक्षतेत बैठकीला गणेश नाईकांचा ‘बहिष्कार’
4
कुजबुज! ओल्या दुष्काळात काजू-बदामची चर्चा; शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी अन् राजकीय चिखलफेक
5
१६५ तोळे सोने, दोन किलो चांदी अन् ११ लाख राेख देऊनही छळ; मायानगरी मुंबईत विवाहितेचा गर्भपात
6
मढ बेट बनावट नकाशा प्रकरणाची गहाळ फाइल शोधा, अन्यथा गुन्हा दाखल करा; हायकोर्टाचे निर्देश
7
सुपर ओव्हरचा थरार! श्रीलंका २ धावांवर All Out; पहिल्या बॉलवर मॅच संपवत टीम इंडियाचा विजयी 'षटकार'
8
IND vs SL Match Super Over: अखेरच्या चेंडूवर ड्रामा अन् सामन्यात सुपर ओव्हर ट्विस्ट; नेमक काय घडलं (VIDEO)
9
Pathum Nissanka Century : पहिली सेंच्युरी अन् श्रीलंकेच्या पठ्ठ्यानं किंग कोहलीचा मोठा विक्रमही मोडला
10
पीएनबी घोटाळा: सीबीआय न्यायालयात अर्जास मान्यता; नीरव मोदीचा मेव्हणा ‘माफीचा साक्षीदार’
11
‘सीएसएमटी’वरील १८ नंबरचा प्लॅटफॉर्म ३ महिने बंद राहणार; १ ऑक्टोबरपासून पायाभूत कामे
12
दुरुस्तीच्या कामासाठी रेल्वेचा मेगाब्लॉक; तिन्ही मार्गांवर रविवारी होणार ‘प्रवासखोळंबा’
13
तीन कोटी खर्चून ‘उपचार’, तरीही आईची प्रकृती सुधारेना; मुलाची पोलीस स्टेशनला तक्रार, तपास सुरू
14
ठरलं, ८-९ ऑक्टोबरला PM मोदी महाराष्ट्रात येणार; CM फडणवीस म्हणाले, “नवी मुंबई विमानतळ...”
15
“राऊतांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तर आभार मानले असते”; कुणी केली खोचक टीका?
16
"रशियन सैन्यात जावू नका, तुमच्या जीवाला धोका"; सरकारने दिला इशारा, म्हणाले, "२७ भारतीय..."
17
या एसयूव्हीचं फक्त नावच काफी...! विक्रीच्या बाबतीत पुन्हा ठरली नंबर-1; 38% मार्केट केला एकटीनं 'कॅप्चर'
18
भारताच्या दिग्गज डिफेंस कंपनीला थेट इस्रायलमधून मिळाली मोठी ऑर्डर, अशी आहे शअरची स्थिती
19
VIDEO: बापरे... चिमुरड्याने बसल्या बैठकीला कचाकचा खाल्ल्या हिरव्या मिरच्या, नेटकरीही थक्क
20
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!

कार्यालयातील लग्न सोहळे आता शेतामध्ये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 00:18 IST

चांदोरी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विवाह सोहळ्यासाठी बंधने आहेत. यामुळे ग्रामीण भागात लग्नासाठी मंगल कार्यालाऐवजी शेतीतच विवाह सोहळा करण्यास पसंती दिली जात आहे. ग्रामीण भागातील अनेक विवाह सोहळे शासनाचे नियम पाळत शेतीमध्ये होताना दिसत आहेत.

ठळक मुद्देगुलाबाचे फुलऐवजी आलेल्यांना मास्क व अक्षता

चांदोरी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विवाह सोहळ्यासाठी बंधने आहेत. यामुळे ग्रामीण भागात लग्नासाठी मंगल कार्यालाऐवजी शेतीतच विवाह सोहळा करण्यास पसंती दिली जात आहे. ग्रामीण भागातील अनेक विवाह सोहळे शासनाचे नियम पाळत शेतीमध्ये होताना दिसत आहेत.राज्यात लॉकडाऊन लागल्यानंतर विवाह सोहळ्यासाठी शासनाने कडक निर्बंध घालून दिल्याने विवाह सोहळे कमीत कमी लोकांमध्ये व कमी वेळात साजरे करावे लागत आहेत. जिल्ह्यात ग्रामीण भागात मात्र विवाहाचे मुहूर्त साधत साध्या पद्धतीने आपल्या शेतात छोटासा मंडप टाकून विवाह सोहळे होताना दिसत आहे.यामुळे खर्चाला मोठा आळा, तसेच मोजक्याच मंडळींच्या उपस्थित, कमी गर्दी असल्याने यासाठी वेगळी उपाय योजना करण्याची गरज भासत नाही. विवाह समारंभ निश्चितच करूनदिलेली संख्या थोडी वाढली तरी चालते असेही बोलले जात आहे.त्यामुळे हा शेतातील सोहळ्याचा पर्याय वर-वधूकडील मंडळी निवडत असल्याचे पाहावयास मिळत आहे. विवाह समारंभाबाबत अनेकांच्या इच्छा अपेक्षा असतात. सोहळा थाटामाटात संपन्न व्हावा, जेवढी वऱ्हाडी मंडळींची उपस्थिती तेवढे मोठे लग्न म्हणून पत्रिका, मूळ पत्रिका हजारोंनी दिल्या जायच्या. जेवणावळी उठायच्या. त्यासाठी वेगवेगळे मेनू तयार करायचे. परंतु आताच्या काळात हे सगळं स्वप्नवत झाले आहे.अत्तराऐवजी सॅनिटायझर तर फुलांऐवजी मास्कअगोदर विवाह सोहळ्याप्रसंगी आलेल्या पाहुण्यांचे अत्तर वा सुगंधी पाणी मारून स्वागत करायचे. आता मात्र त्याची जागा सॅनिटायझरने घेतली असून पाहुण्यांना हातावर सॅनिटायझर दिले जाते.मंडपात प्रवेश करताना गुलाबाचे फुल आणि अक्षता दिल्या जायच्या. आता त्याऐवजी आलेल्यांना मास्क व अक्षता दिल्या जात असल्याचे विवाह सोहळ्याचे हे नवे रूप पाहावयास मिळत आहे.शेतातील आखाड्यावर स्वयंपाकशेतात एक छोटासा मंडप, आजूबाजूला असलेली झाडांची सावली. तिथेच पत्र्याच्या शेडमध्ये अथवा शेतातील आखाड्यावर स्वयंपाक होत आहे. आलेली पाहुणे मंडळी शेतात सावलीसाठी झाडांचा आसरा घेत त्याचा वेगळा आनंद उपमोगतआहेत.

कार्यालयातील लग्न सोहळे आता शेतातचांदोरी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विवाह सोहळ्यासाठी बंधने आहेत. यामुळे ग्रामीण भागात लग्नासाठी मंगल कार्यालयाऐवजी शेतातच विवाह सोहळा उरकण्यास पसंती दिली जात आहे. ग्रामीण भागातील अनेक विवाह सोहळे शासनाचे नियम पाळत शेतीमध्ये होताना दिसत आहेत.शासनाने कडक निर्बंध घालून दिल्याने विवाह सोहळे कमीत कमी लोकांमध्ये व कमी वेळात साजरे करावे लागत आहेत. जिल्ह्यात ग्रामीण भागात मात्र विवाहाचे मुहूर्त साधत साध्या पद्धतीने आपल्या शेतातच छोटासा मंडप टाकून विवाह सोहळे होताना दिसत आहे. अगोदर विवाह सोहळ्याप्रसंगी आलेल्या पाहुण्यांचे अत्तर वा सुगंधी पाणी मारून स्वागत करायचे. आता मात्र त्याची जागा सॅनिटायझरने घेतली असून पाहुण्यांना हातावर सॅनिटायझर दिले जाते. मंडपात प्रवेश करताना गुलाबाचे फुल आणि अक्षता दिल्या जायच्या. आता त्याऐवजी आलेल्यांना मास्क व अक्षता दिल्या जात असल्याचे विवाह सोहळ्याचे हे नवे रूप पाहावयास मिळत आहे.शेतातील आखाड्यावर स्वयंपाकशेतात एक छोटासा मंडप, आजूबाजूला असलेली झाडांची सावली. तिथेच पत्र्याच्या शेडमध्ये अथवा शेतातील आखाड्यावर स्वयंपाक होत आहे. आलेली पाहुणे मंडळी शेतात सावलीसाठी झाडांचा आसरा घेत त्याचा वेगळा आनंद उपभोगत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

टॅग्स :marriageलग्नagricultureशेती