शहरं
Join us  
Trending Stories
1
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
2
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
3
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
4
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
5
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
6
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
7
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
8
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
9
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
10
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
11
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

पदाधिकारी राजीनाम्याच्या तयारीत!

By admin | Updated: February 15, 2016 23:33 IST

कळवण : मुख्याधिकारी, लेखापाल, अभियंत्याअभावी विकासकामांना ब्रेक

 कळवण : नगरपंचायतीचे कामकाज करताना मोठ्या प्रमाणात अडचणी निर्माण होत असून, निधी उपलब्ध असूनही शासनाने मुख्याधिकारी, लेखापाल व अभियंता यांची नेमणूक केली नसल्याने शासनस्तरावरून निधी खर्च करण्याबाबत मार्गदर्शक सूचना मिळत नसल्याने कामकाज करणे अशक्य झाल्याने तत्काळ मुख्याधिकारी, लेखापाल व अभियंत्यासह महत्त्वाच्या पदावर तत्काळ अधिकारीवर्गाची नियुक्ती करावी अन्यथा शासनाचा निषेध नोंदवत राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे गटनेते कौतिक पगार यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत घेत शासनाविरोधात असलेली उघड नाराजी बोलून कळवण नगरपंचायतच्या नगराध्यक्ष सुनीता पगार, उपनगराध्यक्ष अनिता महाजन, विषय समिती सभापती जयेश पगार, अतुल पगार, अनिता जैन, रोहिणी महाले यांच्यासह राष्ट्रवादी कॉँग्रेस आघाडीचे १४ नगरसेवक व नगरसेविका राजीनामा देतील, असा इशारा कळवण नगरपंचायतीचे गटनेते कौतिक पगार यांनी यावेळी दिला.ग्रामपंचायतच बरी होती असे कळवणकरांवर म्हणण्याची वेळ आली आहे. नाशिक येथील नगररचना विभागाकडून परवानगी आणण्याची सक्ती नगरपंचायतीमुळे झाली असून, अनेक अडचणींना तोंड देण्याची वेळ आली आहे. मुख्याधिकारी, लेखाधिकारी, अभियंता, आरोग्य विभाग आदि महत्त्वपूर्ण विभागाची यंत्रणा शासनाने तत्काळ नियुक्त करण्याची गरज असताना शासन दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप उपनगराध्यक्ष अनिता महाजन, विषय समिती सभापती जयेश पगार, अतुल पगार, अनिता जैन व रोहिणी महाले यांनी केला आहे.शासनाने नगरपंचायतीसाठी असलेल्या पदसंख्येला तत्काळ मंजुरी देऊन कायमस्वरूपी यंत्रणेची नियुक्ती करावी, कळवण शहरातील पाणी, रस्ते, वीज, आरोग्य या मूलभूत सुविधांबाबत निर्णय घेण्याचे अधिकार असलेली यंत्रणा कार्यान्वित असली तरी तिची अंमलबजावणी करणारी शासन नियुक्त यंत्रणा कार्यान्वित नसल्याने अडचणी निर्माण होत असल्याचे नगरसेविका रंजना पगार, भाग्यश्री पगार, अनुराधा पगार, रंजना जगताप यांनी सांगितले. नागरिकांना विविध दाखले, गटारींचा प्रश्न, दिवाबत्ती, पाण्याची सोय होत नसल्यामुळे हाल सहन करावे लागत आहेत. शहरातील वीजपुरवठा, पाणीपुरवठा व इतर महत्त्वाची कामे वेळेवर होत नसल्याने नागरिकांमध्ये रोष व्यक्त केला जात असल्याने शासनाने या प्रश्नावर लक्ष घालावे, अशी मागणी शिवसेना शहरप्रमुख नगरसेवक साहेबराव पगार, मयूर बहिरम, बाळासाहेब जाधव, दिलीप मोरे यांनी केली आहे. (वार्ताहर)