शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

पदाधिकारी राजीनाम्याच्या तयारीत!

By admin | Updated: February 15, 2016 23:33 IST

कळवण : मुख्याधिकारी, लेखापाल, अभियंत्याअभावी विकासकामांना ब्रेक

 कळवण : नगरपंचायतीचे कामकाज करताना मोठ्या प्रमाणात अडचणी निर्माण होत असून, निधी उपलब्ध असूनही शासनाने मुख्याधिकारी, लेखापाल व अभियंता यांची नेमणूक केली नसल्याने शासनस्तरावरून निधी खर्च करण्याबाबत मार्गदर्शक सूचना मिळत नसल्याने कामकाज करणे अशक्य झाल्याने तत्काळ मुख्याधिकारी, लेखापाल व अभियंत्यासह महत्त्वाच्या पदावर तत्काळ अधिकारीवर्गाची नियुक्ती करावी अन्यथा शासनाचा निषेध नोंदवत राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे गटनेते कौतिक पगार यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत घेत शासनाविरोधात असलेली उघड नाराजी बोलून कळवण नगरपंचायतच्या नगराध्यक्ष सुनीता पगार, उपनगराध्यक्ष अनिता महाजन, विषय समिती सभापती जयेश पगार, अतुल पगार, अनिता जैन, रोहिणी महाले यांच्यासह राष्ट्रवादी कॉँग्रेस आघाडीचे १४ नगरसेवक व नगरसेविका राजीनामा देतील, असा इशारा कळवण नगरपंचायतीचे गटनेते कौतिक पगार यांनी यावेळी दिला.ग्रामपंचायतच बरी होती असे कळवणकरांवर म्हणण्याची वेळ आली आहे. नाशिक येथील नगररचना विभागाकडून परवानगी आणण्याची सक्ती नगरपंचायतीमुळे झाली असून, अनेक अडचणींना तोंड देण्याची वेळ आली आहे. मुख्याधिकारी, लेखाधिकारी, अभियंता, आरोग्य विभाग आदि महत्त्वपूर्ण विभागाची यंत्रणा शासनाने तत्काळ नियुक्त करण्याची गरज असताना शासन दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप उपनगराध्यक्ष अनिता महाजन, विषय समिती सभापती जयेश पगार, अतुल पगार, अनिता जैन व रोहिणी महाले यांनी केला आहे.शासनाने नगरपंचायतीसाठी असलेल्या पदसंख्येला तत्काळ मंजुरी देऊन कायमस्वरूपी यंत्रणेची नियुक्ती करावी, कळवण शहरातील पाणी, रस्ते, वीज, आरोग्य या मूलभूत सुविधांबाबत निर्णय घेण्याचे अधिकार असलेली यंत्रणा कार्यान्वित असली तरी तिची अंमलबजावणी करणारी शासन नियुक्त यंत्रणा कार्यान्वित नसल्याने अडचणी निर्माण होत असल्याचे नगरसेविका रंजना पगार, भाग्यश्री पगार, अनुराधा पगार, रंजना जगताप यांनी सांगितले. नागरिकांना विविध दाखले, गटारींचा प्रश्न, दिवाबत्ती, पाण्याची सोय होत नसल्यामुळे हाल सहन करावे लागत आहेत. शहरातील वीजपुरवठा, पाणीपुरवठा व इतर महत्त्वाची कामे वेळेवर होत नसल्याने नागरिकांमध्ये रोष व्यक्त केला जात असल्याने शासनाने या प्रश्नावर लक्ष घालावे, अशी मागणी शिवसेना शहरप्रमुख नगरसेवक साहेबराव पगार, मयूर बहिरम, बाळासाहेब जाधव, दिलीप मोरे यांनी केली आहे. (वार्ताहर)