शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारने करून दाखवले! ११ वर्षांत भारतातील गरिबी किती घटली? आकडेवारीच समोर आली
2
मणिपूरमध्ये पुन्हा गोंधळ! निदर्शकांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला, पोलिसांशी हिंसक संघर्ष
3
“राहुल गांधी असामान्य नेते, भाजपा, मोदींना खोटे बोलण्याचा नोबेल पुरस्कार द्यावा”: संजय राऊत
4
भारत-इंग्लंड कसोटी आधी तेंडुलकर-अँडरसनमुळे वातावरण तापलं! ECB अन् BCCI असा काढणार तोडगा?
5
२३ पानांचं प्रेमपत्र लिहीत पुतण्यानं उचललं टोकाचं पाऊल! म्हणाला "काका आय लव्ह यु, मी तुमच्याशिवाय..."
6
"सध्या अ‍ॅक्शन सिनेमे चालत आहेत, त्यामुळे.."; आमिर खान 'सितारे जमीन पर'साठी चिंताग्रस्त, म्हणाला-
7
पाकिस्तान पुन्हा तोंडावर पडला; UN मध्ये मागितले ४ समित्यांचे अध्यक्षपद, मिळाला 'ठेंगा'
8
“नितेशने जपून बोलावे, भान ठेवायला हवे, आपण महायुतीमध्ये आहोत हे विसरता कामा नये”: निलेश राणे
9
बकरी ईदच्या दिवशीच वृद्धाने दिली स्वतःची कुर्बानी; मशिदीत नमाज अदा केली अन् नंतर...
10
आंतरराष्ट्रीय स्तरावर हात पसरणारा पाकिस्तान भरतोय नेत्यांचे खिसे! सरकारने वाढवला पाचपटींनी पगार
11
मुंबई गोवा महामार्गांवर CNG टँकरची शिक्षकांच्या ट्रॅव्हल्सला धडक; गॅस गळतीमुळे घराने घेतला पेट
12
HDFC बँकेच्या CEO वर कारवाईची मागणी, ₹२५ कोटी घोटाळ्याचा आरोप; जाणून घ्या प्रकरण
13
विराट कोहलीसारखी निष्ठा कायम राहील का? १८ वर्षांपर्यंत तुमचाही संयम टिकू शकेल का?
14
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींचे शुभ कल्याण, ६ राशींना काहीसा संमिश्र काळ; तुमची रास कोणती?
15
दहशतवादी आणि पीडित एकाच तराजूत नाहीच..; जयशंकर यांचा पुन्हा एकदा जगाला स्पष्ट संदेश
16
फुफ्फुस निकामी, सतत दम्याचा त्रास अन्..! दुर्धर आजारावर मात करुन ३ वर्षांनी मराठी अभिनेत्याचं कमबॅक
17
T20 Mumbai League : कॅप्टन पृथ्वीची फसलेली चाल; सलामीवीर जोडीदाराला Retire Out करून स्वत:ही परतला तंबूत
18
“निवडणूक आयोग हा भाजपा आयोग, मतांवर टाकलेल्या दरोड्याची चौकशी का करत नाही?”: नाना पटोले
19
"गंभीर परिणाम भोगावे लागतील"; ट्रम्प यांचा मस्क यांच्याशी समेट करण्यास नकार, दिला मोठा इशारा
20
जनता त्यांना नाकारते, ते जनादेशाला नाकारतात! देवेंद्र फडणवीसांचा राहुल गांधींना टोला

पदाधिकारी राजीनाम्याच्या तयारीत!

By admin | Updated: February 15, 2016 23:33 IST

कळवण : मुख्याधिकारी, लेखापाल, अभियंत्याअभावी विकासकामांना ब्रेक

 कळवण : नगरपंचायतीचे कामकाज करताना मोठ्या प्रमाणात अडचणी निर्माण होत असून, निधी उपलब्ध असूनही शासनाने मुख्याधिकारी, लेखापाल व अभियंता यांची नेमणूक केली नसल्याने शासनस्तरावरून निधी खर्च करण्याबाबत मार्गदर्शक सूचना मिळत नसल्याने कामकाज करणे अशक्य झाल्याने तत्काळ मुख्याधिकारी, लेखापाल व अभियंत्यासह महत्त्वाच्या पदावर तत्काळ अधिकारीवर्गाची नियुक्ती करावी अन्यथा शासनाचा निषेध नोंदवत राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे गटनेते कौतिक पगार यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत घेत शासनाविरोधात असलेली उघड नाराजी बोलून कळवण नगरपंचायतच्या नगराध्यक्ष सुनीता पगार, उपनगराध्यक्ष अनिता महाजन, विषय समिती सभापती जयेश पगार, अतुल पगार, अनिता जैन, रोहिणी महाले यांच्यासह राष्ट्रवादी कॉँग्रेस आघाडीचे १४ नगरसेवक व नगरसेविका राजीनामा देतील, असा इशारा कळवण नगरपंचायतीचे गटनेते कौतिक पगार यांनी यावेळी दिला.ग्रामपंचायतच बरी होती असे कळवणकरांवर म्हणण्याची वेळ आली आहे. नाशिक येथील नगररचना विभागाकडून परवानगी आणण्याची सक्ती नगरपंचायतीमुळे झाली असून, अनेक अडचणींना तोंड देण्याची वेळ आली आहे. मुख्याधिकारी, लेखाधिकारी, अभियंता, आरोग्य विभाग आदि महत्त्वपूर्ण विभागाची यंत्रणा शासनाने तत्काळ नियुक्त करण्याची गरज असताना शासन दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप उपनगराध्यक्ष अनिता महाजन, विषय समिती सभापती जयेश पगार, अतुल पगार, अनिता जैन व रोहिणी महाले यांनी केला आहे.शासनाने नगरपंचायतीसाठी असलेल्या पदसंख्येला तत्काळ मंजुरी देऊन कायमस्वरूपी यंत्रणेची नियुक्ती करावी, कळवण शहरातील पाणी, रस्ते, वीज, आरोग्य या मूलभूत सुविधांबाबत निर्णय घेण्याचे अधिकार असलेली यंत्रणा कार्यान्वित असली तरी तिची अंमलबजावणी करणारी शासन नियुक्त यंत्रणा कार्यान्वित नसल्याने अडचणी निर्माण होत असल्याचे नगरसेविका रंजना पगार, भाग्यश्री पगार, अनुराधा पगार, रंजना जगताप यांनी सांगितले. नागरिकांना विविध दाखले, गटारींचा प्रश्न, दिवाबत्ती, पाण्याची सोय होत नसल्यामुळे हाल सहन करावे लागत आहेत. शहरातील वीजपुरवठा, पाणीपुरवठा व इतर महत्त्वाची कामे वेळेवर होत नसल्याने नागरिकांमध्ये रोष व्यक्त केला जात असल्याने शासनाने या प्रश्नावर लक्ष घालावे, अशी मागणी शिवसेना शहरप्रमुख नगरसेवक साहेबराव पगार, मयूर बहिरम, बाळासाहेब जाधव, दिलीप मोरे यांनी केली आहे. (वार्ताहर)