शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशांत किशोर यांना बिहारच्या आरा येथील रॅलीमध्ये गंभीर दुखापत, उपचारासाठी पाटणाला रवाना
2
छांगुर बाबावर EDची मोठी कारवाई! मुंबई, लखनौमध्ये छापे; ६० कोटींहून जास्तीचे मनी लाँड्रिंग उघड
3
"मी कोणाला छेडत नाही; पण मला कुणी त्रास दिला तर..."; एकनाथ शिंदेंचा उबाठा गटाला इशारा
4
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
5
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
6
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
7
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
8
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
9
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
10
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
11
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
12
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
13
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
14
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
15
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
16
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
17
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
18
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
19
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
20
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं

केटीएचएम महाविद्यालयात समाजशास्त्र विभागातर्फे राष्ट्रीय चर्चासत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2019 17:52 IST

नाशिक : कोट्यवधी लोकांना विकासाची संधी नाकारून केवळ मूठभर लोकांचा विकास गेल्या ७० वर्षात झाला आहे. आरोग्य, शिक्षण, राहणीमान, ...

ठळक मुद्देचर्चासत्रासाठी महाराष्ट्रातून ९० जणांची नोंदणी

नाशिक : कोट्यवधी लोकांना विकासाची संधी नाकारून केवळ मूठभर लोकांचा विकास गेल्या ७० वर्षात झाला आहे. आरोग्य, शिक्षण, राहणीमान, आयुष्याची गुणवत्ता, लिंगभेद, विकास निर्देशांक, यांचा विचार करण्याची गरज निर्माण झाली असून, सामाजिक सौररचनेचा नव्याने चिकित्सक अभ्यास करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या समाजशास्त्र विभागप्रमुख डॉ.श्रुती तांबे यांनी केले.सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व केटीएचएम महाविद्यालयाच्या समाजशास्त्र विभाग आयोजित दोन दिवसीय ‘रिथनिंग डेव्हलपमेंट अ‍ॅण्ड डिस्प्लेसमेंट आॅफ इंडिया’ या विषयावरील राष्ट्रीय चर्चासत्राच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होत्या. व्यासपीठावर माजी समाजशास्त्र विभागप्रमुख डॉ. आर. बी. पाटील, प्राचार्य डॉ. व्ही. बी. गायकवाड, समाजशास्त्र विभागप्रमुख डॉ. संजय सावळे उपस्थित होते.डॉ. तांबे म्हणाल्या की, समाजशास्त्र विकासाचा अभ्यास पुरेशा गांभीर्याने केला का? असे विचारण्याची गरज निर्माण झाली आहे. डॉ. आर. बी. पाटील म्हणाले, भारतामध्ये प्रामुख्याने खाणी, खासगी उद्योग, अभयारण्ये, धरणे यामुळे विस्थापितांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. याचा परिणाम आदिवासींवर याचा परिणाम आदिवासींवर होतो. पुनर्वसनासंदर्भात कायदे असून, त्याचा योग्य तो वापर होत नाही त्यामुळे पुनर्वसित नागरिकांना सुविधा मिळत नाही वारणा व कोयना धरण हे याबाबतचे उत्तम उदाहरण आहे, असे ते म्हणाले.दिल्ली विद्यापीठ समाजशास्त्र विभागप्रमुख डॉ. नंदिनी सुंदर यांनी नैसर्गिक आपत्तीमध्ये विस्थापित होणाऱ्यांमध्ये गरीब मोठ्या प्रमाणावर असतात. विस्थापित झाल्यावर सामाजिक संरचना बदलते त्यामुळे असमानता निर्माण होते. नाते-संबंधामध्ये दरी निर्माण होत. लोकांमध्ये एकतेची भावना राहत नाही; याचा परिणाम समाज संरचनेवर होतो, असे त्यांनी सांगितले.सामाजिक कार्यकर्त्या उल्का महाजन यांनी दिल्ली, मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर समृद्धी महामार्ग या प्रश्नामुळे मोठ्या प्रमाणावर लोक विस्थापित होणार आहेत. याला तुम्ही विकास म्हणू शकत नाहीत. यावर उपाय म्हणून लोकांनी संघटित होऊन याला विरोध करणे अपेक्षित आहे, असे मत त्यांनी मांडले. प्राचार्य डॉ. व्ही. बी. गायकवाड यांनी महाविद्यालयाच्या विकासाचा आढावा घेतला.प्रास्ताविक विभागप्रमुख डॉ. संजय सावळे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा.तुषार पाटील यांनी, तर आभार प्रा. डी. एच. शिंदे यांनी मानले. यावेळी प्रा. उमेश शिंदे, प्रा.शशिकांत माळोदे यांनी परिश्रम घेतले. या चर्चासत्रासाठी महाराष्ट्रातून ९० जणांनी नोंदणी केली आहे.

 

टॅग्स :NashikनाशिकEducation Sectorशिक्षण क्षेत्र