शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

केटीएचएम महाविद्यालयात समाजशास्त्र विभागातर्फे राष्ट्रीय चर्चासत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2019 17:52 IST

नाशिक : कोट्यवधी लोकांना विकासाची संधी नाकारून केवळ मूठभर लोकांचा विकास गेल्या ७० वर्षात झाला आहे. आरोग्य, शिक्षण, राहणीमान, ...

ठळक मुद्देचर्चासत्रासाठी महाराष्ट्रातून ९० जणांची नोंदणी

नाशिक : कोट्यवधी लोकांना विकासाची संधी नाकारून केवळ मूठभर लोकांचा विकास गेल्या ७० वर्षात झाला आहे. आरोग्य, शिक्षण, राहणीमान, आयुष्याची गुणवत्ता, लिंगभेद, विकास निर्देशांक, यांचा विचार करण्याची गरज निर्माण झाली असून, सामाजिक सौररचनेचा नव्याने चिकित्सक अभ्यास करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या समाजशास्त्र विभागप्रमुख डॉ.श्रुती तांबे यांनी केले.सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व केटीएचएम महाविद्यालयाच्या समाजशास्त्र विभाग आयोजित दोन दिवसीय ‘रिथनिंग डेव्हलपमेंट अ‍ॅण्ड डिस्प्लेसमेंट आॅफ इंडिया’ या विषयावरील राष्ट्रीय चर्चासत्राच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होत्या. व्यासपीठावर माजी समाजशास्त्र विभागप्रमुख डॉ. आर. बी. पाटील, प्राचार्य डॉ. व्ही. बी. गायकवाड, समाजशास्त्र विभागप्रमुख डॉ. संजय सावळे उपस्थित होते.डॉ. तांबे म्हणाल्या की, समाजशास्त्र विकासाचा अभ्यास पुरेशा गांभीर्याने केला का? असे विचारण्याची गरज निर्माण झाली आहे. डॉ. आर. बी. पाटील म्हणाले, भारतामध्ये प्रामुख्याने खाणी, खासगी उद्योग, अभयारण्ये, धरणे यामुळे विस्थापितांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. याचा परिणाम आदिवासींवर याचा परिणाम आदिवासींवर होतो. पुनर्वसनासंदर्भात कायदे असून, त्याचा योग्य तो वापर होत नाही त्यामुळे पुनर्वसित नागरिकांना सुविधा मिळत नाही वारणा व कोयना धरण हे याबाबतचे उत्तम उदाहरण आहे, असे ते म्हणाले.दिल्ली विद्यापीठ समाजशास्त्र विभागप्रमुख डॉ. नंदिनी सुंदर यांनी नैसर्गिक आपत्तीमध्ये विस्थापित होणाऱ्यांमध्ये गरीब मोठ्या प्रमाणावर असतात. विस्थापित झाल्यावर सामाजिक संरचना बदलते त्यामुळे असमानता निर्माण होते. नाते-संबंधामध्ये दरी निर्माण होत. लोकांमध्ये एकतेची भावना राहत नाही; याचा परिणाम समाज संरचनेवर होतो, असे त्यांनी सांगितले.सामाजिक कार्यकर्त्या उल्का महाजन यांनी दिल्ली, मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर समृद्धी महामार्ग या प्रश्नामुळे मोठ्या प्रमाणावर लोक विस्थापित होणार आहेत. याला तुम्ही विकास म्हणू शकत नाहीत. यावर उपाय म्हणून लोकांनी संघटित होऊन याला विरोध करणे अपेक्षित आहे, असे मत त्यांनी मांडले. प्राचार्य डॉ. व्ही. बी. गायकवाड यांनी महाविद्यालयाच्या विकासाचा आढावा घेतला.प्रास्ताविक विभागप्रमुख डॉ. संजय सावळे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा.तुषार पाटील यांनी, तर आभार प्रा. डी. एच. शिंदे यांनी मानले. यावेळी प्रा. उमेश शिंदे, प्रा.शशिकांत माळोदे यांनी परिश्रम घेतले. या चर्चासत्रासाठी महाराष्ट्रातून ९० जणांनी नोंदणी केली आहे.

 

टॅग्स :NashikनाशिकEducation Sectorशिक्षण क्षेत्र