शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
2
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
3
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
4
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
5
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
6
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
7
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
8
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
9
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
10
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
11
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
12
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
13
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
14
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
15
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
16
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
17
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर
18
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
19
Asia Cup : संजूनं भक्कम केली ओपनिंगची दावेदारी! 'खंबीर' खेळीमुळं गंभीरचा प्लॅन फिस्कटणार?
20
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू

मुंबईतील पावसामुळे रेल्वेगाड्या रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 20:18 IST

मुंबईतील पावसामुळे मनमाड रेल्वेस्थानकात दोन, लासलगाव येथे १, तर नाशिकरोड रेल्वेस्थानकात १, देवळीत एक अशा गाड्या थांबविण्यात आल्या होत्या. पुढील सूचना मिळेपर्यंत या गाड्या स्थानकातच थांबविण्यात आल्या होत्या. पंचवटी, राज्यराणी एक्सप्रेस रद्द झाली

ठळक मुद्देनाशिकरोड स्थानकातून विदर्भ एक्स्प्रेस माघारी

नाशिक : मुंबईत सुरू असलेल्या जोरदार पर्जन्यवृष्टीमुळे रेल्वेसेवा पूर्णपणे विस्कळीत झाली असून, रेल्वेगाड्या आहेत त्या ठिकाणीच थांबविण्यात आल्या आहेत. त्यामुळे संपूर्ण रेल्वेयंत्रणा कोलमडून पडली आहे. रविवारी नाशिकरोड स्थानकातून मुंबईकडे जाणाऱ्या आठ रेल्वेगाड्या रद्द करण्याची वेळ आली आहे. पंचवटी, राज्यराणी एक्सप्रेस रद्द झालीयामुळे प्रवाशांची गैरसोय झाली.    शनिवारी म‌ध्यरात्रीपासून मुंबईसह उपनगरांमध्ये पावसाने थैमान घातले असून, जनजीवन विस्कळीत झाले आहे. वाहतूक यंत्रणा पूर्णपणे ठप्प झाली आहे. विशेषत: मुंबईची लाईफलाईन असलेल्या लोकलसह रेल्वेगाड्यांवरही त्याचा परिणाम झाल्याने मुंबईकडे जाणाऱ्या अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे नाशिकरोड रेल्वेस्थानकातून मुंबईकडे जाणाऱ्या जवळपास आठ गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.     मुंबई - जबलपूर गरीबरथ विशेष यात्रा गाडी, लोकमान्य टिळक टर्मिनस हटिया विशेष यात्रा गाडी, मुंबई - नागपूर विशेष यात्रा गाडी, मुंबई - आदिलाबाद, मुंबई - गोंदिया, मुंबई - मनमाड, मुंबई - सिकंदराबाद, मुंबई - अमरावती, मुंबई - नांदेड राज्यराणी या गाड्या रद्द करण्यात आल्याची घोषणा रेल्वे प्रशासनाने केली आहे.

 

 

टॅग्स :Nashikनाशिकrailwayरेल्वे