शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
2
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
3
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
4
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
5
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
6
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
7
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
8
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
9
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
10
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
11
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
12
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
13
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
14
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
15
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
16
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
17
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
18
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
19
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
20
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?

...आता उत्तर महाराष्ट्रातील वन्यप्राण्यांची गणना पुढच्या वर्षी

By अझहर शेख | Updated: May 10, 2020 17:39 IST

राज्यातील काही अभयारण्यांमधील वनक्षेत्रात तेथील स्थानिक वनकर्मचा-यांनी वर्षभरातून एकदा मिळणारी बुध्दपौर्णिमेच्या चांदण्या रात्रीच्या लख्ख प्रकाशाची संधी न सोडता एका मचाणवर एक वनरक्षकाने बसून तसेच काही ट्रॅप कॅमेरे लावून जसे शक्य होईल, तसे पाणवठ्यांवर येणा-या वन्यप्राण्यांची प्रजातीनुसार मोजदाद केली.

ठळक मुद्देट्रॅप कॅमेऱ्यांच्या मदतीने गणनेचा प्रयत्न व्हायला हवा...तर वन्यप्राण्यांची स्थिती समजली असती

नाशिक : बुध्दपौर्णिमेच्या रात्री विविध अभयारण्यांसह राखीव वनक्षेत्रात पारंपरिक पध्दतीने पाणवठ्यांवर केली जाणारी वन्यप्राणी गणना यावर्षी प्रधान मुख्य वनसंरक्षकांनी कोरोनाचा संसर्ग लक्षात घेता राज्यभरात स्थगित केली; मात्र ट्रॅप कॅमेऱ्यांद्वारे वन कर्मचा-यांमार्फत जर वन्यप्राणी गणनेचा प्रयत्न नाशिक वनवृत्तातील नांदूरमध्यमेश्वर, कळसुबाई-हरिश्चंद्रगड, अनेर, यावल या अभयारण्यांमध्ये झाला असता, तर कदाचित उत्तर महाराष्ट्रातील  वन्यजीवांची थोडीफार स्थिती लक्षात आली असती, असे मत वन्यजीवप्रेमींकडून व्यक्त होत आहे.कोरोना आजाराचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी राज्याचे वन्यजीव विभागाचे प्रधान मुख्य वनसंरक्षकांनी यंदा बुध्दपौर्णिमेच्या रात्री निसर्गप्रमी, वन्यजीव संस्थांच्या स्वयंसेवकांची मदत प्राणीगणनेसाठी टाळावी आणि बुध्दपौर्णिमेच्या रात्री नियोजित असलेली वन्यप्राणी गणना स्थगित करण्याचे आदेश दिले होते. मात्र राज्यातील काही अभयारण्यांमधील वनक्षेत्रात तेथील स्थानिक वनकर्मचा-यांनी वर्षभरातून एकदा मिळणारी बुध्दपौर्णिमेच्या चांदण्या रात्रीच्या लख्ख प्रकाशाची संधी न सोडता एका मचाणवर एक वनरक्षकाने बसून तसेच काही ट्रॅप कॅमेरे लावून जसे शक्य होईल, तसे पाणवठ्यांवर येणा-या वन्यप्राण्यांची प्रजातीनुसार मोजदाद केली. यामध्ये मेळघाट व्याघ्र प्रकल्प, कोकण विभागातील फणसाड, मराठवाड्यातील गौताळा अभयारण्यांमध्ये वन्यजीव विभागाचा समावेश आहे. या अभयारण्यांच्या वनक्षेत्रात पाणवठ्यांवर वनरक्षकांनी मचाणवर बसून तसेच ट्रॅप कॅमेरे लावून वन्यप्राणी गणना क रण्याचा जुजबी प्रयत्न का होईना केला. यामुळे या अभयारण्यांच्या वनक्षेत्रपालांना आता पुढील वर्षभरासाठी वन्यजीव संवर्धनाबाबत आवश्यक त्या उपायोजनांचा आराखडा तयार करता येणे शक्य होणार आहे.

गतवर्षीच्या प्रगणनेत १ हजार ६८६ प्राण्यांची नोंद उत्तर महाराष्ट्रातील नाशिक वनवृत्तात येणा-या नांदूरमध्यमेश्वर वन्यजीव अभयारण्यासह अहमदनगर जिल्ह्यातील कळसुबाई-हरिश्चंद्रगड, जळगाव जिल्ह्यातील पाल-यावल, अनेर डॅम या अभयारण्यांमध्ये मात्र यंदाच्या बुध्दपौर्णिमेच्या रात्री असा कु ठलाही प्रयोग वन्यप्राणी गणनेसाठी होऊ शकला नाही. कमी मनुष्यबळ व अपुरी ट्रॅप कॅमे-यांची संख्या हे कारण नाशिक वन्यजीव विभागाकडून सांगण्यात आले आहे. गतवर्षीच्या प्रगणनेत १हजार ६८६ प्राण्यांची नोंद करण्यात आली. आता पुढच्यावर्षी बुध्दपौर्णिमेच्या रात्री वन्यजीव प्राणी गणना करण्यात येणार असल्याची माहिती नाशिक वनवृत्ताचे मुख्य वनसंरक्षक अनिल अंजनकर यांनी दिली.

टॅग्स :wildlifeवन्यजीवforest departmentवनविभागCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस