शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

...आता उत्तर महाराष्ट्रातील वन्यप्राण्यांची गणना पुढच्या वर्षी

By अझहर शेख | Updated: May 10, 2020 17:39 IST

राज्यातील काही अभयारण्यांमधील वनक्षेत्रात तेथील स्थानिक वनकर्मचा-यांनी वर्षभरातून एकदा मिळणारी बुध्दपौर्णिमेच्या चांदण्या रात्रीच्या लख्ख प्रकाशाची संधी न सोडता एका मचाणवर एक वनरक्षकाने बसून तसेच काही ट्रॅप कॅमेरे लावून जसे शक्य होईल, तसे पाणवठ्यांवर येणा-या वन्यप्राण्यांची प्रजातीनुसार मोजदाद केली.

ठळक मुद्देट्रॅप कॅमेऱ्यांच्या मदतीने गणनेचा प्रयत्न व्हायला हवा...तर वन्यप्राण्यांची स्थिती समजली असती

नाशिक : बुध्दपौर्णिमेच्या रात्री विविध अभयारण्यांसह राखीव वनक्षेत्रात पारंपरिक पध्दतीने पाणवठ्यांवर केली जाणारी वन्यप्राणी गणना यावर्षी प्रधान मुख्य वनसंरक्षकांनी कोरोनाचा संसर्ग लक्षात घेता राज्यभरात स्थगित केली; मात्र ट्रॅप कॅमेऱ्यांद्वारे वन कर्मचा-यांमार्फत जर वन्यप्राणी गणनेचा प्रयत्न नाशिक वनवृत्तातील नांदूरमध्यमेश्वर, कळसुबाई-हरिश्चंद्रगड, अनेर, यावल या अभयारण्यांमध्ये झाला असता, तर कदाचित उत्तर महाराष्ट्रातील  वन्यजीवांची थोडीफार स्थिती लक्षात आली असती, असे मत वन्यजीवप्रेमींकडून व्यक्त होत आहे.कोरोना आजाराचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी राज्याचे वन्यजीव विभागाचे प्रधान मुख्य वनसंरक्षकांनी यंदा बुध्दपौर्णिमेच्या रात्री निसर्गप्रमी, वन्यजीव संस्थांच्या स्वयंसेवकांची मदत प्राणीगणनेसाठी टाळावी आणि बुध्दपौर्णिमेच्या रात्री नियोजित असलेली वन्यप्राणी गणना स्थगित करण्याचे आदेश दिले होते. मात्र राज्यातील काही अभयारण्यांमधील वनक्षेत्रात तेथील स्थानिक वनकर्मचा-यांनी वर्षभरातून एकदा मिळणारी बुध्दपौर्णिमेच्या चांदण्या रात्रीच्या लख्ख प्रकाशाची संधी न सोडता एका मचाणवर एक वनरक्षकाने बसून तसेच काही ट्रॅप कॅमेरे लावून जसे शक्य होईल, तसे पाणवठ्यांवर येणा-या वन्यप्राण्यांची प्रजातीनुसार मोजदाद केली. यामध्ये मेळघाट व्याघ्र प्रकल्प, कोकण विभागातील फणसाड, मराठवाड्यातील गौताळा अभयारण्यांमध्ये वन्यजीव विभागाचा समावेश आहे. या अभयारण्यांच्या वनक्षेत्रात पाणवठ्यांवर वनरक्षकांनी मचाणवर बसून तसेच ट्रॅप कॅमेरे लावून वन्यप्राणी गणना क रण्याचा जुजबी प्रयत्न का होईना केला. यामुळे या अभयारण्यांच्या वनक्षेत्रपालांना आता पुढील वर्षभरासाठी वन्यजीव संवर्धनाबाबत आवश्यक त्या उपायोजनांचा आराखडा तयार करता येणे शक्य होणार आहे.

गतवर्षीच्या प्रगणनेत १ हजार ६८६ प्राण्यांची नोंद उत्तर महाराष्ट्रातील नाशिक वनवृत्तात येणा-या नांदूरमध्यमेश्वर वन्यजीव अभयारण्यासह अहमदनगर जिल्ह्यातील कळसुबाई-हरिश्चंद्रगड, जळगाव जिल्ह्यातील पाल-यावल, अनेर डॅम या अभयारण्यांमध्ये मात्र यंदाच्या बुध्दपौर्णिमेच्या रात्री असा कु ठलाही प्रयोग वन्यप्राणी गणनेसाठी होऊ शकला नाही. कमी मनुष्यबळ व अपुरी ट्रॅप कॅमे-यांची संख्या हे कारण नाशिक वन्यजीव विभागाकडून सांगण्यात आले आहे. गतवर्षीच्या प्रगणनेत १हजार ६८६ प्राण्यांची नोंद करण्यात आली. आता पुढच्यावर्षी बुध्दपौर्णिमेच्या रात्री वन्यजीव प्राणी गणना करण्यात येणार असल्याची माहिती नाशिक वनवृत्ताचे मुख्य वनसंरक्षक अनिल अंजनकर यांनी दिली.

टॅग्स :wildlifeवन्यजीवforest departmentवनविभागCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस