शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

...आता उत्तर महाराष्ट्रातील वन्यप्राण्यांची गणना पुढच्या वर्षी

By अझहर शेख | Updated: May 10, 2020 17:39 IST

राज्यातील काही अभयारण्यांमधील वनक्षेत्रात तेथील स्थानिक वनकर्मचा-यांनी वर्षभरातून एकदा मिळणारी बुध्दपौर्णिमेच्या चांदण्या रात्रीच्या लख्ख प्रकाशाची संधी न सोडता एका मचाणवर एक वनरक्षकाने बसून तसेच काही ट्रॅप कॅमेरे लावून जसे शक्य होईल, तसे पाणवठ्यांवर येणा-या वन्यप्राण्यांची प्रजातीनुसार मोजदाद केली.

ठळक मुद्देट्रॅप कॅमेऱ्यांच्या मदतीने गणनेचा प्रयत्न व्हायला हवा...तर वन्यप्राण्यांची स्थिती समजली असती

नाशिक : बुध्दपौर्णिमेच्या रात्री विविध अभयारण्यांसह राखीव वनक्षेत्रात पारंपरिक पध्दतीने पाणवठ्यांवर केली जाणारी वन्यप्राणी गणना यावर्षी प्रधान मुख्य वनसंरक्षकांनी कोरोनाचा संसर्ग लक्षात घेता राज्यभरात स्थगित केली; मात्र ट्रॅप कॅमेऱ्यांद्वारे वन कर्मचा-यांमार्फत जर वन्यप्राणी गणनेचा प्रयत्न नाशिक वनवृत्तातील नांदूरमध्यमेश्वर, कळसुबाई-हरिश्चंद्रगड, अनेर, यावल या अभयारण्यांमध्ये झाला असता, तर कदाचित उत्तर महाराष्ट्रातील  वन्यजीवांची थोडीफार स्थिती लक्षात आली असती, असे मत वन्यजीवप्रेमींकडून व्यक्त होत आहे.कोरोना आजाराचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी राज्याचे वन्यजीव विभागाचे प्रधान मुख्य वनसंरक्षकांनी यंदा बुध्दपौर्णिमेच्या रात्री निसर्गप्रमी, वन्यजीव संस्थांच्या स्वयंसेवकांची मदत प्राणीगणनेसाठी टाळावी आणि बुध्दपौर्णिमेच्या रात्री नियोजित असलेली वन्यप्राणी गणना स्थगित करण्याचे आदेश दिले होते. मात्र राज्यातील काही अभयारण्यांमधील वनक्षेत्रात तेथील स्थानिक वनकर्मचा-यांनी वर्षभरातून एकदा मिळणारी बुध्दपौर्णिमेच्या चांदण्या रात्रीच्या लख्ख प्रकाशाची संधी न सोडता एका मचाणवर एक वनरक्षकाने बसून तसेच काही ट्रॅप कॅमेरे लावून जसे शक्य होईल, तसे पाणवठ्यांवर येणा-या वन्यप्राण्यांची प्रजातीनुसार मोजदाद केली. यामध्ये मेळघाट व्याघ्र प्रकल्प, कोकण विभागातील फणसाड, मराठवाड्यातील गौताळा अभयारण्यांमध्ये वन्यजीव विभागाचा समावेश आहे. या अभयारण्यांच्या वनक्षेत्रात पाणवठ्यांवर वनरक्षकांनी मचाणवर बसून तसेच ट्रॅप कॅमेरे लावून वन्यप्राणी गणना क रण्याचा जुजबी प्रयत्न का होईना केला. यामुळे या अभयारण्यांच्या वनक्षेत्रपालांना आता पुढील वर्षभरासाठी वन्यजीव संवर्धनाबाबत आवश्यक त्या उपायोजनांचा आराखडा तयार करता येणे शक्य होणार आहे.

गतवर्षीच्या प्रगणनेत १ हजार ६८६ प्राण्यांची नोंद उत्तर महाराष्ट्रातील नाशिक वनवृत्तात येणा-या नांदूरमध्यमेश्वर वन्यजीव अभयारण्यासह अहमदनगर जिल्ह्यातील कळसुबाई-हरिश्चंद्रगड, जळगाव जिल्ह्यातील पाल-यावल, अनेर डॅम या अभयारण्यांमध्ये मात्र यंदाच्या बुध्दपौर्णिमेच्या रात्री असा कु ठलाही प्रयोग वन्यप्राणी गणनेसाठी होऊ शकला नाही. कमी मनुष्यबळ व अपुरी ट्रॅप कॅमे-यांची संख्या हे कारण नाशिक वन्यजीव विभागाकडून सांगण्यात आले आहे. गतवर्षीच्या प्रगणनेत १हजार ६८६ प्राण्यांची नोंद करण्यात आली. आता पुढच्यावर्षी बुध्दपौर्णिमेच्या रात्री वन्यजीव प्राणी गणना करण्यात येणार असल्याची माहिती नाशिक वनवृत्ताचे मुख्य वनसंरक्षक अनिल अंजनकर यांनी दिली.

टॅग्स :wildlifeवन्यजीवforest departmentवनविभागCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस