शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
3
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
4
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
5
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
6
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
7
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
8
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
9
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?
10
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
11
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
12
Mumbai Accident: ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
13
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
14
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
15
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे
16
टक्केवारीच्या आरोपानंतर परभणीचे जिल्हा नियोजन अधिकारी कार्यमुक्त; अधिकाऱ्यांमध्ये खळबळ
17
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
18
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
19
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
20
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?

आता द्राक्षांची दैना !

By किरण अग्रवाल | Updated: December 23, 2018 01:26 IST

कांद्याचा वांधा पूर्णत: अथवा समाधानकारकरीत्या संपला नसताना आता द्राक्षे ‘आंबट’ होण्याची चिन्हे आहेत. जिल्ह्यातील कडाक्याच्या थंडीमुळे द्राक्षबागांमध्ये शेकोट्या पेटविण्याची वेळ आली असून, द्राक्षमण्यांना तडे जाण्याची भीती निर्माण झाल्याने नवीनच संकट उभे ठाकले आहे.

ठळक मुद्देआता द्राक्षे ‘आंबट’ होण्याची चिन्हे थंडीमुळे द्राक्षबागांमध्ये शेकोट्या पेटविण्याची वेळ हा फेरा खरेच शेतकरीवर्गाच्या सहनशीलतेचा अंत पाहणाराच

कांद्याचा वांधा पूर्णत: अथवा समाधानकारकरीत्या संपला नसताना आता द्राक्षे ‘आंबट’ होण्याची चिन्हे आहेत. जिल्ह्यातील कडाक्याच्या थंडीमुळे द्राक्षबागांमध्ये शेकोट्या पेटविण्याची वेळ आली असून, द्राक्षमण्यांना तडे जाण्याची भीती निर्माण झाल्याने नवीनच संकट उभे ठाकले आहे.निसर्ग कधी कधी अशी काही परीक्षा घेतो की, मनुष्याला कोलमडून पडण्याखेरीज गत्यंतर उतर नाही. यंदा पाऊस कमी झाल्याने दुष्काळी परिस्थिती ओढवली, त्यामुळे अगोदरच बळीराजा संकटग्रस्त ठरला आहे. त्यात कांदा गडगडला. त्यासंदर्भात आंदोलने घडून आल्याने राज्य शासनाकडून अल्पसे का होईना दोनशे रुपये प्रतिक्विंटल अनुदान घोषित केले गेले. ते पुरेसे नाहीच; पण बुडत्याला काडीचा आधार म्हणून त्याकडे पाहता यावे. या ससेहोलपटीतून कांदा उत्पादक उसासा घेत नाही तोच द्राक्षे उत्पादकांना हुडहुडी भरली आहे. राज्यातील नीचांकी तापमानाची नोंद नाशिक जिल्ह्यात झाली असून, निफाड तालुक्यात तर पारा ६.६ अंश सेल्सिअसपर्यंत घसरला आहे. याच तालुक्यात द्राक्ष उत्पादनही मोठ्या प्रमाणात होते. रब्बीच्या गहू, हरभरा, कांदा पिकासाठी ही थंडी लाभदायी ठरणारी असली तरी द्राक्षांसाठी मात्र धोकादायक आहे. कारण, त्यामुळे द्राक्षमणींची फुगवण होऊन साखरेचा उतारा कमी होईल. अशाने मणी तडकण्याचाही धोका आहे. शिवाय, थंडीमुळे भुरी रोगाचा प्रादुर्भावही घडून येत असतो. याच्या परिणामी द्राक्ष उत्पादनात घट होईल, तसेच प्रतही घसरेल जी निर्यातीकरिता अडचणीची ठरेल. निर्यातीकरिताच्या द्राक्ष उत्पादनासाठी यावर्षी आतापर्यंत जिल्ह्यातील २७ हजारांहून अधिक प्लॉट्सची नोंदणी कृषी खात्याकडे झाली आहे. डिसेंबर अखेरपर्यंत ती गेल्यावर्षी झाली होती तेवढी म्हणजे ३० हजारांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. द्राक्ष निर्यातीकडे वाढलेला कल व त्यातून फिरणारे अर्थकारण याची प्रचिती यातून यावी. परंतु थंडीतली वाढ कायम राहिल्यास द्राक्षांना फटका बसून उत्पादन व निर्यात अशा पुढील साऱ्या प्रक्रियेवर परिणाम घडून येईल. निसर्ग व नशिबाचा हा फेरा खरेच शेतकरीवर्गाच्या सहनशीलतेचा अंत पाहणाराच आहे. निसर्गाचे बिघडलेले ताळतंत्र पाहता शाश्वत शेती हाच यावरील उपाय ठरावा; परंतु त्याकडे वळण्यापूर्वी असे वा इतके फटके सोसणे अवघड ठरले आहे.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरीTemperatureतापमानenvironmentवातावरण