शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
2
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
3
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
4
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
5
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
6
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...
7
निळेशार डोळे असलेल्या मॉडेलचं डोनाल्ड ट्रम्प का करतायत तोंडभरून कौतुक? कारण खूपच खास
8
Vivo Y400 5G: एमोलेड डिस्प्ले, ६००० mAh बॅटरी आणि बरेच काही; विवो व्हाय ४०० भारतात लॉन्च!
9
Video - "पळ भावा पळ..."; ढिगाऱ्यात अडकलेल्या दोघांनी मृत्यूला दिला चकवा, पुरात चमत्कार
10
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
11
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
12
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
13
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
14
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
15
तयारीला लागा! उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश; मनसेसोबतच्या युतीबाबत म्हणाले...
16
बेस्टच्या ऑफिसमध्ये पैसे उडवून डान्स? २०१७ मधल्या 'त्या' घटनेवर माधवी जुवेकर म्हणाली- "रात्री दोन मंत्र्यांचे फोन आले..."
17
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
18
Vastu Tips: दारात ठेवण्याचे पायपुसणे हिरव्याच रंगाचे का असावे? खरंच होतो का भाग्योदय?
19
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
20
Shravan Purnima 2025: नारळी पौर्णिमेला समुद्राला श्रीफळ का अर्पण करतात? त्यामागे आहे 'हे' विशेष कारण!

आता द्राक्षांची दैना !

By किरण अग्रवाल | Updated: December 23, 2018 01:26 IST

कांद्याचा वांधा पूर्णत: अथवा समाधानकारकरीत्या संपला नसताना आता द्राक्षे ‘आंबट’ होण्याची चिन्हे आहेत. जिल्ह्यातील कडाक्याच्या थंडीमुळे द्राक्षबागांमध्ये शेकोट्या पेटविण्याची वेळ आली असून, द्राक्षमण्यांना तडे जाण्याची भीती निर्माण झाल्याने नवीनच संकट उभे ठाकले आहे.

ठळक मुद्देआता द्राक्षे ‘आंबट’ होण्याची चिन्हे थंडीमुळे द्राक्षबागांमध्ये शेकोट्या पेटविण्याची वेळ हा फेरा खरेच शेतकरीवर्गाच्या सहनशीलतेचा अंत पाहणाराच

कांद्याचा वांधा पूर्णत: अथवा समाधानकारकरीत्या संपला नसताना आता द्राक्षे ‘आंबट’ होण्याची चिन्हे आहेत. जिल्ह्यातील कडाक्याच्या थंडीमुळे द्राक्षबागांमध्ये शेकोट्या पेटविण्याची वेळ आली असून, द्राक्षमण्यांना तडे जाण्याची भीती निर्माण झाल्याने नवीनच संकट उभे ठाकले आहे.निसर्ग कधी कधी अशी काही परीक्षा घेतो की, मनुष्याला कोलमडून पडण्याखेरीज गत्यंतर उतर नाही. यंदा पाऊस कमी झाल्याने दुष्काळी परिस्थिती ओढवली, त्यामुळे अगोदरच बळीराजा संकटग्रस्त ठरला आहे. त्यात कांदा गडगडला. त्यासंदर्भात आंदोलने घडून आल्याने राज्य शासनाकडून अल्पसे का होईना दोनशे रुपये प्रतिक्विंटल अनुदान घोषित केले गेले. ते पुरेसे नाहीच; पण बुडत्याला काडीचा आधार म्हणून त्याकडे पाहता यावे. या ससेहोलपटीतून कांदा उत्पादक उसासा घेत नाही तोच द्राक्षे उत्पादकांना हुडहुडी भरली आहे. राज्यातील नीचांकी तापमानाची नोंद नाशिक जिल्ह्यात झाली असून, निफाड तालुक्यात तर पारा ६.६ अंश सेल्सिअसपर्यंत घसरला आहे. याच तालुक्यात द्राक्ष उत्पादनही मोठ्या प्रमाणात होते. रब्बीच्या गहू, हरभरा, कांदा पिकासाठी ही थंडी लाभदायी ठरणारी असली तरी द्राक्षांसाठी मात्र धोकादायक आहे. कारण, त्यामुळे द्राक्षमणींची फुगवण होऊन साखरेचा उतारा कमी होईल. अशाने मणी तडकण्याचाही धोका आहे. शिवाय, थंडीमुळे भुरी रोगाचा प्रादुर्भावही घडून येत असतो. याच्या परिणामी द्राक्ष उत्पादनात घट होईल, तसेच प्रतही घसरेल जी निर्यातीकरिता अडचणीची ठरेल. निर्यातीकरिताच्या द्राक्ष उत्पादनासाठी यावर्षी आतापर्यंत जिल्ह्यातील २७ हजारांहून अधिक प्लॉट्सची नोंदणी कृषी खात्याकडे झाली आहे. डिसेंबर अखेरपर्यंत ती गेल्यावर्षी झाली होती तेवढी म्हणजे ३० हजारांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. द्राक्ष निर्यातीकडे वाढलेला कल व त्यातून फिरणारे अर्थकारण याची प्रचिती यातून यावी. परंतु थंडीतली वाढ कायम राहिल्यास द्राक्षांना फटका बसून उत्पादन व निर्यात अशा पुढील साऱ्या प्रक्रियेवर परिणाम घडून येईल. निसर्ग व नशिबाचा हा फेरा खरेच शेतकरीवर्गाच्या सहनशीलतेचा अंत पाहणाराच आहे. निसर्गाचे बिघडलेले ताळतंत्र पाहता शाश्वत शेती हाच यावरील उपाय ठरावा; परंतु त्याकडे वळण्यापूर्वी असे वा इतके फटके सोसणे अवघड ठरले आहे.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरीTemperatureतापमानenvironmentवातावरण