शहरं
Join us  
Trending Stories
1
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
2
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
3
Viral Video : चीनला पोहोचलेल्या भारतीय व्यक्तीने दाखवलं असं काही की पाहणारेही झाले थक्क! तुम्हीही कमाल बघाच
4
चिंता वाढली! एलियन्स, AI आणि तिसरे महायुद्ध; बाबा वेंगाची 2026 वर्षाबद्दल भविष्यवाणी काय?
5
मनोज जरांगेंच्या बैठकीत मधमाशांचा हल्ला, सहकाऱ्यांनी अंगावर उपरणी टाकून पाटलांना वाचवलं
6
"माझ्याशी लग्न कर, तुला सगळ्या सिनेमात घेईन...", प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने अभिनेत्याला दिलेली ऑफर, नकार देताच करिअर संपवलं
7
हैदराबाद विद्यापीठाच्या निवडणुकीत ABVP चा मोठा विजय; NSUI ला नोटापेक्षा कमी मते...
8
VIRAL : फक्त तिकीटच नाही, तरुणीचे इन्स्टाग्राम अकाऊंटही तपासले! रेल्वेतील टीटीईचा धक्कादायक प्रताप
9
टॅरिफ, H1B व्हिसानंतर अमेरिकेचा आता भारतीय कोळंबीवर डोळा! मच्छीमारांवर संकट येणार?
10
पती, पत्नी आणि तो... वेगळचं प्रकरण! माहेर अन् सासरच्यांनी मिळून केलं विवाहितेचं अपहरण; पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
11
लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या गर्लफ्रेंडची हत्या; सुटकेसमध्ये भरून मृतदेह १०० किमी दूर नदीत फेकला
12
५००० परदेशी लोकांना नोकरीवर बसवले, १६ हजार अमेरिकींना काढले...; ट्रम्प प्रशासनाने H-1B चा पाढाच वाचला...
13
'तुम्ही कुणाला त्रास दिला, तर अजिबात ऐकणार नाही'; अजित पवारांचा इशारा
14
निवडून आलेल्याला २ कोटी मात्र आमदार नसतानाही मला २० कोटी मिळतात; सदा सरवणकरांचं वादग्रस्त विधान
15
पंतप्रधान मोदी आज देशवासियांना संबोधित करणार; पाच वाजता कोणत्या विषयावर बोलणार?
16
शेअर बाजारातील जोखीम घटक काय असतो? तुमची गुंतवणूक वाचवून चांगला नफा कसा कमवायचा?
17
हुंड्यासाठी सुनेला मारहाण, खोलीत कोंडून विषारी साप सोडला; सासरच्यांनी गाठला क्रूरतेचा कळस
18
स्वप्नातील एसयूव्ही खरेदीची संधी! महिंद्रा स्कॉर्पिओ झाली ₹२.१५ लाखांनी स्वस्त; जाणून घ्या नवीन किंमत
19
Nagpur Crime: घरातून बाहेर पडला अन् कारमध्ये मिळाला व्यावसायिकाचा मृतदेह; मृत्यू की हत्या?
20
युद्ध युरोपच्या दाराशी! रशियन ड्रोनची नाटो देशांच्या हद्दीत घुसखोरी, तिसऱ्या महायुद्धाचा धोका वाढला?

आता शेतकऱ्यांच्या भूमिकेकडे लक्ष

By admin | Updated: July 9, 2017 00:09 IST

नाशिक : जमिनीचे दर जाहीर केल्याने आता त्यावर शेतकरी काय भूमिका घेतात याकडे साऱ्यांचे लक्ष लागून आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : गेल्या वर्षभरापासून वादग्रस्त ठरू पाहणाऱ्या मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गासाठी लागणाऱ्या जमिनीचे दर अखेर प्रशासनाने जाहीर केल्याने आता त्यावर शेतकरी काय भूमिका घेतात याकडे साऱ्यांचे लक्ष लागून आहे. विशेष म्हणजे शिवसेना व राष्ट्रवादी कॉँग्रेसने समृद्धी महामार्गाला विरोध दर्शविला असल्यामुळे त्यांची भूमिकाही यात महत्त्वाची मानली जात असून, याप्रश्नी अगोदरपासून आग्रही असलेल्या किसान सभेने तातडीने बैठक घेऊन विरोध जाहीर केला आहे. मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग नाशिक जिल्ह्यातील सिन्नर व इगतपुरी या दोन तालुक्यांतून जात असून, या दोन्ही तालुक्यांतील ग्रामस्थांनी महामार्गाची घोषणा झाल्यापासून आपला विरोध कायम ठेवला आहे. इगतपुरी तालुक्यात आजवर धरणे, तलाव, रेल्वे यासाठी वेळोवेळी जमिनी संपादित झाल्याने शेतकऱ्यांना उदरनिर्वाहासाठी जागा नसल्याची भूमिका येथील ग्रामस्थांनी घेतली, तर सिन्नर तालुक्यातही पंचतारांकित औद्योगिक वसाहत, रतन इंडिया बुल, माळेगाव औद्योगिक वसाहत, नाशिक-पुणे महामार्गासाठी जागा संपादित करण्यात आली आहे. त्यामुळे पुन्हा समृद्धी महामार्गासाठी जागा घेऊन सरकार शेतकऱ्यांना भूमिहीन करीत असल्याचा आरोप शेतकऱ्यांचा आहे. त्यामुळे समृद्धीसाठी जमिनीची मोजणी करू देण्यासच जागामालकांनी विरोध दर्शविला, प्रशासनाने आधुनिक तंत्रज्ञानाचा म्हणजेच ड्रोनचा वापर करून मोजणीचा प्रयत्न केला असता त्यालाही नकार देण्यात आला. जागामालक शेतकऱ्यांची समजूत काढून प्रशासनाने जागेची मोजणी केली असली तरी, सिन्नर तालुक्यातील शिवडे, मऱ्हळ, पाथरे, घोरवड, डुबेरे व वारेगाव या सहा गावांमध्ये अद्याप मोजणी होऊ शकलेली नाही. समृद्धी महामार्गासाठी राज्यातील दहा जिल्ह्यांमध्ये विरोध होत असताना शासनाने सदरचा प्रकल्प पूर्ण करण्याचे ठरवून ठिकठिकाणी जागा खरेदीचे दर जाहीर केले आहेत. नाशिक जिल्ह्यापेक्षा अन्य जिल्ह्यांमध्ये सरसकट शेतकऱ्यांचा या प्रकल्पाला विरोध नाही, मात्र नाशिक जिल्ह्यातील दोन्ही तालुक्यांतील ४८ गावांमधील शेतकरी जागा देण्यास अनुत्सुक आहेत अशात प्रशासनाने हेक्टरी भाव जाहीर करून शेतकऱ्यांना जादा रकमेचे आमिष दाखवून भुलविण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्यास आता शेतकरी कितपत प्रतिसाद देतील त्यावरच या महामार्गाचे भवितव्य अवलंबून असले तरी, प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या मते या महामार्गासाठी जमीन न मिळाल्यास भूसंपादन कायद्याचा वापर करून सक्तीने जमिनी ताब्यात घेऊन प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्याचा पर्याय खुला ठेवण्यात आला आहे.