शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
2
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
3
IND vs ENG: गौतम गंभीर कुठेच दिसेना... टीम इंडियासोबत 'कोच' म्हणून VVS लक्ष्मण इंग्लंडमध्ये, पण का?
4
Sonam Raghuvanshi : चक्की चालवणारे सोनमचे बाबा कसे झाले करोडपती? कमाई एवढी की नातेवाईकांच्या नावावर खाती
5
अहमदाबाद विमान अपघाताबाबत मोठा खुलासा; तीन महिन्यांपूर्वी बदलले होते विमानाचे इंजिन...
6
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली
7
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
8
Ahmedabad plane crash: जीव वाचविण्यासाठी बाल्कनीतून मारल्या उड्या, अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत नवी माहिती समोर
9
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
10
Sonam Raghuwanshi: नागा तलवारीने वार! रक्तबंबाळ राजा ओरडायला लागताच सोनम गेली पळून; त्याचा जीव गेल्यावरच आली परत
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
13
"भारताचे तुकडे पाडून १९७१ च्या पराभवाचा बदला घेऊ’’, पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर यांची धमकी
14
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
15
Life Lesson: सगळं काही छान सुरळीत सुरु असताना अचानक आयुष्यात संकटं का येतात?
16
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
17
अहमदाबादचा दुर्देवी विमान अपघात अन् घटस्फोट कॅन्सल! बॉलिवूड अभिनेत्रीने सांगितलं यामागचं नेमकं कनेक्शन
18
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
19
India- Pakistan: पाकने धमक्या देऊ नये; भारताकडे त्यांच्यापेक्षा १० अधिक अण्वस्त्रे

मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेकडे आता नाशिककरांचे लक्ष 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2018 01:09 IST

महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी करवाढीच्या घेतलेल्या निर्णयाला महासभेने स्थगिती देण्याचा निर्णय घेतला असला तरी, आयुक्तांकडून मात्र त्याबाबत माघार घेतली जाण्याची शक्यता धूसर मानली जात आहे. त्यामुळे, संवेदनशील बनलेल्या या प्रकरणात खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच हस्तक्षेप करावा लागणार असून, त्यांच्या भूमिकेकडे आता नाशिककरांचे लक्ष लागून असणार आहे.

नाशिक : महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी करवाढीच्या घेतलेल्या निर्णयाला महासभेने स्थगिती देण्याचा निर्णय घेतला असला तरी, आयुक्तांकडून मात्र त्याबाबत माघार घेतली जाण्याची शक्यता धूसर मानली जात आहे. त्यामुळे, संवेदनशील बनलेल्या या प्रकरणात खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच हस्तक्षेप करावा लागणार असून, त्यांच्या भूमिकेकडे आता नाशिककरांचे लक्ष लागून असणार आहे.  आयुक्त तुकाराम मुंढे यांनी शहरातील इंच न् इंच जमिनीवर कर लागू करण्याचा निर्णय घेतल्याने त्याचे तीव्र पडसाद उमटत आहेत. जिझिया कर म्हणूनच त्याची संभावना केली जाऊ लागली आहे. नागरिकांत वाढता रोेष लक्षात घेता सोमवारी (दि.२३) झालेल्या विशेष महासभेत सर्वपक्षीय नगरसेवकांनी आयुक्तांच्या निर्णयाला कडाडून विरोध दर्शविला. सुमारे दहा तास चाललेल्या महासभेत तब्बल ८६ नगरसेवकांनी आपल्या भावना व्यक्त करत सदर बेकायदेशीर करवाढ रद्द करण्याची मागणी केली. सभागृहाची भावना लक्षात घेऊन महापौरांनी आयुक्तांनी घेतलेल्या करवाढीच्या निर्णयाला स्थगिती दिली आणि पोटनिवडणुकीच्या आचारसंहिता काळात आयुक्तांनी अध्यादेश जारी केल्याने आचारसंहिता भंगाची तक्रार निवडणूक आयोगाकडे करण्याचे आदेशित केले. महासभेत आयुक्तांविरुद्ध सर्वपक्षीय नगरसेवकांनी एल्गार पुकारल्याने आता नगरसेवक विरुद्ध आयुक्त यांच्यात संघर्ष आणखी गडद होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. महासभेत आयुक्तांच्या गैरहजेरीत प्रशासनातील अधिकाऱ्यांनी घेतलेली भूमिका पाहता आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याकडून करवाढीचा निर्णय मागे घेण्याची शक्यता कमीच आहे. करयोग्य मूल्य निश्चित करण्याचा अधिकार आयुक्तांचा असल्याने तो रद्द करणे अथवा त्याला स्थगिती देण्याचा अधिकार हा आयुक्तांचाच असणार आहे. परिणामी, महासभेला त्यावर निर्णय घेता येणार नाही, असे मत खासगीत प्रशासनातील अधिकाºयांकडून व्यक्त केले जात आहे. त्यामुळे, महासभेने स्थगिती दिली असली तरी आयुक्तांकडून सदरच्या निर्णयाची अंमलबजावणी केली जाण्याची शक्यता आहे. एकदा त्याबाबतची बिले मिळकतधारकांना वितरित झाल्यास निर्णय बदलता येणार नाही. त्यामुळे, निर्णयाची अंमलबजावणी होण्यापूर्वीच मुख्यमंत्र्यांनाच त्याबाबतचा अंतिम निर्णय घेता येणार आहे. आयुक्त विरुद्ध महासभा या संघर्षात मुख्यमंत्र्यांकडून हस्तक्षेप झाला तरच करवाढीचा निर्णय रद्दबातल ठरू शकतो. त्यामुळे, आता करवाढीच्या निर्णयाचा चेंडू मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात असून, मुख्यमंत्री नेमकी काय भूमिका घेतात, याकडे नाशिककरांचे लक्ष लागून आहे.महासभेने करवाढीच्या निर्णयाला स्थगिती दिल्यानंतर आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. मंगळवारी (दि.२४) आयुक्त सायंकाळपर्यंत महापालिका मुख्यालयात आलेले नव्हते. त्यामुळे, त्यांची भूमिका स्पष्ट होऊ शकली नाही. आयुक्त तुकाराम मुंढे आणि उपआयुक्त रोहिदास दोरकूळकर हे मुंबईत बैठकीसाठी गेल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. मात्र, मुख्यमंत्र्यांनीच आयुक्त व उपआयुक्तांना करवाढीच्या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी मुंबईत बोलावून घेतल्याची चर्चा महापालिका वर्तुळात रंगली होती.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिका