शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

आल्या नोटिसा,  घरे खाली करा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2019 01:25 IST

पावसाळा आला की महापालिकेच्या वतीने पूर्वतयारीचा भाग म्हणून धोकादायक घरांना नोटिसा बजावल्या जातात, त्यानुसार यंदाही संपूर्ण शहरातील ३९७ मिळकतधारकांना नोटिसा बजावण्यात आल्या असून, धोकादायक भाग उतरवून घेण्यास सूचित करण्यात आले आहे.

नाशिक : पावसाळा आला की महापालिकेच्या वतीने पूर्वतयारीचा भाग म्हणून धोकादायक घरांना नोटिसा बजावल्या जातात, त्यानुसार यंदाही संपूर्ण शहरातील ३९७ मिळकतधारकांना नोटिसा बजावण्यात आल्या असून, धोकादायक भाग उतरवून घेण्यास सूचित करण्यात आले आहे. तथापि, बहुतांशी नागरिक नोटिसांना प्रतिसाद देत नाही त्यातच गेल्यावर्षी तांबट लेन येथे वाडा पडून घडलेल्या दुर्घटनेत दोन जणांचा बळी गेल्यानंतरदेखील रहिवासी जागचे हलले नव्हते त्यामुळे महापालिकेच्या नोटिसांच्या सोपस्काराने काय होणार? असा प्रश्न केला जात आहे.संपुर्ण शहराच्या गावठाण भागातील जुने वाडे असून, अनेक वाडे शंभर-दीडशे वर्ष जुने आहेत. बहुतांशी वाडे धोकादायक झाले असून, ते पडण्याच्या स्थितीत आहेत. काही ठिकाणी भाडेकरू आणि घरमालक वाददेखील आहे. महापालिकेच्या वतीने दरवर्षी नोटिसा बजावल्या जातात, परंतु त्याचा परिणाम अत्यंत नगण्य स्वरूपात होतो. यंदा पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर एकूण ३९७ नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.यात पंचवटीत १५०, नाशिक पश्चिममध्ये १०३, नाशिक पूर्व विभागात ३९, नाशिकरोड विभागात ६७, सातपूरमध्ये १५ तर सिडको विभागात २३ अशा ३९७ जणांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे पूर्व विभागात सर्वाधिक वाडे असताना अन्य विभागात संबंधितांनी धोकादायक भाग त्वरित उतरवून घ्यावेत, अन्यथा महापालिकेच्या वतीने असे धोकादायक भाग उतरवून संबंधितांकडून खर्च वसूल केला जाईल, असे नमूद करण्यात आले आहे.काजीगढीचा प्रश्न कायमगेल्या काही वर्षांपासून जुन्या नाशकातील काजीगढी ढासळू लागल्याने धोका वाढला आहे. महापालिकेने संबंधितांना स्थलांतरित करण्यासाठी प्रयत्न करून उपयोग झालेला नाही. पोलिसांमार्फत नोटिसा बजावूनही उपयोग झालेला नाही. आताही जिल्हा प्रशासनाने महापालिकेला पत्र दिले असून, काजीच्या गढीबाबत उचित कार्यवाही करण्याचे निर्र्देश दिले आहेत. महापालिका त्यावर काय भूमिका घेते हे महत्त्वाचे आहे.तांबट लेनमधील  प्रश्न कायमगेल्यावर्षी तांबट लेनमध्ये वाडा पडल्यानंतर महापालिकेने संबंधिताना तेथे राहण्यास मनाई करणाऱ्यांना नोटिसा बजावल्या. त्यावर कारवाई न झाल्याने पोलीस ठाण्यास पत्र दिले होते. परंतु पोलीस खात्यानेदेखील अंग काढून घेतले होते त्यामुळे नोटिसांच्या सोपस्कारापलीकडे काय होणार हा प्रश्न आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाRainपाऊस