शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदू समाज संघटित आणि बलशाली होणे, या देशाच्या सुरक्षिततेची अन् विकासाची गॅरंटी; कारण...!" - मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
काय आहे 'सर क्रिक' वाद? ज्यावरून भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची पाकिस्तानला थेट धमकी
3
पहलगाम घटनेने आपल्याला शिकवले की कोण शत्रू आणि कोण मित्र: मोहन भागवत
4
भारत गाझामध्ये सैन्य पाठवणार? संयुक्त राष्ट्रांच्या शांती सैनिकांची परिषद बोलावली, चीन आणि पाकिस्तानला बोलावले नाही
5
IND vs WI: वेस्ट इंडीजविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात शुभमन गिलच्या नावावर नकोशा विक्रमाची नोंद!
6
Archana Puran Singh : एकेकाळी जेवणासाठी अभिनेत्रीकडे होते फक्त ११ रुपये; संघर्षाचे दिवस आठवून झाली भावुक
7
IND vs WI : DSP सिराजची 'दबंगगिरी'! कमबॅकमध्ये दिग्गज स्टारच्या पोराच्या पदरी 'भोपळा'
8
पत्नीच्या नावे 'या' योजनेत १ लाख रुपये जमा करा, २ वर्षांनंतर तुम्हाला किती रिटर्न मिळेल? पटापट पाहा डिटेल्स
9
दे दणादण! रस्त्याच्या कडेला स्टॉल लावण्यावरुन भाजपाचे २ नगरसेवक भिडले, झाली हाणामारी
10
बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपाला झटका; ४ वेळा आमदार राहिलेल्या नेत्याचा पक्षाला रामराम
11
एलन मस्क बनले जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती! संपत्ती ५०० बिलियन डॉलरवर, इतकी कमाई आली कोठून?
12
हिंसा हे प्रश्नांचं उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य; सरसंघचालकांनी टोचले राजकीय पक्षांचे कान
13
Success Story: १९२९ मध्ये बनवलेलं हे क्रीम, आजही घराघरात होतो वापर; कोलकाताच्या या व्यक्तीनं उभी केली १६० कोटींची कंपनी
14
वडील करणार होते पाचव्यांदा लग्न; संपत्तीसाठी लेकाने काढला काटा, पोलिसांची केली दिशाभूल अन्...
15
'पीओके'मध्ये निदर्शने हिंसक झाली, पाकिस्तानी सुरक्षा दलांनी गोळीबार केला; १२ नागरिकांचा मृत्यू
16
ट्रम्प टॅरिफमुळे भारताच्या प्रगतीला ब्रेक लागेल? रिझर्व्ह बँकेचा इशारा, 'फक्त जीएसटी कपात पुरेशी नाही...'
17
Video: "आय लव्ह मराठी! मी मराठी शिकतोय, माझ्याशी मराठीत बोला..."; अबू आझमींना झाली उपरती
18
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये संपेल पेन्शनचं टेन्शन, दर महिन्याला मिळतील ₹२००००
19
महात्मा गांधींच्या पणतीला पाहिलंत का? दिसायला आहे खूप ग्लॅमरस, गाजवतेय हॉलिवूड
20
'मानवी इतिहासाचा मार्ग बदलला', पंतप्रधान मोदींनी राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहिली

सिंहस्थातील साधूग्रामसाठी आरक्षित जागांच्या मालकांना नोटीसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2018 18:39 IST

बांधकाम हटवा : मोबदला न देता महापालिकेची दांडगाई

ठळक मुद्दे १५ दिवसांत बांधकामे न हटविल्यास कारवाईचा इशारा महापालिकेने सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर सुमारे ३५० एकर जागा साधूग्रामसाठी आरक्षित केलेली आहे

नाशिक - सिंहस्थ कुंभमेळा काळात साधूग्रामसाठी आरक्षित केलेल्या सुमारे साडेतीनशे एकर जागेवर विनापरवाना बांधकामे केल्याबद्दल जागा मालकांना महापालिकेने नोटीसा बजावल्या असून १५ दिवसांत बांधकामे न हटविल्यास कारवाईचा इशारा दिला आहे. मात्र, जागामालकांना कसलाही मोबदला न देता स्वत:च्याच जागांवर उदरनिर्वाहासाठी बांधकाम करू न देणा-या महापालिकेच्या या दांडगाईबद्दल संबंधित शेतकरीवर्गाने तिव्र संताप व्यक्त केला आहे.महापालिकेने सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर सुमारे ३५० एकर जागा साधूग्रामसाठी आरक्षित केलेली आहे. सिंहस्थात सदर जागा महापालिकेने संबंधित शेतक-यांनी वर्षभराच्या कालावधीसाठी भाडेपट्टीने ताब्यात घेऊन साधुग्रामची उभारणी केली होती. त्यावेळी, साधूग्राममध्ये विविध सुविधा पुरविताना जागेवर कच, खडी टाकण्यात येऊन ड्रेनेज, पाण्याची पाईपलाईनसाठी खोदकामही केले होते. त्यावेळी, सुमारे दहा लाख रूपये वार्षिक भाडे संबंधित जागामालकांना देण्यात आले होते. मात्र, अद्याप महापालिकेने सदर जागेचे संपादन केलेले नसून शेतक-यांनी रोख मोबदल्याऐवजी टीडीआर घ्यावा, यासाठी आग्रह धरला जात आहे. परंतु, शेतक-यांकडून नवीन भूसंपादन कायद्यानुसार वाढीव दराने रोख स्वरुपातच मोबदला मागितला जात आहे. सिंहस्थ काळ संपल्यानंतर, सदर जागांवर शेतक-यांनी आपल्या उदरनिर्वाहासाठी मंगल कार्यालये, गोडावूनचे शेड, जनावरांचे गोठे आदी बांधकामे उभारलेली आहेत. परंतु, सदर जागेवर मालकांना केवळ शेतीच करता येईल, अशी भूमिका घेत महापालिकेने जागामालकांना नोटीसा बजावत जागांवरील बांधकामे काढून टाकण्याच्या नोटीसा बजावल्या आहेत. त्यामुळे शेतकरीवर्ग संतप्त झाला आहे. याबाबत काही शेतक-यांनी थेट मुख्यमंत्र्यांकडेच दाद मागण्याचे ठरविले आहे.सांगा, कसे जगायचे!सिंहस्थात साधुग्रामसाठी जागा ताब्यात घेताना त्याठिकाणी खडी, मुरूम, कच टाकून ठेवण्यात आली होती तसेच ड्रेनेज, पाणीपुरवठ्यासाठी पाईपलाईनही टाकण्यात आली होती. नंतर, संबंधित ठेकेदारांनी कच, मुरूम तसेच पाईपलाइन काढून नेली असली तरी त्यामुळे जमिनीचा पोत घसरला आहे. ती कसण्यायोग्य राहिली नसल्याचे शेतक-यांचे म्हणणे आहे. त्यामुळे, जागामालकांनी आपल्या उदरनिर्वाहासाठी त्याठिकाणी मंगलकार्यालयासह अन्य बांधकामे उभी केली आहेत. परंतु, जागेचा मोबदलाही द्यायचा नाही आणि मालकीच्या जागेवर उदरनिर्वाहासाठी काही बांधकाम करण्यासाठी परवानगीही द्यायची नाही, त्यामुळे कसे जगायचे, असा सवाल शेतकरीवर्गाकडून उपस्थित केला जात आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाFarmerशेतकरी