शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "आज मीही सांगतो... घाबरू नका, पळू नका"; पंतप्रधान मोदींची राहुल गांधींवर खोचक टीका
2
Lalu Prasad Yadav : "पाकिस्तान, स्मशानभूमी, हिंदू-मुस्लिम..."; लालू प्रसाद यादव यांचा नरेंद्र मोदींना खोचक टोला
3
पराभव, भीती की रणनीती...! राहुल गांधींनी अमेठीऐवजी रायबरेली मतदारसंघ का निवडला?
4
Share Market Upcoming IPO : पैसे तयार ठेवा! या महिन्यात कमाईची संधी; कंपन्या IPO मधून १० हजार कोटी उभारणार
5
'माफी मागा, तुमच्या घाणेरड्या आरोपांनी...'; चित्रा वाघ यांना 'त्या' अभिनेत्याचा कारवाईचा इशारा
6
सुशांत सिंह राजपूतच्या जीवाला होता धोका? बहिणीने केला मोठा खुलासा
7
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
8
जागावाटपाच्या वाटाघाटीत शिंदे जिंकले, जे हवे होते ते मतदारसंघ घेतले; भाजपाने नेमके काय साधले?
9
Kangana Ranaut : "राजपुत्र पत्नीसोबत चांगलं वागत नाही, छळ करतात"; कंगनाचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर पलटवार
10
"शिंदे सरकारच त्यांचा माज उतरवेल", मराठी सिनेमांना प्राइम शो न देणाऱ्या मल्टिप्लेक्सबाबत प्रसाद ओकचं मोठं वक्तव्य
11
वाघ समोरून हल्ला करतो, झुडपात बसून कारस्थान करत नाही; राऊतांचा विश्वजित कदमांना खोचक टोला
12
Adani Ports Share Price : ₹१७०० पार जाऊ शकतो Adani समूहाचा 'हा' शेअर; वर्षभरात पैसे केलेत दुप्पट, जाणून घ्या
13
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : ठाकरे गटाच्या अडचणीत वाढ, विजय करंजकर अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार
14
सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, पायलट सुखरूप
15
"उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या त्यांच्यावर संकट आलं तर..."; नरेंद्र मोदींचं मोठं विधान
16
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेला करा 'हे' पाच खास उपाय, वास्तूला कधीही होणार नाही अपाय!
17
मोबाईल फेकला, एकानंतर एक रिक्षा बदलल्या अन्...; 'तारक मेहता' फेम सोढीने स्वतःच बनवला अपहरणाचा प्लॅन?
18
Adani Enterprises ला SEBI नं पाठवली कारणे दाखवा नोटीस, हिंडेनबर्गच्या तपासाशी निगडीत प्रकरण 
19
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
20
KL Sharma : "स्मृती इराणींपेक्षा मला अमेठी जास्त माहीत"; तिकीट मिळताच केएल शर्मा यांनी स्पष्टच सांगितलं

"ही" राजकारणाची अगर संधिसाधूपणाची वेळ नाही!

By किरण अग्रवाल | Published: April 10, 2021 9:01 PM

आपत्तीलाही इष्टापत्ती मानून संधिसाधूपणा करणारे कमी नसतात, त्यास राजकारण व प्रशासनातील तशा मानसिकतेचे लोकही कसे अपवाद ठरावेत? या दोन्ही क्षेत्रातील मोठा वर्ग अतिशय निकराने कोरोनाशी लढाई लढत असताना काही मूठभर मात्र या संकटाचेही राजकारण करताना दिसतात तेव्हा कपाळावर हात मारून घेण्याची वेळ येते.

ठळक मुद्देआंदोलन करण्यापेक्षा प्रभागातील कोरोना स्प्रेडरवर लक्ष ठेवायला हवेपक्षभेद बाजूस ठेवून सहकार्य हवे....रुग्णांना ऑक्सिजन बेड व व्हेंटिलेटर मिळणे मुश्कीलकोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांचे अंत्यसंस्कार विद्युतदाहिनीतच करण्याचे शासनाचे आदेश

सारांशनाशिक महानगर व जिल्ह्यातील कोरोनाचे संकट दिवसेंदिवस भयावह रूप धारण करीत आहे. आता तर रुग्णांना ऑक्सिजन बेड व व्हेंटिलेटर मिळणे मुश्कील झाले आहे. पैसे भरायची तयारी असूनही व ओळखीपाळखीतल्या प्रतिष्ठितांचा वशिला लावूनही रुग्णालयात भरती व्हायला मिळत नाही म्हणून अनेकांचे प्राण कंठाशी येऊन ठेपले आहेत. ही वेळ एकजुटीने व पूर्ण ताकदीने संकटाशी मुकाबला करण्याची व ते संकट परतवून लावण्याची आहे; परंतु अशास्थितीत काही जण असेही आढळून येतात, की जे यंत्रणांतील उणिवांचा शोध घेऊन आपले राजकारण रेटू पाहतात, तर काही जण संधी साधून आपले उखळ पांढरे करू पाहण्याच्या धडपडीत दिसतात; हे दुर्दैवी, शोचनीय व म्हणूनच धिक्कारार्ह म्हणायला हवे.तिकडे लसींच्या पुरवठ्यावरून राज्य व केंद्रात कलगीतुरा सुरू झाल्याचे पाहता इकडे महापालिकेच्या रुग्णालयात पुरेशा सुविधा नाहीत म्हणून एका लोकप्रतिनिधी असलेल्या भगिनीने उपोषणाचे हत्यार उपसलेले बघावयास मिळाले. ही आता आंदोलनाची वेळ आहे का? अनेक वर्षांपासून याच भागाचे प्रतिनिधित्व करत असताना कधी या बाबींकडे लक्ष दिले नाही; पण आता महापालिकेत दुसऱ्यांची सत्ता आहे म्हणून आंदोलनबाजी केली गेली. सर्वत्र भय दाटले असताना व फिजिकल डिस्टन्सिंगचे आवाहन केले जात असताना एका पक्षाने मेळावे भरविणे चालविले आहे. सातपूरमध्ये एका राजकीय पक्षाने थेट फलक लावून आवाहन केले की, कोरोनाबाबत कोणाच्या काही अडचणी असल्यास संपर्क करा. हरकत नाही, लोकांना मदतीचा आश्वासक हात यातून मिळेल; पण व्हेंटिलेटर मागितले गेले तर ते पुरविले जाणार आहे का? महापालिकेतर्फे केल्या जाणाऱ्या लसीकरणाचे श्रेय घेण्यासाठी वार्डावार्डात काहींनी स्वत:ची छबी झळकावून घेतल्याचेही पाहावयास मिळत आहे नाशिक महापालिकेची निवडणूक आणखी आठ-दहा महिन्यांवर येऊन ठेपली म्हटल्यावर लोकांशी जवळीक साधावी लागेल हे खरे; पण त्यासाठी आपत्तीचेही राजकारण करण्याची खरेच गरज आहे का, हा यातील प्रश्न आहे.संसर्ग रोखण्यासाठी कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांचे अंत्यसंस्कार विद्युतदाहिनीतच करण्याचे शासनाचे आदेश आहेत; पण कोरोनामुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या वाढत असल्याने नाशकातील विद्युतदाहिनी कमी पडत आहेत. यावर उपाय म्हणून नाशिकच्या पंचवटी, दसक आणि उंटवाडी या तीन स्मशानभूमीत विद्युतदाहिनी बसविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे; पण सोयीच्या ठेकेदाराला याचा ठेका मिळावा म्हणून वारंवार यासंबंधीच्या निविदांमध्ये बदल करून मुदतवाढ देण्यात येत आहे. एकीकडे अत्यावश्यक बाब म्हणून अनेक कामे तडकाफडकी करून घेतली जात असताना दुसरीकडे विद्युतदाहिनीसारख्या गरजेच्या उपकरणाबाबत वेळकाढूपणा होताना दिसणार असेल तर त्यातून संधिसाधूपणाचीच शंका घेता यावी.खरे तर कोरोनाची वाढ अगर संसर्ग रोखायचा असेल तर त्यासाठी कॉन्टॅक्ट ट्रेसिंग होणे गरजेचे आहे. प्रभागाप्रभागातील नगरसेवकांनी त्यांच्या यंत्रणेमार्फत देखरेख ठेवून बाधित रुग्ण घराबाहेर पडून ते कोरोना स्प्रेडर ठरणार नाही याची काळजी घेतली तर इतरांच्या आरोग्याला धोका पोहोचणार नाही. असे करायचे तर त्यातून नाराजी ओढवू शकते, तेव्हा मतदारांना दुखावण्यापेक्षा आंदोलन व निवेदनबाजीचा सोपा मार्ग पत्करला जाताना दिसतो. हे उचित वा समर्थनीय ठरू नये.पक्षभेद बाजूस ठेवून सहकार्य हवे....कुठे कुणाची सत्ता, याचा विचार घडीभर बाजूस ठेवायला हवा. हे संकट सर्वांवरचे आहे. समस्त मानवजातीवरचे आहे. वैद्यकीय, शासकीय व प्रशासकीय यंत्रणा मोठ्या शर्थीने त्यातून बाहेर पडण्यासाठी प्रयत्न करीत आहेत, अगदी स्वत:चा जीव धोक्यात घालून ते लढत आहेत. अशावेळी पक्षभेद बाजूस ठेवून सहकार्याच्या भूमिकेतून सर्वांनी वागणे अपेक्षित आहे. या संकटातून बाहेर पडल्यावर हवे तितके राजकारण करा; पण आता ती वेळ नाही हे संबंधितांनी लक्षात घ्यायला हवे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याNashik municipal corporationनाशिक महानगर पालिका