शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
2
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
3
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
4
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
5
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
6
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
7
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
8
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
9
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
10
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
11
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
12
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
13
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
14
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
15
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...
16
६ डॉक्टर, २ मौलवी अन् १८ अटकेत; दिल्ली स्फोटामागे कोण कोण होते, किती जण अजून फरार?
17
२ लाखांचा सौदा, रोख रक्कम आणि पुलवामा कनेक्शन... दिल्ली स्फोटात वापरलेल्या कारचा इतिहास आला समोर!
18
परभणीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे वाहन ताफ्याबाहेर पडले, यंत्रणा गोंधळात, नेमकं काय घडलं?
19
भ्रष्टाचाराची हद्द! सोने,४ लाख घेऊनही ५ लाखांची मागणी; 'API'सह चार पोलिस 'ACB'च्या ताब्यात
20
Delhi Blast : पतीच्या अंत्यसंस्कारावरुन सुनेचं सासूशी कडाक्याचं भांडण, अखेर...; दिल्ली स्फोटात गमावला जीव

सुकाणू समितीचा सरकारविरोधात असहकार, 1 मार्चपासून कर्ज, वीज बिल न भरण्याचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2018 19:06 IST

1 मार्चपासून संपाचा नव्हे, तर सरकारविरोधात असहकार आंदोलन छेडण्याचा निर्णय झाला होता. परंतु, गैरसमजातून संपाचा संदेश गेल्याने नाशिक येथील सुकाणू समितीच्या सदस्यांनी सुकाणू समिती विसर्जित केल्याचा दावा केला, मात्र शेतकरी हितासाठी निर्माण झालेली सुकाणू समिती एकसंघ असून, समितीचा मूळ उद्देश पूर्ण करण्यासाठी संबंधित सदस्यांसोबत संवाद साधून सरकारविरोधात सुकाणू समिती एकत्रित असहकाराचा लढा उभारणार असल्याची माहिती सुकाणू समिती सदस्यांनी दिली.

ठळक मुद्देसुकाणू समितीची शासकीय विश्रामगृहात बैठक सुकाणू समिती एकसंघच असल्याचा दावानाशिकच्या सदस्यांचा गैरसमज दूर करणारस्वाभीमानी संघटनेची बैठकीला अनुपस्थिती

नाशिक : औरंगाबादच्या बैठकीत 1 मार्चपासून संपाचा नव्हे, तर सरकारविरोधात असहकार आंदोलन छेडण्याचा निर्णय झाला होता. परंतु, गैरसमजातून संपाचा संदेश गेल्याने नाशिक येथील सुकाणू समितीच्या सदस्यांनी सुकाणू समिती विसर्जित केल्याचा दावा केला, मात्र शेतकरी हितासाठी निर्माण झालेली सुकाणू समिती एकसंघ असून, समितीचा मूळ उद्देश पूर्ण करण्यासाठी संबंधित सदस्यांसोबत संवाद साधून सरकारविरोधात सुकाणू समिती एकत्रित असहकाराचा लढा उभारणार असल्याची माहिती सुकाणू समितीचे सदस्य रघुनाथ पाटील, डॉ. अजित नवले, प्रतिभा शिंदे व अन्य सदस्यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.नाशिक येथील सुकाणू समितीच्या एका गटाने समिती विसर्जित केल्याची घोषणा केल्यानंतर दुसऱ्या गटाने सोमवारी (दि.1) शासकीय विश्रमगृहात राज्यस्तरीय बैठक घेऊन सुकाणू समिती एकसंघच असल्याचा दावा केला आहे. औरंगाबाद येथील बैठकीत शासनाची भूमिका शेतकरीविरोधी असून, सरकारसमोर शेतकऱ्यांचे प्रश्न ठेवण्यासाठी सुकाणू समितीने असहाकार आंदोलन पुकारण्याचा निर्णय घेतला होता. परंतु,या बैठकीनंतर शेतकरी संपाचा संदेश गेल्याने नाशिकच्या काही सदस्यांमध्ये गैरसमज निर्माण होऊन त्यांनी समिती विसर्जित करण्याची घोषणा केली. परंतु, त्यांचा गैरसमज दूर करून सुकाणू समितीने पुन्हा सरकारविरोधात एकसंघ लढा उभारण्याचा निर्णय घेतला आहे. या असहकार आंदोलनाच्या माध्यमातून शेतकरी कृषिपंपाचे वीज बिल भरणार नसून कोणत्याही प्रकारचे कर्जही फेडणार नसल्याचे यावेळी सांगण्यात आले. तसेच शेतकऱ्यांवरील केसेस मागे घेण्याचे आश्वासन महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले होते. मात्र केसेस मागे न घेता शेतकऱ्यांवर खोटे गुन्हे दाखल करून त्यांच्यावर आंदोलन करण्यास बंदी घालून मुख्यमंत्री दडपशाहीचा वापर करीत असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला. दरम्यान, या बैठकीला स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह जिल्हा परिषद सदस्य अमृता पवार यांच्या गटातील कोणीही पदाधिकारी उपस्थित नसल्याने सुकाणू समिती खरोखर एकसंघ आहे काय याविषयी संभ्रम कायम आहे. शेतकऱ्यांना कजर्माफी नको, तर कजर्मुक्ती हवी आहे. सरकारने केलेल्या कजर्माफीतही खऱ्या शेतकऱ्यांना न्याय मिळालेला नाही. त्यामुळे यापुढेही कजर्मुक्तीचा लढा सुरूच राहणार असल्याची घोषणा सुकाणू समितीच्या बैठकीत करण्यात आली. तर सरकारने 31 डिसेंबरपासून मका खरेदी बंद केली आहे. मार्केट कमिटीही कायद्याने चालत नसून त्यावर सरकारचा अंकुश नाही. त्यात सरकारला मुंबई विद्यापीठाचा निकाल ऑनलाइन लावता येत नसताना मका खरेदी, विमा आणि कजर्मुक्तीसाठी शेतकऱ्यांना ऑनलाइन प्रक्रिया करण्यास सांगत आहे. त्यावरूनच सरकारचे शेती व शेतकरीविरोधी धोरण दिसून येत असल्याचे शेतकरी नेते रघुनाथ पाटील यांनी यावेळी सांगितले.

टॅग्स :FarmerशेतकरीNashikनाशिकagitationआंदोलन