शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
2
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
3
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
4
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
5
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
6
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
7
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
8
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
9
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
10
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
11
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
12
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
13
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
14
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
15
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
16
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
17
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
18
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
19
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
20
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार

सुकाणू समितीचा सरकारविरोधात असहकार, 1 मार्चपासून कर्ज, वीज बिल न भरण्याचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2018 19:06 IST

1 मार्चपासून संपाचा नव्हे, तर सरकारविरोधात असहकार आंदोलन छेडण्याचा निर्णय झाला होता. परंतु, गैरसमजातून संपाचा संदेश गेल्याने नाशिक येथील सुकाणू समितीच्या सदस्यांनी सुकाणू समिती विसर्जित केल्याचा दावा केला, मात्र शेतकरी हितासाठी निर्माण झालेली सुकाणू समिती एकसंघ असून, समितीचा मूळ उद्देश पूर्ण करण्यासाठी संबंधित सदस्यांसोबत संवाद साधून सरकारविरोधात सुकाणू समिती एकत्रित असहकाराचा लढा उभारणार असल्याची माहिती सुकाणू समिती सदस्यांनी दिली.

ठळक मुद्देसुकाणू समितीची शासकीय विश्रामगृहात बैठक सुकाणू समिती एकसंघच असल्याचा दावानाशिकच्या सदस्यांचा गैरसमज दूर करणारस्वाभीमानी संघटनेची बैठकीला अनुपस्थिती

नाशिक : औरंगाबादच्या बैठकीत 1 मार्चपासून संपाचा नव्हे, तर सरकारविरोधात असहकार आंदोलन छेडण्याचा निर्णय झाला होता. परंतु, गैरसमजातून संपाचा संदेश गेल्याने नाशिक येथील सुकाणू समितीच्या सदस्यांनी सुकाणू समिती विसर्जित केल्याचा दावा केला, मात्र शेतकरी हितासाठी निर्माण झालेली सुकाणू समिती एकसंघ असून, समितीचा मूळ उद्देश पूर्ण करण्यासाठी संबंधित सदस्यांसोबत संवाद साधून सरकारविरोधात सुकाणू समिती एकत्रित असहकाराचा लढा उभारणार असल्याची माहिती सुकाणू समितीचे सदस्य रघुनाथ पाटील, डॉ. अजित नवले, प्रतिभा शिंदे व अन्य सदस्यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.नाशिक येथील सुकाणू समितीच्या एका गटाने समिती विसर्जित केल्याची घोषणा केल्यानंतर दुसऱ्या गटाने सोमवारी (दि.1) शासकीय विश्रमगृहात राज्यस्तरीय बैठक घेऊन सुकाणू समिती एकसंघच असल्याचा दावा केला आहे. औरंगाबाद येथील बैठकीत शासनाची भूमिका शेतकरीविरोधी असून, सरकारसमोर शेतकऱ्यांचे प्रश्न ठेवण्यासाठी सुकाणू समितीने असहाकार आंदोलन पुकारण्याचा निर्णय घेतला होता. परंतु,या बैठकीनंतर शेतकरी संपाचा संदेश गेल्याने नाशिकच्या काही सदस्यांमध्ये गैरसमज निर्माण होऊन त्यांनी समिती विसर्जित करण्याची घोषणा केली. परंतु, त्यांचा गैरसमज दूर करून सुकाणू समितीने पुन्हा सरकारविरोधात एकसंघ लढा उभारण्याचा निर्णय घेतला आहे. या असहकार आंदोलनाच्या माध्यमातून शेतकरी कृषिपंपाचे वीज बिल भरणार नसून कोणत्याही प्रकारचे कर्जही फेडणार नसल्याचे यावेळी सांगण्यात आले. तसेच शेतकऱ्यांवरील केसेस मागे घेण्याचे आश्वासन महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले होते. मात्र केसेस मागे न घेता शेतकऱ्यांवर खोटे गुन्हे दाखल करून त्यांच्यावर आंदोलन करण्यास बंदी घालून मुख्यमंत्री दडपशाहीचा वापर करीत असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला. दरम्यान, या बैठकीला स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह जिल्हा परिषद सदस्य अमृता पवार यांच्या गटातील कोणीही पदाधिकारी उपस्थित नसल्याने सुकाणू समिती खरोखर एकसंघ आहे काय याविषयी संभ्रम कायम आहे. शेतकऱ्यांना कजर्माफी नको, तर कजर्मुक्ती हवी आहे. सरकारने केलेल्या कजर्माफीतही खऱ्या शेतकऱ्यांना न्याय मिळालेला नाही. त्यामुळे यापुढेही कजर्मुक्तीचा लढा सुरूच राहणार असल्याची घोषणा सुकाणू समितीच्या बैठकीत करण्यात आली. तर सरकारने 31 डिसेंबरपासून मका खरेदी बंद केली आहे. मार्केट कमिटीही कायद्याने चालत नसून त्यावर सरकारचा अंकुश नाही. त्यात सरकारला मुंबई विद्यापीठाचा निकाल ऑनलाइन लावता येत नसताना मका खरेदी, विमा आणि कजर्मुक्तीसाठी शेतकऱ्यांना ऑनलाइन प्रक्रिया करण्यास सांगत आहे. त्यावरूनच सरकारचे शेती व शेतकरीविरोधी धोरण दिसून येत असल्याचे शेतकरी नेते रघुनाथ पाटील यांनी यावेळी सांगितले.

टॅग्स :FarmerशेतकरीNashikनाशिकagitationआंदोलन