शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
3
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
4
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
5
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
6
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
7
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
8
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
9
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
10
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
11
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
12
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
13
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
14
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
15
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
16
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
17
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
18
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
19
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
20
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प

नॉन सीईटी विद्यार्थ्यांकडून दंडाच्या ५० टक्के वसुली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2019 01:48 IST

प्रवेशपात्रता परीक्षा न दिलेल्या विद्यार्थ्यांना आयुर्वेद विद्या शाखेच्या एमडी/एमएस अभ्यासक्रमासाठी प्रवेश दिल्यामुळे प्रवेश नियंत्रण समितीने संबंधित महाविद्यालयांना शैक्षणिक शुल्काच्या ५० टक्के दंड करीत सुमारे ३८ विद्यार्थ्यांचे पदवी प्रमाणपत्र रोखले आहे. या प्रकरणात पदवी अभ्यासक्रम पूर्ण करूनही विद्यार्थांना प्रमाणपत्राशिवाय पुढील संधीपासून वंचित रहावे लागत आहे. विद्यार्थ्यांच्या याच अडचणीचा फायदा घेत काही महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांकडून दंडाच्या ५० टक्के रक्कम वसूल केल्याचा प्रकार समोर आला आहे.

ठळक मुद्देआयुर्वेद महाविद्यालयांचा प्रताप : प्रमाणपत्राची प्रतीक्षा कायम

नामदेव भोर । लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : प्रवेशपात्रता परीक्षा न दिलेल्या विद्यार्थ्यांना आयुर्वेद विद्या शाखेच्या एमडी/एमएस अभ्यासक्रमासाठी प्रवेश दिल्यामुळे प्रवेश नियंत्रण समितीने संबंधित महाविद्यालयांना शैक्षणिक शुल्काच्या ५० टक्के दंड करीत सुमारे ३८ विद्यार्थ्यांचे पदवी प्रमाणपत्र रोखले आहे. या प्रकरणात पदवी अभ्यासक्रम पूर्ण करूनही विद्यार्थांना प्रमाणपत्राशिवाय पुढील संधीपासून वंचित रहावे लागत आहे. विद्यार्थ्यांच्या याच अडचणीचा फायदा घेत काही महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांकडून दंडाच्या ५० टक्के रक्कम वसूल केल्याचा प्रकार समोर आला आहे.महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाशी संलग्न सुमारे १२ महाविद्यालयांनी २०१५ वर्षात एमडी, एमएस पदवी अभ्यासक्रमासाठी काही विद्यार्थ्यांना प्रवेशपरीक्षा न घेताच प्रवेश दिले होते. हा प्रकार प्रवेश नियंत्रण समितीच्या लक्षात आल्यानंतर समितीने संबंधित महाविद्यालयांना शैक्षणिक शुल्काच्या ५० टक्के म्हणजे १ लाख २० हजार रुपयांचा दंड भरून संबंधित विद्यार्थ्यांचे प्रवेश नियमित करून घेण्याची सूचना केली होती. त्यानंतर काही महाविद्यालयांनी दंड भरून विद्यार्थ्यांचे प्रवेश नियमित केले. परंतु, गडहिंग्लज येथील केदारी रेडेकर आयुर्वेद महाविद्यालय, सांगली इस्लामपूर येथील लोकनेते राजाराम बापू पाटील आयुर्वेद महाविद्यालय व कोल्हापूर येथील यशवंत आयुर्वेद महाविद्यालय यांनी प्रवेश नियंत्रण समितीच्या सूचनेकडे दुर्लक्ष करून दंडाची रक्कम न भरल्यामुळे या महाविद्यालयांमधील ३८ विद्यार्थ्यांचे निकाल संबंधित महाविद्यालयांना प्राप्त झालेले नाही. यातील गडहिंग्लज येथील केदारी रेडेकर आयुर्वेद महाविद्यालयाने दंडाच्या रकमेपैकी ५० टक्के रक्कम विद्यार्थ्यांकडून वसूल केली आहे. या महाविद्यालयाच्या १८ विद्यार्थ्यांचे पदवी प्रमाणपत्र एआरएच्या सूचनेनुसार रोखण्यात आले होते. या सर्व विद्यार्थ्यांकडून प्रतिविद्यार्थी ६० हजार रुपये संबंधित महाविद्यालयाने वसूल केला असून, अन्य महाविद्यालयांमध्येही असाच प्रकार घडल्याचे वृत्त आहे. दरम्यान, सीईटीशिवाय प्रवेश दिल्याच्या कारणावरून प्रवेश नियंत्रण समितीने महाविद्यालयांना दंड आकारून पुढील प्रवेश प्रक्रिया रोखणे अपेक्षित होते. परंतु, प्रमाणपत्र रोखल्यामुळे विद्यार्थी अडचणीत आल्याने महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांच्या हतबलतेचा फायदा घेत त्यांच्याकडून प्रत्येकी ६० हजार रुपये वसूल केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

टॅग्स :Educationशिक्षणNashikनाशिक