शहरं
Join us  
Trending Stories
1
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
2
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
3
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
4
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
5
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
6
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
7
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
8
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
9
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
10
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
11
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
12
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
13
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
14
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
15
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
16
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
17
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
18
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
19
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
20
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय

नॉन सीईटी विद्यार्थ्यांकडून दंडाच्या ५० टक्के वसुली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2019 01:48 IST

प्रवेशपात्रता परीक्षा न दिलेल्या विद्यार्थ्यांना आयुर्वेद विद्या शाखेच्या एमडी/एमएस अभ्यासक्रमासाठी प्रवेश दिल्यामुळे प्रवेश नियंत्रण समितीने संबंधित महाविद्यालयांना शैक्षणिक शुल्काच्या ५० टक्के दंड करीत सुमारे ३८ विद्यार्थ्यांचे पदवी प्रमाणपत्र रोखले आहे. या प्रकरणात पदवी अभ्यासक्रम पूर्ण करूनही विद्यार्थांना प्रमाणपत्राशिवाय पुढील संधीपासून वंचित रहावे लागत आहे. विद्यार्थ्यांच्या याच अडचणीचा फायदा घेत काही महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांकडून दंडाच्या ५० टक्के रक्कम वसूल केल्याचा प्रकार समोर आला आहे.

ठळक मुद्देआयुर्वेद महाविद्यालयांचा प्रताप : प्रमाणपत्राची प्रतीक्षा कायम

नामदेव भोर । लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : प्रवेशपात्रता परीक्षा न दिलेल्या विद्यार्थ्यांना आयुर्वेद विद्या शाखेच्या एमडी/एमएस अभ्यासक्रमासाठी प्रवेश दिल्यामुळे प्रवेश नियंत्रण समितीने संबंधित महाविद्यालयांना शैक्षणिक शुल्काच्या ५० टक्के दंड करीत सुमारे ३८ विद्यार्थ्यांचे पदवी प्रमाणपत्र रोखले आहे. या प्रकरणात पदवी अभ्यासक्रम पूर्ण करूनही विद्यार्थांना प्रमाणपत्राशिवाय पुढील संधीपासून वंचित रहावे लागत आहे. विद्यार्थ्यांच्या याच अडचणीचा फायदा घेत काही महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांकडून दंडाच्या ५० टक्के रक्कम वसूल केल्याचा प्रकार समोर आला आहे.महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाशी संलग्न सुमारे १२ महाविद्यालयांनी २०१५ वर्षात एमडी, एमएस पदवी अभ्यासक्रमासाठी काही विद्यार्थ्यांना प्रवेशपरीक्षा न घेताच प्रवेश दिले होते. हा प्रकार प्रवेश नियंत्रण समितीच्या लक्षात आल्यानंतर समितीने संबंधित महाविद्यालयांना शैक्षणिक शुल्काच्या ५० टक्के म्हणजे १ लाख २० हजार रुपयांचा दंड भरून संबंधित विद्यार्थ्यांचे प्रवेश नियमित करून घेण्याची सूचना केली होती. त्यानंतर काही महाविद्यालयांनी दंड भरून विद्यार्थ्यांचे प्रवेश नियमित केले. परंतु, गडहिंग्लज येथील केदारी रेडेकर आयुर्वेद महाविद्यालय, सांगली इस्लामपूर येथील लोकनेते राजाराम बापू पाटील आयुर्वेद महाविद्यालय व कोल्हापूर येथील यशवंत आयुर्वेद महाविद्यालय यांनी प्रवेश नियंत्रण समितीच्या सूचनेकडे दुर्लक्ष करून दंडाची रक्कम न भरल्यामुळे या महाविद्यालयांमधील ३८ विद्यार्थ्यांचे निकाल संबंधित महाविद्यालयांना प्राप्त झालेले नाही. यातील गडहिंग्लज येथील केदारी रेडेकर आयुर्वेद महाविद्यालयाने दंडाच्या रकमेपैकी ५० टक्के रक्कम विद्यार्थ्यांकडून वसूल केली आहे. या महाविद्यालयाच्या १८ विद्यार्थ्यांचे पदवी प्रमाणपत्र एआरएच्या सूचनेनुसार रोखण्यात आले होते. या सर्व विद्यार्थ्यांकडून प्रतिविद्यार्थी ६० हजार रुपये संबंधित महाविद्यालयाने वसूल केला असून, अन्य महाविद्यालयांमध्येही असाच प्रकार घडल्याचे वृत्त आहे. दरम्यान, सीईटीशिवाय प्रवेश दिल्याच्या कारणावरून प्रवेश नियंत्रण समितीने महाविद्यालयांना दंड आकारून पुढील प्रवेश प्रक्रिया रोखणे अपेक्षित होते. परंतु, प्रमाणपत्र रोखल्यामुळे विद्यार्थी अडचणीत आल्याने महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांच्या हतबलतेचा फायदा घेत त्यांच्याकडून प्रत्येकी ६० हजार रुपये वसूल केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

टॅग्स :Educationशिक्षणNashikनाशिक