शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

गोदावरीच्या सन्मानासाठी आता नमामि गोदा!

By admin | Updated: July 15, 2017 00:14 IST

नदी शुद्धिकरणाचे अभियान राबविले जात असले तरी गोदावरी मात्र याबाबतही मागेच आहे. त्यामुळे ‘नमामि गोदे’ची चळवळ आता गोदाप्रेमींमधूनच पुढे आली असून, त्यासाठी रीतसर नोंदणी करण्यात आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : नमामि गंगेच्या माध्यमातून नदी शुद्धिकरणाच्या सुरू झालेल्या चळवळीनंतर नमामि देवी नर्मदा आणि त्यानंतर हळूहळू नमामि चंद्रभागासारख्या चळवळी सुरू होत असताना गंगेची थोरली भगिनी मानली जाणारी गोदावरी मात्र जणू उपेक्षेची धनीच ठरली आहे. गोदावरी जीवनदायिनी आहे, हे खरे असले तरी त्यादृष्टीने पाऊले पडत नाही. सरकारी यंत्रणेच्या माध्यमातून नदी शुद्धिकरणाचे अभियान राबविले जात असले तरी गोदावरी मात्र याबाबतही मागेच आहे. त्यामुळे ‘नमामि गोदे’ची चळवळ आता गोदाप्रेमींमधूनच पुढे आली असून, त्यासाठी रीतसर नोंदणी करण्यात आली आहे. नाशिकमधील पर्यावरणप्रेमी, गोदाप्रेमींनी एकत्र येऊन नमामि गोदा फाउण्डेशनची स्थापना केली असून, त्याची रीतसर नोंदणी केली आहे. अभिनेता चिन्मय उदगीरकर, धनश्री क्षीरसागर, किरण भालेराव आणि अर्थातच राजेश पंडित, प्राजक्ता बस्ते, शिरीष दंदणे, मिलिंद दंडे यांच्यासह अन्य पर्यावरणप्रेमी यांनी त्यासाठी पुढाकार घेतला आहे. तथापि, ही चळवळ सर्वांची आहे आणि नदीवर, पर्यावरणावर ज्याचे प्रेम आहे, तो सर्वच या चळवळीचा एक भाग असल्याचे फाउण्डेशनच्या प्रवर्तकांचे म्हणणे आहे.गोदावरी नदी हा श्रद्धेचा विषय असल्यानेच या विषयावर नाशिकमधील नागरिक संवेदनशील आहेत. परंतु दुसरीकडे नदीपात्र अस्वच्छ करण्यालाही नागरिकच कारणीभूत ठरतात. सरकारी यंत्रणा एका विशिष्ट मर्यादेपलीकडे गोदापात्र शुद्धिकरणासाठी प्रयत्न करू शकत नाही. अशावेळी लोकसहभागच अधिक महत्त्वाचा आहे. गोदावरीविषयी आदर निर्माण करण्यासाठी नव्या पिढीवर संस्काराची गरज आहे. हे ओळखून नमामि गोदा फाउण्डेशन नव्या पिढीवर गोदावरीच्या कृतज्ञतेचे संस्कार रुजविणार आहे. त्यामुळे अनेक शाळांना यात सहभागी करून घेण्यात येणार असून, त्या माध्यमातून ही चळवळ पुढे नेली जाणार आहे. अनेक नद्यांचे पुनरुज्जीवन करणाऱ्या जलतज्ज्ञ राजेंद्र सिंग यांच्या प्रेरणेने ही चळवळ सुरू करण्यात येणार आहे. पुढील महिन्यात ९ आॅगस्ट म्हणजे क्रांतिदिनी राजेंद्र सिंग यांच्या उपस्थितीतच ही चळवळ पुढे नेण्याचा संकल्प करण्यात येणार आहे. लोकमतची अपेक्षापूर्ती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नमामि गंगेची घोषणा वाराणसीत केली. त्या पाठोपाठ मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंग चव्हाण यांनी नमामि देवी नर्मदेची घोषणा करून १४४ दिवसांची परिक्रमा केली. आपापल्या भागातील नद्यांच्या संवर्धनासाठी तेथील सरकारे प्रयत्न करीत असताना महाराष्ट्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नमामि गोदाअभियान का राबवित नाही असा प्रश्न करीत लोकमतने नमामि गोदा या संकल्पनेचा वेगवेगळ्या सदरांच्या माध्यमातून पाठपुरावा केला. तसेच गोदावरी शुद्धिकरणासाठी शासकीय यंत्रणेबरोबरच लोकचळवळ उभी राहावी अशी अपेक्षा व्यक्त केली होती. त्याचीच सुखद परिणती ‘ नमामि गोदा फाउण्डेशन’च्या माध्यमातून होणार आहे. लोकसहभागाची ही चळवळ सर्वच गोदाप्रेमींसाठी खुली असल्याने गोदेचे प्रचलित स्वरूप बदलण्यास ती उपयुक्त ठरेल अशी अपेक्षा आहे.