शहरं
Join us  
Trending Stories
1
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
2
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
3
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
4
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
5
"संघाने आता नथुराम आणि मनुस्मृतीला तिलांजली देऊन गांधी विचार आणि संविधान स्वीकारावे’’, काँग्रेसने दिला सल्ला  
6
भारतावर राज्य करण्याचं स्वप्न, ५० लाख हल्लेखोरांची फौज, शेजारील देशात आखला जातोय भयानक कट 
7
“मातोश्रीवर हल्ल्याचा आणि राज ठाकरेंना मारायचा कट होता”; प्रदीप शर्मांनी सांगितला 'एन्काउंटर'चा थरार
8
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
9
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त
10
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
11
तुमचा गॅस एजन्सीवाला चांगली सेवा देत नाही? मोबाईल सिमप्रमाणे आता LPG गॅस कंपनी बदला
12
“नवी मुंबईत सत्ता हे आनंद दिघेंचे स्वप्न, महायुतीचे आम्ही पाहू, तुम्ही फक्त...”: एकनाथ शिंदे
13
गर्दीवर दगडफेक, पोलिसांकडून लाठीमार, करूरमधील चेंगराचेंगरीबाबत विजयच्या पक्षाला वेगळाच संशय, केली अशी मागणी 
14
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
15
Triptii Dimri : "आयुष्यात रोमान्स करण्यासाठी..."; करोडपती बिझनेसमनच्या प्रेमात आहे अभिनेत्री, गुपचूप करतेय डेट?
16
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...
17
हृदयद्रावक! फ्लॅटमध्ये आग, अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचा गुदमरून मृत्यू; बाल कलाकाराने गमावला जीव
18
दुर्गा पूजा ते दिवाळी! ऑक्टोबरमध्ये बँकांना २१ दिवस सुट्टी! 'ही' यादी तपासूनच कामाचे नियोजन करा
19
मराठवाडा, सोलापूर येथील परिस्थिती कायम; धरणांतील विसर्ग वाढला, हजारो नागरिक सुरक्षितस्थळी
20
Tamilnadu Stampede : “आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न

गोदावरीच्या सन्मानासाठी आता नमामि गोदा!

By admin | Updated: July 15, 2017 00:14 IST

नदी शुद्धिकरणाचे अभियान राबविले जात असले तरी गोदावरी मात्र याबाबतही मागेच आहे. त्यामुळे ‘नमामि गोदे’ची चळवळ आता गोदाप्रेमींमधूनच पुढे आली असून, त्यासाठी रीतसर नोंदणी करण्यात आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : नमामि गंगेच्या माध्यमातून नदी शुद्धिकरणाच्या सुरू झालेल्या चळवळीनंतर नमामि देवी नर्मदा आणि त्यानंतर हळूहळू नमामि चंद्रभागासारख्या चळवळी सुरू होत असताना गंगेची थोरली भगिनी मानली जाणारी गोदावरी मात्र जणू उपेक्षेची धनीच ठरली आहे. गोदावरी जीवनदायिनी आहे, हे खरे असले तरी त्यादृष्टीने पाऊले पडत नाही. सरकारी यंत्रणेच्या माध्यमातून नदी शुद्धिकरणाचे अभियान राबविले जात असले तरी गोदावरी मात्र याबाबतही मागेच आहे. त्यामुळे ‘नमामि गोदे’ची चळवळ आता गोदाप्रेमींमधूनच पुढे आली असून, त्यासाठी रीतसर नोंदणी करण्यात आली आहे. नाशिकमधील पर्यावरणप्रेमी, गोदाप्रेमींनी एकत्र येऊन नमामि गोदा फाउण्डेशनची स्थापना केली असून, त्याची रीतसर नोंदणी केली आहे. अभिनेता चिन्मय उदगीरकर, धनश्री क्षीरसागर, किरण भालेराव आणि अर्थातच राजेश पंडित, प्राजक्ता बस्ते, शिरीष दंदणे, मिलिंद दंडे यांच्यासह अन्य पर्यावरणप्रेमी यांनी त्यासाठी पुढाकार घेतला आहे. तथापि, ही चळवळ सर्वांची आहे आणि नदीवर, पर्यावरणावर ज्याचे प्रेम आहे, तो सर्वच या चळवळीचा एक भाग असल्याचे फाउण्डेशनच्या प्रवर्तकांचे म्हणणे आहे.गोदावरी नदी हा श्रद्धेचा विषय असल्यानेच या विषयावर नाशिकमधील नागरिक संवेदनशील आहेत. परंतु दुसरीकडे नदीपात्र अस्वच्छ करण्यालाही नागरिकच कारणीभूत ठरतात. सरकारी यंत्रणा एका विशिष्ट मर्यादेपलीकडे गोदापात्र शुद्धिकरणासाठी प्रयत्न करू शकत नाही. अशावेळी लोकसहभागच अधिक महत्त्वाचा आहे. गोदावरीविषयी आदर निर्माण करण्यासाठी नव्या पिढीवर संस्काराची गरज आहे. हे ओळखून नमामि गोदा फाउण्डेशन नव्या पिढीवर गोदावरीच्या कृतज्ञतेचे संस्कार रुजविणार आहे. त्यामुळे अनेक शाळांना यात सहभागी करून घेण्यात येणार असून, त्या माध्यमातून ही चळवळ पुढे नेली जाणार आहे. अनेक नद्यांचे पुनरुज्जीवन करणाऱ्या जलतज्ज्ञ राजेंद्र सिंग यांच्या प्रेरणेने ही चळवळ सुरू करण्यात येणार आहे. पुढील महिन्यात ९ आॅगस्ट म्हणजे क्रांतिदिनी राजेंद्र सिंग यांच्या उपस्थितीतच ही चळवळ पुढे नेण्याचा संकल्प करण्यात येणार आहे. लोकमतची अपेक्षापूर्ती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नमामि गंगेची घोषणा वाराणसीत केली. त्या पाठोपाठ मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंग चव्हाण यांनी नमामि देवी नर्मदेची घोषणा करून १४४ दिवसांची परिक्रमा केली. आपापल्या भागातील नद्यांच्या संवर्धनासाठी तेथील सरकारे प्रयत्न करीत असताना महाराष्ट्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नमामि गोदाअभियान का राबवित नाही असा प्रश्न करीत लोकमतने नमामि गोदा या संकल्पनेचा वेगवेगळ्या सदरांच्या माध्यमातून पाठपुरावा केला. तसेच गोदावरी शुद्धिकरणासाठी शासकीय यंत्रणेबरोबरच लोकचळवळ उभी राहावी अशी अपेक्षा व्यक्त केली होती. त्याचीच सुखद परिणती ‘ नमामि गोदा फाउण्डेशन’च्या माध्यमातून होणार आहे. लोकसहभागाची ही चळवळ सर्वच गोदाप्रेमींसाठी खुली असल्याने गोदेचे प्रचलित स्वरूप बदलण्यास ती उपयुक्त ठरेल अशी अपेक्षा आहे.