शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

मनपा हद्दीत नाही जागेचा ‘भरोसा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2018 00:16 IST

महिलांवरील अन्याय, अत्याचाराची तातडीने दखल घेऊन योग्य ती कार्यवाही करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडलेल्या भरोसा प्रकल्पाला नाशिक शहरात मात्र जागा मिळत नसून अनेक जागा बदलूनही त्यावर कार्यवाही होत नसल्याने महापालिकेवर कसा भरवसा ठेवायचा असा प्रश्न आमदार देवयांनी फरांदे यांनी केला आहे.

नाशिक : महिलांवरील अन्याय, अत्याचाराची तातडीने दखल घेऊन योग्य ती कार्यवाही करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडलेल्या भरोसा प्रकल्पाला नाशिक शहरात मात्र जागा मिळत नसून अनेक जागा बदलूनही त्यावर कार्यवाही होत नसल्याने महापालिकेवर कसा भरवसा ठेवायचा असा प्रश्न आमदार देवयांनी फरांदे यांनी केला आहे.  महिलांवर घराबाहेर होणारी छेडखानी आणि होणारे हल्ले नवीन नाही. त्याचबरोबर अनेकदा घरातही महिलांवर अत्याचार होत असतात. महिलांवर अशाप्रकारचे अत्याचार होत असताना त्यांच्या तक्रारींची तत्काळ दखल घ्यावी यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस आणि न्याययंत्रणेसह तब्बल अकरा शासकीय यंत्रणा एकत्र आणून नागपूरमध्ये भरोसा हा प्रकल्प राबविला असून, महिलांवरील अत्याचाराबाबत चोवीस तासांत दखल घेऊन कार्यवाही करण्यात येत असल्याने महिलांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळाला आहे. त्यासंदर्भात गेल्या डिसेंबर महिन्यात राज्यातील महिला आमदारांसाठी एक कार्यशाळा घेण्यात आली. त्यांना या प्रकल्पाचे कामकाज दाखविल्यानंतर आपापल्या मतदारसंघात अशाच प्रकारचा प्रकल्प राबवावा अशाप्रकारची सूचना फडणवीस यांनी केली, त्यानुसार आमदार देवयानी फरांदे यांनी नाशिकमध्ये कार्यशाळा घेतली. नाशिकचे पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल या कार्यशाळेस उपस्थित होते. त्यांना आणि न्यायाधीशांनादेखील कल्पना रुचली.गेल्या डिसेंबर महिन्यात आमदार देवयानी फरांदे यांनी महापालिकेला पत्र देऊन या प्रकल्पासाठी भालेकर हायस्कूलमध्ये जागा मागितली होती. त्याचा मोठ्या प्रमाणात पाठपुरावा करण्यात आला आणि ही जागा महापालिकेने नाकारली. महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांना या जागेवर सेंट्रल लायब्ररी करण्याची तयारी केल्याचे सांगण्यात आले. आमदार फरांदे यांनी या केंद्रासाठी हुंडीवाला लेन येथील मनपा शाळेची इमारत मागितली; परंतु तीदेखील अद्याप मिळालेली नसून हा प्रकल्प रखडलेला आहे.‘भरोसा’ प्रकल्पासाठी जागा मिळावी यासाठी मी दोन जागा सुचविल्या. त्यापैकी भालेकर शाळेतील वर्ग मिळू शकले नाही, त्यामुळे दुसरी जागा सुचविण्यात आली. हुंडीवाला लेन येथील जागा आठ महिन्यांपासून मिळू शकलेली नाही. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी महापालिकेला अधिकृत पत्र देऊनही जागा न मिळाल्याने प्रकल्प उभा राहू शकला नाही.- आमदार देवयानी फरांदे

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाMLAआमदार