शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

भारताला कोणीही रोखू शकत नाहीसरसंघचालक मोहन भागवत : ब्राह्मणगावी संवाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2017 00:39 IST

सटाणा/ब्राह्मणगाव : हिंदू धर्माचे आणि राष्ट्राचे रक्षण करणे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कर्तव्य आहे. चारित्र्यसंपन्न आणि सर्वांना सोबत घेऊन चालणारा हिंदू धर्म असल्यामुळे भारताला कोणतीही शक्ती महासत्ता बनण्यापासून रोखू शकत नाही, असा विश्वास सरसंघचालक मोहन भागवत यांनी व्यक्त केला.धुळे जिल्ह्यातील बारीपाडा येथे संघाच्या एका कार्यक्रमासाठी सरसंघचालक भागवत आज आले होते. परतीच्या ...

ठळक मुद्देभारताला कोणीही रोखू शकत नाहीसरसंघचालक मोहन भागवत : ब्राह्मणगावी संवाद

सटाणा/ब्राह्मणगाव : हिंदू धर्माचे आणि राष्ट्राचे रक्षण करणे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कर्तव्य आहे. चारित्र्यसंपन्न आणि सर्वांना सोबत घेऊन चालणारा हिंदू धर्म असल्यामुळे भारताला कोणतीही शक्ती महासत्ता बनण्यापासून रोखू शकत नाही, असा विश्वास सरसंघचालक मोहन भागवत यांनी व्यक्त केला.धुळे जिल्ह्यातील बारीपाडा येथे संघाच्या एका कार्यक्रमासाठी सरसंघचालक भागवत आज आले होते. परतीच्या मार्गावर बागलाण तालुक्यातील ब्राम्हणगाव येथील संघाचे कार्यकर्ते प्रवीण शेवाळे यांच्या कुटुंबियांच्या सदिच्छा भेटीसाठी आले होते. यावेळी संघाच्या शाखेत स्वयंसेवकांशी संवाद साधताना ते बोलत होते. राम ,कृष्ण आणि बुद्धांची ही पुण्यभूमी आहे. भारतमातेचा जयजयकार व्हावा यासाठी प्रयत्न करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. देशात वाईट प्रवृत्ती देखील आहेत. कोणी आपल्या देशात राहून देश विरु द्ध बोलण्याची भाषा करतो मात्र ती चार चौघात. अशा प्रवृत्तींना रोखण्यासाठी संघ संस्काराचे धडे देत असल्याचे भागवत यांनी सांगितले. ब्राम्हणगावला येण्यापूर्वी ताहाराबाद येथील संघाचे कार्यकर्ते आबा बच्छाव यांच्या निवासस्थानी भागवत यांनी भेट दिली. त्यानंतर ब्राम्हणगावला आगमन झाले. सुरुवातीला संघाचे कार्यकर्ते जोशी यांच्या निवासस्थानी संघाच्या जिल्हा कार्यकारिणीची पाऊणतास बैठक चालली. त्यानंतर कार्यकर्त्यांशी संवाद साधला.भागवत यांनी सव्वा आठ वाजता शेवाळे कुटुंबियांची भेट घेऊन विचारपूस केली .त्यानंतर कुटुंबीयांसोबत भोजन घेतले. यावेळी जिल्हा संघचालक गोविंद अहेर, कैलास साळुंखे, आबा बच्छाव, सोनवणे, धनंजय पंडित ,मनोज केल्हे, आबा कापडणीस, किरण अहिरे, सरपंच सरला अहिरे, मविप्रचे उपसभापती राघो अहिरे, डॉ. विलास बच्छाव, अण्णा सावंत, जगदीश मुंडावरे आदी उपस्थित होते. दरम्यान भागवत यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. संघाचे टीमवर्क असून समाजाला चांगली दिशा देण्याचे काम संघाच्या माध्यमातून केले जात आहे. अशा चारित्र्यसंपन्न नागरिकाने देशहित जोपासल्यास भारताला महासत्ता होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही असेही त्यांनी शेवटी स्पष्ट केले.