शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
2
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
3
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
4
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
5
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
6
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
7
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
8
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
9
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
10
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
11
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
12
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
13
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
14
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
15
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
16
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
17
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
18
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
19
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
20
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?

भारताला कोणीही रोखू शकत नाहीसरसंघचालक मोहन भागवत : ब्राह्मणगावी संवाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2017 00:39 IST

सटाणा/ब्राह्मणगाव : हिंदू धर्माचे आणि राष्ट्राचे रक्षण करणे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कर्तव्य आहे. चारित्र्यसंपन्न आणि सर्वांना सोबत घेऊन चालणारा हिंदू धर्म असल्यामुळे भारताला कोणतीही शक्ती महासत्ता बनण्यापासून रोखू शकत नाही, असा विश्वास सरसंघचालक मोहन भागवत यांनी व्यक्त केला.धुळे जिल्ह्यातील बारीपाडा येथे संघाच्या एका कार्यक्रमासाठी सरसंघचालक भागवत आज आले होते. परतीच्या ...

ठळक मुद्देभारताला कोणीही रोखू शकत नाहीसरसंघचालक मोहन भागवत : ब्राह्मणगावी संवाद

सटाणा/ब्राह्मणगाव : हिंदू धर्माचे आणि राष्ट्राचे रक्षण करणे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कर्तव्य आहे. चारित्र्यसंपन्न आणि सर्वांना सोबत घेऊन चालणारा हिंदू धर्म असल्यामुळे भारताला कोणतीही शक्ती महासत्ता बनण्यापासून रोखू शकत नाही, असा विश्वास सरसंघचालक मोहन भागवत यांनी व्यक्त केला.धुळे जिल्ह्यातील बारीपाडा येथे संघाच्या एका कार्यक्रमासाठी सरसंघचालक भागवत आज आले होते. परतीच्या मार्गावर बागलाण तालुक्यातील ब्राम्हणगाव येथील संघाचे कार्यकर्ते प्रवीण शेवाळे यांच्या कुटुंबियांच्या सदिच्छा भेटीसाठी आले होते. यावेळी संघाच्या शाखेत स्वयंसेवकांशी संवाद साधताना ते बोलत होते. राम ,कृष्ण आणि बुद्धांची ही पुण्यभूमी आहे. भारतमातेचा जयजयकार व्हावा यासाठी प्रयत्न करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. देशात वाईट प्रवृत्ती देखील आहेत. कोणी आपल्या देशात राहून देश विरु द्ध बोलण्याची भाषा करतो मात्र ती चार चौघात. अशा प्रवृत्तींना रोखण्यासाठी संघ संस्काराचे धडे देत असल्याचे भागवत यांनी सांगितले. ब्राम्हणगावला येण्यापूर्वी ताहाराबाद येथील संघाचे कार्यकर्ते आबा बच्छाव यांच्या निवासस्थानी भागवत यांनी भेट दिली. त्यानंतर ब्राम्हणगावला आगमन झाले. सुरुवातीला संघाचे कार्यकर्ते जोशी यांच्या निवासस्थानी संघाच्या जिल्हा कार्यकारिणीची पाऊणतास बैठक चालली. त्यानंतर कार्यकर्त्यांशी संवाद साधला.भागवत यांनी सव्वा आठ वाजता शेवाळे कुटुंबियांची भेट घेऊन विचारपूस केली .त्यानंतर कुटुंबीयांसोबत भोजन घेतले. यावेळी जिल्हा संघचालक गोविंद अहेर, कैलास साळुंखे, आबा बच्छाव, सोनवणे, धनंजय पंडित ,मनोज केल्हे, आबा कापडणीस, किरण अहिरे, सरपंच सरला अहिरे, मविप्रचे उपसभापती राघो अहिरे, डॉ. विलास बच्छाव, अण्णा सावंत, जगदीश मुंडावरे आदी उपस्थित होते. दरम्यान भागवत यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. संघाचे टीमवर्क असून समाजाला चांगली दिशा देण्याचे काम संघाच्या माध्यमातून केले जात आहे. अशा चारित्र्यसंपन्न नागरिकाने देशहित जोपासल्यास भारताला महासत्ता होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही असेही त्यांनी शेवटी स्पष्ट केले.