पाऊस नसल्याने वाढ खुंटली
By Admin | Updated: June 27, 2014 00:10 IST2014-06-26T21:46:41+5:302014-06-27T00:10:17+5:30
पाऊस नसल्याने वाढ खुंटली

पाऊस नसल्याने वाढ खुंटली
भाताचे बियाणे पेरल्यानंतर ते चांगले उगवले असले तरी, आता पाऊस नसल्याने पुढील वाढ खुंटली आहे. तीच गत नागली, वरई, भुईमूग आदि पिकांची आहे. काही शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत पेरणीसाठी थांबले आहेत, तर काही शेतकऱ्यांंनी पेरलेल्या पिकांवर करपासदृश रोगाची लागण झालेली दिसत आहे. त्यामुळे हरसूल विभागातील ५८ महसुली गावांतील अनेक शेतकरी दुबार पेरणीच्या संकटाला सामोरे जाण्याची शक्यता नाकारता येणार नाही.