शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
4
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
5
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
6
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
7
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
8
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
9
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
10
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
11
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
12
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
13
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
14
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
15
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
16
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
17
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
18
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
19
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर
20
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...

रेशनवरील धान्य मिळेना आणि गरीबांचा धान्याचा घोर मिटेना !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2020 4:38 PM

स्वस्त धान्य दुकानातून केशरी कार्ड धारकांना गहु ८ रुपये किलो दराचे व तांदुळ १२ रु पये किलो प्रमाणे मिळत होते. पण गेल्या दोन तीन महिन्यापासून केन्द्र शासनाने हे धान्य बंद केल्याने गरीब अशा केशरी कार्डधारकांना धान्य मिळत नसल्याने अशा लोकांची उपासमार होत आहे. यासाठी नगरसेवक स्वप्निल शेलार यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळातर्फे तहसिलदार दीपक गिरासे यांना एक निवेदन देण्यात आले. यात हे धान्य सुरु करावे अशी मागणी करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे१२ अंकी नंबरच लिहिला नसल्याने अशा कार्ड धारकाला धान्य देण्यास नकार मिळत आहे.

स्वस्त धान्य दुकानातून केशरी कार्ड धारकांना गहु ८ रुपये किलो दराचे व तांदुळ १२ रु पये किलो प्रमाणे मिळत होते. पण गेल्या दोन तीन महिन्यापासून केन्द्र शासनाने हे धान्य बंद केल्याने गरीब अशा केशरी कार्डधारकांना धान्य मिळत नसल्याने अशा लोकांची उपासमार होत आहे. यासाठी नगरसेवक स्वप्निल शेलार यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळातर्फे तहसिलदार दीपक गिरासे यांना एक निवेदन देण्यात आले. यात हे धान्य सुरु करावे अशी मागणी करण्यात आली आहे.स्वस्त दराने मिळणारे धान्य गरीबांना तेवढाच जगण्याचा आधार होता. पण तेही धान्य कोणालाही पुर्व सुचना न देता बंद करण्यात आले आहे. आश्चर्याची बाब म्हणजे स्वस्त धान्य दुकानदारांनी नेहमीच्या पध्दतीप्रमाणे अगोदर धान्याचे पैसे भरले असतांना देखील अजुन धान्यच आले नाहीत. धान्य बंद करायचे असते तर स्वस्त धान्य दुकानदारांना अगोदर पुर्व सुचनाच दिली असती. म्हणुन तर त्यांनी पैसे भरले.वास्तविक या केशरी कार्डांवर मागील भट नावाच्या पुरवठा विभागाच्या मुख्य लिपिकाने १२ आकडी नंबर न टाकल्याने प्राधान्याने धान्य पुरवठा असा शिक्का मारलेला नाही. त्यामुळे केशरी कार्ड धारकांना फ्री धान्य देखील मिळत नाही. अशा वेळेस एकीकडे लॉक डाउन कामधंदा नाही. त्र्यंबकेश्वर मंदीर बंद असल्याने दर्शन, धार्मिक विधी बंद अशा परिस्थितीत लोकांनी जगायचे कसे असा मुद्दा तहसिलदार यांना दिलेल्या निवेदन देतांना मांडला. काही ग्राहकांच्या कार्डवर प्राधान्याने धान्य पुरवठा असा शिक्का मारला पण १२ अंकी नंबरच लिहिला नसल्याने अशा कार्ड धारकाला धान्य देण्यास नकार मिळत आहे.यावेळी तहसिलदारांना निवेदन देतांना कुणाल उगले, सुभाष सोनवणे, उल्हास तुंगार आदी उपस्थित होते. 

टॅग्स :trimbakeshwarत्र्यंबकेश्वरGovernmentसरकार