शहरं
Join us  
Trending Stories
1
Rajnath Singh : "ऑपरेशन सिंदूर अजून संपलेलं नाही; हा फक्त ट्रेलर, योग्य वेळ आल्यावर पूर्ण चित्रपट दाखवू"
2
माऊंट एव्हरेस्टवर भारतीय गिर्यारोहकाचा मृत्यू, शिखर सर करून परतताना घडली दुर्घटना
3
काल स्वस्त झालं, आज सोनं महागलं; १२०० रुपयांपेक्षा अधिक तेजी, खरेदीपूर्वी पाहा नवे दर
4
हापूस आंब्याचा सीझन संपला! कोकणचा राजा पुढचा आठवडाभरच मिळणार; एपीएमसीत काय स्थिती...
5
'संपूर्ण देश, देशाचे सैन्य PM मोदींच्या चरणी नतमस्तक', मध्यप्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांचे वादग्रस्त वक्तव्य
6
Maharashtra Politics : "मी लिहिलेल्या घटना सत्य, आणखी लिहिले असते तर हाहाकार माजला असता"; संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं
7
कतरिनाआधी 'या' अभिनेत्रीच्या प्रेमात होता विकी कौशल, 'उरी'च्या प्रमोशनला एकत्रही दिसले, पण...
8
२ हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी एकाच वेळी करता येतात क्लेम; फक्त 'ही' प्रक्रिया माहिती असायला हवी
9
साडेसहा महिन्यांच्या गर्भवती तिरंदाजाची कमाल; पोटात बाळाची हालचात तरी अचूक साधला नेम
10
एअरटेलने लाँच केली ग्राहकांसाठी 'डिफेन्स' सिस्टीम; रियल टाइम फ्रॉड डिटेक्शन होणार, सगळे ॲप्स ट्रॅक करणार
11
मोहिमेदरम्यान मधमाशांचा हल्ल्यात K9 रोलो शहीद, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार...
12
मित्रच बनला शत्रू! आधी मैत्रिणीचा गळा कापला, मग जिवंत जाळून पळ काढला
13
कॉईनबेस एक्सचेंज झालं हॅक, Bitcoin मध्ये मागितली खंडणी; युजर्सचा डेटा लीक करण्याची धमकी
14
व्वा रे पठ्ठ्यांनो! 'या' गावाने दिले १०० IAS; प्रत्येक घरात सरकारी नोकरी, म्हणतात अधिकाऱ्यांचं गाव
15
ऑपरेशन सिंदूर थांबताच काश्मीरमध्ये लागोपाठ २ ऑपरेशन; ४८ तासांत सहा दहशतवाद्यांचा खात्मा
16
जमिनीवरून हल्लाबोल, हवेतच केले उद्ध्वस्त; भारताने पाकिस्तानवर डागली होती 'इतकी' ब्रह्मोस क्षेपणास्त्रे!
17
'पाकिस्तानने दहशतवाद्यांचे ते अड्डे पुन्हा उभारण्यासाठी १४ कोटी दिले'; राजनाथ सिंहांचा दावा
18
आईच्या मृत्यूनंतर चांदीच्या बांगडीसाठी मुलाने अंत्यविधी रोखून धरला; स्मशानभूमीत गोंधळ घातला...
19
भारताच्या मदतीशिवाय तुर्कीमध्ये बिर्याणी शिजूच शकत नाही! 'हे' आहे मोठे कारण
20
‘एखाद्याला खासदार करायचं म्हंटल्यावर करतो अन् पाडायचं म्हंटलं तर पाडतोच’ अजित पवारांची टोलेबाजी

निसाका- रासाकासाठी गोदाकाठवासीयांचे कृषीमंत्र्यांना साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2020 13:14 IST

निफाड : बंद पडलेले निसाका-व रानवड कारखाने शासनदरबारी लवकर प्रयत्न करून कार्यान्वित करावे या मागणीचे निवेदन देऊन गोदाकाठच्या शेतकऱ्यांनी ...

निफाड : बंद पडलेले निसाका-व रानवड कारखाने शासनदरबारी लवकर प्रयत्न करून कार्यान्वित करावे या मागणीचे निवेदन देऊन गोदाकाठच्या शेतकऱ्यांनी कृषिमंत्री दादा भुसे यांना साकडे घातले.निफाडमध्ये आढावा बैठकीसाठी आलेल्या भुसे यांनी निफाड सोसायटी येथे भेट दिली. याप्रसंगी करंजगावचे माजी सरपंच खंडू बोडके, माजी आमदार अनिल कदम व जिप अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांनी भेट घेऊन चर्चा केली.यावेळी निसाकासाठी शासन दरबारी आवश्यक ते सहकार्य करण्याचे आश्वासन भुसे यांनी शिष्टमंडळाला दिले. निवेदनात म्हटले आहे की, निफाड तालुक्यात साडेपाच हजार हेकटर पेक्षा अधिक ऊस उभा आहे. कोरोना प्रादुर्भावामुळे उन्हाळ्यात रसवंतीगृहे बंद असल्याने उसाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे भविष्यात निफाडमध्ये ऊस उत्पादक शेतकर्यांच्याही आत्महत्या होऊ शकतात . त्यामुळे निसाका-रासाका कार्यान्वित होणे ही काळाजी गरज आहे. त्यासाठी शासन दरबारी आपण सहकार्य करावे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही निसाका रासाका सुरू करण्याचा शब्द यापूर्वी दिलेला असल्याने आपण नाशिक जिल्ह्याचे भूमिपुत्र म्हणून पुढाकार घेऊन हे दोन्ही कारखाने चालू हंगामात सुरू करण्यासाठी सहकार्य करावे, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच अधिक गाळप क्षमतेच्या निसाकाची मालमत्ता जप्त असल्याने शासनाने खास बाब म्हणून निसाकाच्या कर्जाची थकहमी घेऊन सदर कारखाना कार्यान्वित करावा, अशी मागणी करण्यात आली. यावेळी सुधीर कराड, अनिल कुंदे, संजय कुंदे, विक्र म रंधवे, ललित गीते, कोठूरेचे सरपंच आशिष मोगल, पिंपळस-निसाकाचे सरपंच तानाजी पुरकर, रसलपुरचे संपत डुंबरे, भुसेचे दत्तू भुसारे, करंजगावचे सागर जाधव, राजेंद्र राजोळे, शिंगवेचे रामदास गीते, बाळासाहेब कानडे, रतन डेर्ले उपस्थित होते.

टॅग्स :Nashikनाशिक