शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
3
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
4
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
5
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
6
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
7
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
8
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
9
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
10
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
11
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
12
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
13
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
14
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
15
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
16
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
17
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
18
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
19
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
20
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा

निफाडला स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2018 01:23 IST

शेतकऱ्यांच्या मुलांनी स्पर्धा परीक्षा देताना स्वत:वर विश्वास ठेवावा, जबाबदारी उचलण्याची हिंमत दाखवा, घराचा उंबरठा ओलांडण्याचे धाडस दाखवा, जिद्द बाळगा, आपल्या निर्णयावर ठाम राहा. कठोर मेहनत सुनियोजन करा, असे प्रतिपादन लोकसेवा आयोग स्पर्धेत उल्लेखनीय यश संपादन करणारे आदित्यराजे पवार यांनी केले.

निफाड : शेतकऱ्यांच्या मुलांनी स्पर्धा परीक्षा देताना स्वत:वर विश्वास ठेवावा, जबाबदारी उचलण्याची हिंमत दाखवा, घराचा उंबरठा ओलांडण्याचे धाडस दाखवा, जिद्द बाळगा, आपल्या निर्णयावर ठाम राहा. कठोर मेहनत सुनियोजन करा, असे प्रतिपादन लोकसेवा आयोग स्पर्धेत उल्लेखनीय यश संपादन करणारे आदित्यराजे पवार यांनी केले.निफाड येथील कर्मवीर गणपत दादा मोरे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय येथे मविप्र व बळीराजा फाउण्डेशन यांच्या संयुक्त विद्यमाने स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी ते अध्यक्षस्थानावरून पवार बोलत होते.या शिबिराचे उदघाटन जि. प. सदस्य अमृता पवार यांनी केले. याप्रसंगी व्यासपीठावर बळीराजा फाउण्डेशनचे संस्थापक अध्यक्ष व स्पर्धा परीक्षा अभियानाचे निमंत्रक हंसराज वडघुले, गटविकास अधिकारी अभिजीत हजारे, प्राचार्य डॉ. आर.एन. भवरे माधव गिते , प्रभाकर वाघ, संपत डुंबरे,सुधाकर मोगल,नाना बच्छाव, डॉ. उत्तम डेर्ले, उपप्राचार्य ए. एल. गायकवाड, प्रा. सुनीता उफाडे, मंजूषा भंडारे , वैशाली गिते, प्रा. बी. सी .महाले ,साहेबराव मोरे, नितीन कोरडे, शिवराम रसाळ, सुभाषगायकवाड, योगेश वाघ, प्रा. आहेर, उपस्थित होते. अभियान समन्वयक कवि संदीप जगताप यांनी प्रास्ताविकातून या अभियानाची माहिती दिली.गटविकास अधिकारी अभिजित हजारे यांनी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास कसा असतो, त्याचे नियोजन कसे करावे या बद्दल मार्गदर्शन केले. रु पेश जाधव यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थी न्यूनगंड न ठेवता पुढे यावे, असे ्र्रेआवाहन केले. याप्रसंगी जि. प. सदस्य अमृता पवार म्हणाल्या की, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन ही कौतुकास्पद संकल्पना असून हे अभियान सातत्याने पुढे चालत राहावे तसेच यातून मोठ्या संख्येने अधिकारी घडावेत यासाठी संस्थेच्या पातळीवर तसेच वैयिक्तकरीत्या सर्वतोपरी मदत करण्यास मीकटिबद्ध असून, लवकरच तालुक्यातील इतर महाविद्यालयात हा उपक्र म राबवला जाईल असे सांगतविद्यार्थ्यांत ऊर्जा निर्माण होणे गरजेचे आहे, असे सांगितले.विद्यार्थ्यांनी ध्येय निश्चित करून त्या दिशेने सतत प्रयत्न करावा.टाकीचे घाव सोसल्या शिवाय देवपण येत नाही. त्या प्रमाणे सतत प्रयत्न केल्याशिवाय यश मिळत नाही असे सांगितले.याप्रसंगी बळीराजा फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष व स्पर्धा परीक्षा अभियानाचे निमंत्रक हंसराज वडघुले , गटविकास अधिकारी अभिजित हजारे , अमृता पवार , प्राचार्य डॉ. आर.एन.भवरे यांची भाषणे झालीकार्यक्र माचे सूत्रसंचालन प्रा.श्रीमती आर.एस.मोहोड यांनी केले.

टॅग्स :NashikनाशिकStudentविद्यार्थी