शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
2
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
3
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
4
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
5
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
6
Women's World Cup : भारताच्या लेकींसह प्रेक्षकांनीही रचला इतिहास; ते पाहून ICC चा ऐतिहासिक निर्णय!
7
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
8
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
9
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
10
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
11
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
12
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
13
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
14
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
15
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
16
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
17
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
18
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
19
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
20
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट

निफाडला स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2018 01:23 IST

शेतकऱ्यांच्या मुलांनी स्पर्धा परीक्षा देताना स्वत:वर विश्वास ठेवावा, जबाबदारी उचलण्याची हिंमत दाखवा, घराचा उंबरठा ओलांडण्याचे धाडस दाखवा, जिद्द बाळगा, आपल्या निर्णयावर ठाम राहा. कठोर मेहनत सुनियोजन करा, असे प्रतिपादन लोकसेवा आयोग स्पर्धेत उल्लेखनीय यश संपादन करणारे आदित्यराजे पवार यांनी केले.

निफाड : शेतकऱ्यांच्या मुलांनी स्पर्धा परीक्षा देताना स्वत:वर विश्वास ठेवावा, जबाबदारी उचलण्याची हिंमत दाखवा, घराचा उंबरठा ओलांडण्याचे धाडस दाखवा, जिद्द बाळगा, आपल्या निर्णयावर ठाम राहा. कठोर मेहनत सुनियोजन करा, असे प्रतिपादन लोकसेवा आयोग स्पर्धेत उल्लेखनीय यश संपादन करणारे आदित्यराजे पवार यांनी केले.निफाड येथील कर्मवीर गणपत दादा मोरे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय येथे मविप्र व बळीराजा फाउण्डेशन यांच्या संयुक्त विद्यमाने स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी ते अध्यक्षस्थानावरून पवार बोलत होते.या शिबिराचे उदघाटन जि. प. सदस्य अमृता पवार यांनी केले. याप्रसंगी व्यासपीठावर बळीराजा फाउण्डेशनचे संस्थापक अध्यक्ष व स्पर्धा परीक्षा अभियानाचे निमंत्रक हंसराज वडघुले, गटविकास अधिकारी अभिजीत हजारे, प्राचार्य डॉ. आर.एन. भवरे माधव गिते , प्रभाकर वाघ, संपत डुंबरे,सुधाकर मोगल,नाना बच्छाव, डॉ. उत्तम डेर्ले, उपप्राचार्य ए. एल. गायकवाड, प्रा. सुनीता उफाडे, मंजूषा भंडारे , वैशाली गिते, प्रा. बी. सी .महाले ,साहेबराव मोरे, नितीन कोरडे, शिवराम रसाळ, सुभाषगायकवाड, योगेश वाघ, प्रा. आहेर, उपस्थित होते. अभियान समन्वयक कवि संदीप जगताप यांनी प्रास्ताविकातून या अभियानाची माहिती दिली.गटविकास अधिकारी अभिजित हजारे यांनी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास कसा असतो, त्याचे नियोजन कसे करावे या बद्दल मार्गदर्शन केले. रु पेश जाधव यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थी न्यूनगंड न ठेवता पुढे यावे, असे ्र्रेआवाहन केले. याप्रसंगी जि. प. सदस्य अमृता पवार म्हणाल्या की, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन ही कौतुकास्पद संकल्पना असून हे अभियान सातत्याने पुढे चालत राहावे तसेच यातून मोठ्या संख्येने अधिकारी घडावेत यासाठी संस्थेच्या पातळीवर तसेच वैयिक्तकरीत्या सर्वतोपरी मदत करण्यास मीकटिबद्ध असून, लवकरच तालुक्यातील इतर महाविद्यालयात हा उपक्र म राबवला जाईल असे सांगतविद्यार्थ्यांत ऊर्जा निर्माण होणे गरजेचे आहे, असे सांगितले.विद्यार्थ्यांनी ध्येय निश्चित करून त्या दिशेने सतत प्रयत्न करावा.टाकीचे घाव सोसल्या शिवाय देवपण येत नाही. त्या प्रमाणे सतत प्रयत्न केल्याशिवाय यश मिळत नाही असे सांगितले.याप्रसंगी बळीराजा फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष व स्पर्धा परीक्षा अभियानाचे निमंत्रक हंसराज वडघुले , गटविकास अधिकारी अभिजित हजारे , अमृता पवार , प्राचार्य डॉ. आर.एन.भवरे यांची भाषणे झालीकार्यक्र माचे सूत्रसंचालन प्रा.श्रीमती आर.एस.मोहोड यांनी केले.

टॅग्स :NashikनाशिकStudentविद्यार्थी