शहरं
Join us  
Trending Stories
1
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
2
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
3
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
4
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
5
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
6
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
7
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
8
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
9
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
10
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
11
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
12
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
13
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
14
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
15
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
16
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
17
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
18
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
19
'या' देशात वडील मुलाला देतात कंडोम तर आई बॅगेत गर्भनिरोधक गोळ्या ठेवते; कारण ऐकून हैराण व्हाल
20
500 KM रेंज देणारी Maruti e-Vitara किती तारखेला लॉन्च होणार? खास असतील फीचर्स, जाणूनघ्या किंमत!

नऊ गाव पाणी पुरवठा योजना कुचकामी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2020 01:14 IST

नायगाव : सिन्नरच्या उत्तर भागातील नायगाव खोऱ्यातील गावांना पिण्याच्या पाण्यासाठी वरदान ठरणाºया नायगावसह नऊ गाव पाणी पुरवठा योजना सध्या कुचकामी ठरत आहे. कृत्रिम पाणी टंचाईमुळे महिलांना पावसाळ्यात पाण्यासाठी वणवण करण्याची वेळ आली आहे.

ठळक मुद्देनायगाव : पावसाळ्यात महिलांवर वणवण करण्याची वेळ

नायगाव : सिन्नरच्या उत्तर भागातील नायगाव खोऱ्यातील गावांना पिण्याच्या पाण्यासाठी वरदान ठरणाºया नायगावसह नऊ गाव पाणी पुरवठा योजना सध्या कुचकामी ठरत आहे. कृत्रिम पाणी टंचाईमुळे महिलांना पावसाळ्यात पाण्यासाठी वणवण करण्याची वेळ आली आहे.खोºयातील गावांना वरदान ठरणारी ही योजना गेल्या काही दिवसांपासून महिलांसाठी डोकेदुखी ठरत आहे. गेल्या आठ-दहा दिवसांपासून पाणी पुरवठा ठप्प झाल्याने सर्वच गावांमध्ये सध्या पाणी टंचाई निर्माण झाली आहे. सध्या पावसाळा असूनही नायगाव खोºयातील महिलांवर हंडाभर पाण्यासाठी वणवण फिरण्याची वेळ आली आहे.पाणी पुरवठा करणाºया उद्भव विहिरी शेजारून नदी दुथडी भरून वाहत असतांनाही या योजनेतून पाणी पुरवठा होत नसल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे.जायगाव, देशवंडी, वडझीरे, ब्राम्हणवाडे, मोहदरी आदी गावांच्या पिण्याच्या पाण्यासाठी वरदान ठरत आहे. मात्र हीच नळपाणी पुरवठा योजना गेल्या दोन वर्षांपासून जलवाहिनी फुटण्याच्या कारणांमुळे वारंवार बंद पडत आहे. उद्भव विहिरीपासून मोहदरी येथील जलशुध्दीकरण केंद्रापर्यंतची तसेच मोहदरी येथुन नायगाव खोºयातील मुख्य जलवाहिनीची वारंवार दुरवस्था होत असल्यामुळे पाणी पुरवठा खंडीत होत आहे. त्यामुळे ही जलवाहिनी बदलण्याची गरज निर्माण झाली आहे.गेल्या दोन वर्षात या योजनेची मुख्य जलवाहिनी शेकडो वेळा फुटण्याचे प्रकार झाले आहे. वारंवार होणाºया दुरुस्तीचे बीलही काही हजारो रूपयांपर्यंत जाते. दोन वर्षातील एकंदरीत दुरूस्तीचे बील बघितले तर जवळपास या संपूर्ण योजनेच्या नवीन पाईप लाईनच्या बीलापर्यंत पोहचेल मग वारंवार दुरूस्ती पेक्षा नवीनच लोखंडी लाईन का टाकली जात नाही याबाबत सर्वत्र आश्चर्य व्यक्त होत आहे. 

टॅग्स :water shortageपाणीकपातgram panchayatग्राम पंचायत