शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

नऊ गाव पाणी पुरवठा योजना कुचकामी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2020 01:14 IST

नायगाव : सिन्नरच्या उत्तर भागातील नायगाव खोऱ्यातील गावांना पिण्याच्या पाण्यासाठी वरदान ठरणाºया नायगावसह नऊ गाव पाणी पुरवठा योजना सध्या कुचकामी ठरत आहे. कृत्रिम पाणी टंचाईमुळे महिलांना पावसाळ्यात पाण्यासाठी वणवण करण्याची वेळ आली आहे.

ठळक मुद्देनायगाव : पावसाळ्यात महिलांवर वणवण करण्याची वेळ

नायगाव : सिन्नरच्या उत्तर भागातील नायगाव खोऱ्यातील गावांना पिण्याच्या पाण्यासाठी वरदान ठरणाºया नायगावसह नऊ गाव पाणी पुरवठा योजना सध्या कुचकामी ठरत आहे. कृत्रिम पाणी टंचाईमुळे महिलांना पावसाळ्यात पाण्यासाठी वणवण करण्याची वेळ आली आहे.खोºयातील गावांना वरदान ठरणारी ही योजना गेल्या काही दिवसांपासून महिलांसाठी डोकेदुखी ठरत आहे. गेल्या आठ-दहा दिवसांपासून पाणी पुरवठा ठप्प झाल्याने सर्वच गावांमध्ये सध्या पाणी टंचाई निर्माण झाली आहे. सध्या पावसाळा असूनही नायगाव खोºयातील महिलांवर हंडाभर पाण्यासाठी वणवण फिरण्याची वेळ आली आहे.पाणी पुरवठा करणाºया उद्भव विहिरी शेजारून नदी दुथडी भरून वाहत असतांनाही या योजनेतून पाणी पुरवठा होत नसल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे.जायगाव, देशवंडी, वडझीरे, ब्राम्हणवाडे, मोहदरी आदी गावांच्या पिण्याच्या पाण्यासाठी वरदान ठरत आहे. मात्र हीच नळपाणी पुरवठा योजना गेल्या दोन वर्षांपासून जलवाहिनी फुटण्याच्या कारणांमुळे वारंवार बंद पडत आहे. उद्भव विहिरीपासून मोहदरी येथील जलशुध्दीकरण केंद्रापर्यंतची तसेच मोहदरी येथुन नायगाव खोºयातील मुख्य जलवाहिनीची वारंवार दुरवस्था होत असल्यामुळे पाणी पुरवठा खंडीत होत आहे. त्यामुळे ही जलवाहिनी बदलण्याची गरज निर्माण झाली आहे.गेल्या दोन वर्षात या योजनेची मुख्य जलवाहिनी शेकडो वेळा फुटण्याचे प्रकार झाले आहे. वारंवार होणाºया दुरुस्तीचे बीलही काही हजारो रूपयांपर्यंत जाते. दोन वर्षातील एकंदरीत दुरूस्तीचे बील बघितले तर जवळपास या संपूर्ण योजनेच्या नवीन पाईप लाईनच्या बीलापर्यंत पोहचेल मग वारंवार दुरूस्ती पेक्षा नवीनच लोखंडी लाईन का टाकली जात नाही याबाबत सर्वत्र आश्चर्य व्यक्त होत आहे. 

टॅग्स :water shortageपाणीकपातgram panchayatग्राम पंचायत