शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

पेठमध्ये दुसऱ्या दिवशीही संततधार

By admin | Published: August 04, 2016 12:52 AM

घरांची पडझड : भातशेतीचे नुकसान; पंचनामे करण्याची मागणी

पेठ : शहरासह तालुक्यात सलग दुसऱ्या दिवशी संततधार सुरूच असून, नद्या-नाल्यांना मोठ्या प्रमाणावर पूर ओसंडून वाहत आहे. वाघेरा घाटातील एकेरी वाहतूक बुधवारी सायंकाळी सुरू करण्यात आली.गत दोन दिवसापासून संपूर्ण तालुक्यात मुसळधारेने हाहाकार उडवला आहे. गावोगावी घरांची मोठ्या प्रमाणात पडझड झाली असून, भिंतींना ओल आल्याने घरसंसार उघड्यावर पडले आहेत. जवळपास सर्व नद्या तुडुंब भरून वाहत असल्याने गावांचा संपर्क तुटला आहे. घाट रस्त्यावर मातीचे भराव खचल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे.भुवन घाटात दरड कोसळलीभुवनच्या घाटात ठिकठिकाणी दरड कोसळल्याने भुवन, खामशेत, खडकी, आंबापाणी, बोंडारमाळ, उम्रद, बोरपाडा, बिलकस आदि गावांचा पेठशी संपर्क तुटला असून, पेठ, भुवन, हरसूल मार्ग बंद झाला आहे. दमणगंगासह लहान-मोठ्या नद्यांना प्रचंड पूर आल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. कोटंबी घाटातील दरड हटविण्याचे काम मजुरांच्या साह्याने केले जात असून, यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे.पंचनामे करण्याची मागणीमुसळधार पावसाने लावणी केलेले भात व नागलीच्या पिकांची मोठ्या प्रमाणावर हानी झाली असून, प्रशासनाने शासकीय यंत्रणेकडून तत्काळ पंचनामे करून अहवाल सादर करण्याची मागणी करण्यात येत आहे. घाटात मोठी दरड कोसळल्याने दोन दिवसांपासून नाशिक - हरसूल मार्ग बंद होता. प्रवाशासह वाहनधारकांचे प्रचंड हाल होत होते. पोलीस व सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्यात दरड हटवण्यावरून कलगीतुरा सुरू असल्याने रस्ता मोकळा करण्यात विलंब झाला असल्याची चर्चा आहे. (वार्ताहर)