शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

दुसऱ्या दिवशीही विसर्ग सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2018 2:09 AM

नाशिक : चार दिवसांपासून संततधार असलेल्या पावसाने मंगळवारी दुपारनंतर काहीशी विश्रांती घेतली असली तरी, धरण क्षेत्रात हजेरी कायम आहे. गंगापूर, दारणासह चार धरणांतून दुसºया दिवशीही पाण्याचा विसर्ग कायम आहे. हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिला असल्यामुळे नागरिकांनी सावधानता बाळगण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

ठळक मुद्देपावसाची उघडीप : सतर्कतेचा इशारा कायम

नाशिक : चार दिवसांपासून संततधार असलेल्या पावसाने मंगळवारी दुपारनंतर काहीशी विश्रांती घेतली असली तरी, धरण क्षेत्रात हजेरी कायम आहे. गंगापूर, दारणासह चार धरणांतून दुसºया दिवशीही पाण्याचा विसर्ग कायम आहे. हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिला असल्यामुळे नागरिकांनी सावधानता बाळगण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.मंगळवारी सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत जिल्ह्यात २८७ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली असून, त्यात सर्वाधिक पाऊस पेठ तालुक्यात ८४ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. त्या खालोखाल सुरगाणा ६०, इगतपुरी ५८ मिलिमीटर पाऊस नोंदविला गेला. तर त्र्यंबकेश्वर येथे २७ व आंबोली येथे सायंकाळपर्यंत ६० मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आल्यामुळे गंगापूर धरण ७९ टक्के भरले आहे. परिणामी धरणक्षेत्रात पाऊस सुरूच असल्याने सोमवारी सकाळपासून सोडण्यात येत असलेले पाणी मंगळवारीही कायम ठेवण्यात आले. गंगापूरमधून ९३०२ क्यूसेक पाणी सोडण्यात आले आहे. दारणा धरणातदेखील ७९ टक्के साठा झाल्यामुळे धरणातून १०६०० क्यूसेक पाणी सोडण्यात आले आहे. चणकापूरमधून ३०८५ व पुनदमधून ११९८ क्यूसेक पाणी सोडण्यात आले आहे.पावसाने मंगळवारी दुपारी उघडीप दिल्यामुळे गेल्या चार दिवसांपासून विस्कळीत झालेले जनजीवन पूर्वपदावर येण्यास मदत झाली आहे. दुसरीकडे मालेगाव, नांदगाव, बागलाण, चांदवड, देवळा, येवला व निफाड तालुक्यांकडे पावसाची वक्रदृष्टी आहे.मंगळवारी सकाळी ८ वाजेपर्यंत जिल्ह्यात ६५६ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली असून, त्यात सर्वाधिक पाऊस इगतपुरी येथे १४५ मिलिमीटर इतका विक्रमी नोंदविण्यात आला आहे. त्या खालोखाल पेठला १३६, त्र्यंबकला ११३, सुरगाणा ९४ व नाशिकला ६६ मिलिमीटर पाऊस झाला आहे.

टॅग्स :floodपूर