शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

नवीन ग्राहक संरक्षण कायदा ग्राहकाभिमुख, अरुण भार्गवे यांचे मत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2020 20:05 IST

नाशिक : केंद्र शासनाने ग्राहक संरक्षण कायद्यात सुधारणा केल्या असून, त्यामुळे ग्राहक अधिक सशक्तहोणार आहेत. किंबहूना ग्राहकाभिमुख असाच हा कायदा आहे. मात्र आता, ग्राहकांनी सजग आणि सक्षम येऊन लढा दिल्यासच ग्राहकांचे शोषण थांबू शकेल, असे मत ग्राहकपंचायत महाराष्टÑाचे विभाग संघटक अरुण भार्गवे यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देजिल्हा मंच सक्षम होतीलआता ग्राहक सक्षम होणे आवश्यक

नाशिक : केंद्र शासनाने ग्राहक सौरक्षण कायद्यात सुधारणा केल्या असून दि. 20जुलै 2020 पासून त्याची अंमलबजावणी होत आहे. या सुधारणांमुळे ग्राहक अधिकारी सशक्त होणार आहे किंबहुना ग्राहकाभिमुख असाच हा कायदा आहे. मात्र आता ग्राहकांनी सजग राहून सक्षमपणे त्याचा उपयोग केल्यास ग्राहकांचे शोषण थांबण्यास मदत होईल, असे मत ग्राहक पंचायत महाराष्ट्राचे विभाग संघटक अरुण भार्गवे यांनी व्यक्त केले.

भार्गवे हे १९९३ पासून ग्राहक चळवळीत असून, ग्राहक चळवळीचे प्रणेते (कै.) बिंदूमाधव जोशी यांच्या नेतृत्वाखाली काम केले आहेत. केंद्र शासनाने ग्राहक संरक्षण कायद्यात बदल केले असून, गेल्या वर्षी ९ आॅगस्ट रोजीराष्ट्रपतींनीत्यावर स्वाक्षरी केली होती. १०१ कलम असलेला हा कायदा येत्या २० जुलैपासून देशभरात लागू होणार असून, त्या पार्श्वभूमीवर भार्गवे यांनी मत व्यक्त केले.

प्रश्न-नवीन ग्राहक संरक्षण कायद्याविषयी काय वाटते?भार्गवे-नवीन ग्राहक संरक्षण कायद्याची प्रतीक्षा होतीच. त्यात जुन्या कायद्यात अनेक प्रकारचे बदल करण्यात आले आहेत. त्यानुसार फसवी जाहिरात करणारे सेलिब्रेटीदेखील कायद्याच्या कक्षेत आले आहेत. तसेच सर्वांत महत्त्वाचे म्हणजे एखादा ग्राहक नाशिकला राहत असेल आणि उत्पादक कंपनी दिल्लीत असेल तर त्याला आता नाशिकमध्ये सुद्धा या कंपनीच्या विरोधात धाव घेता येईल. जिल्हा तक्रार निवारण मंचांकडे यापूर्वी २० लाख रुपयांच्या मर्यादेपर्यंतचे दावे चालत होते. आता एक कोटी रुपयांपर्यंतचे दावे चालू शकतील. आज नाशिकमध्ये फ्लॅटच्या किमती पन्नास ते सत्तर लाख रुपये किमती झाल्या आहेत. त्यामुळे नाशिकमध्ये आता अशा फ्लॅटच्या संदर्भातील तक्रारींचे निराकरण होऊ शकेल. त्यामुळे ग्राहकांना त्याचा खूप फायदा होणार आहे.

प्रश्न- या कायद्यात काही उणिवा आहेत का?भार्गवे- सध्याच्या कायद्यासंदर्भात ग्राहक चळवळीची एक मागणी होती. ती पूर्ण झाली असती तर अधिक योग्य झाले असते. आज ग्रामीण भागात सात-आठ हजार रुपयांच्या बियाण्यांची फसवणूक झाली तरी तक्रारकर्त्याला जिल्हा मंचाकडे धाव घ्यावे लागते. तक्रार अर्जाच्या प्रती आणि प्रवास यातच चार-पाच हजार रुपये सहज खर्च होतात. त्यामुळे ग्राहक तक्रारींसाठी जिल्ह्याकडे येण्यास तयार होत नाही. तालुकास्तरावर ग्राहक तक्रार निवारण मंच स्थापन व्हावे ही मागणी होती ती पूर्ण झाली असती तर ग्रामीण भागात ग्राहक चळवळ वाढली असती.

प्रश्न- ग्राहक कायद्यात सुधारणा झाली; परंतु ग्राहक स्वत: किती सजग आहेत, असे वाटते?भार्गवे- ग्राहकांनी अधिक सक्षम होण्याची गरज आहे. शासनाने सबळ कायदा केला आहे, परंतु नागरिक स्वत: त्यासाठी तयार झाले पाहिजे. अनेक नागरिक आमच्याकडे तक्रारी घेऊन येतात. परंतु लेखी तक्रार मागितली की दुकानदाराशी वाद-विवाद नको म्हणून तक्रारी करत नाही. असे केले तर कायदे करून उपयोग होणार नाही.

कायद्यातील सुधारणा. 

वाढीव अधिकार = जिल्हा न्यायमंच एक कोटी पर्यंत.  राज्य आयोग 10 कोटीपर्यंत . राष्ट्रीय आयोग 10कोटींचे वर. 

फसव्या जाहिराती, भेसळयुक्त उत्पादन अगर बनावट उत्पादन केल्यास दंड व तुरुंगवासाची तरतूद. 

ऑनलाईन आणि टेलिशॉपिंग कंपन्यांचा प्रथमच कायद्यात समावेश.  ग्राहक मेडिकेशन सेलची स्थापना ठळक वैशिष्ट्ये या सुधारणांमध्ये दिसून येतात. ग्राहकांचे शोषण थांबविण्यासाठी ग्राहकांनीच पुढाकार घेतला पाहिजे. 

मुलाखत- संजय पाठक

टॅग्स :NashikनाशिकCourtन्यायालयconsumerग्राहक