शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
2
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
3
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
4
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
5
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
6
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
7
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
8
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
9
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
10
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
11
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
12
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
13
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
14
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
15
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
16
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
17
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
18
IND vs PAK Asia Cup 2025 Final Live Streaming : भारत-पाक 'महायुद्ध'! कुठं अन् कशी पाहता येईल ऐतिहासिक फायनल?
19
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
20
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना

मोदी सरकारला रोखण्याची गरज: चव्हाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2018 18:58 IST

नाशिक : फ्रान्सकडून खरेदी करण्यात आलेल्या ३६ राफेल विमान खरेदी प्रकरणात चाळीस हजार कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाला असून विरोधी पक्ष, मंत्रिमंडळाची संरक्षण विषयक समितीला अंधारात ठेवून विमान खरेदीचा करार करण्यात आला आहे़ या भ्रष्टाचाराबाबत काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा खासदार राहुल गांधी यांनी संसदेत प्रश्न उपस्थित करूनही पंतप्रधान मोदी यावर बोलत नाहीत़ नोटाबंदी, जीसएसटी, पेट्रोलचे भाव कमी करण्यात सरकारची हतबलता ही मोदी सरकारच्या काळात देशाची अर्थकारण बिघडल्याचे सूचित करते़ अशा या हुकूमशाही, भ्रष्टाचारी व सर्वसामान्यांची पिळवणूक करणाºया मोदी सरकारला जाब विचारण्याची वेळ आल्याचे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले़

ठळक मुद्देराफेल विमान खरेदी भ्रष्टाचारचौकशीच्या मागणीसाठी काँग्रेसचा मोर्चा जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

नाशिक : फ्रान्सकडून खरेदी करण्यात आलेल्या ३६ राफेल विमान खरेदी प्रकरणात चाळीस हजार कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाला असून विरोधी पक्ष, मंत्रिमंडळाची संरक्षण विषयक समितीला अंधारात ठेवून विमान खरेदीचा करार करण्यात आला आहे़ या भ्रष्टाचाराबाबत काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा खासदार राहुल गांधी यांनी संसदेत प्रश्न उपस्थित करूनही पंतप्रधान मोदी यावर बोलत नाहीत़ नोटाबंदी, जीसएसटी, पेट्रोलचे भाव कमी करण्यात सरकारची हतबलता ही मोदी सरकारच्या काळात देशाची अर्थकारण बिघडल्याचे सूचित करते़ अशा या हुकूमशाही, भ्रष्टाचारी व सर्वसामान्यांची पिळवणूक करणाºया मोदी सरकारला जाब विचारण्याची वेळ आल्याचे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले़

केंद्रातील मोदी व राज्यातील फडणवीस सरकारकडून जनतेची सुरू असलेली फसवणूक, राफे ल खरेदीतील अनियमितता, पेट्रोल - डिझेलचे वाढलेले भाव, बेरोजगारी, शेतकरीविरोधी धोरणे, भ्रष्टाचार या विरोधात शहर व जिल्हा काँग्रेसच्या वतीने मंगळवारी (दि़११) शहरातून मोर्चा काढण्यात आला होता़ या मोर्चाच्या समारोपप्रसंगी चव्हाण बोलत होते, राफेल विमान खरेदी भ्रष्टाचाराबाबत बोलतांना ते म्हणाले की, संरक्षणात महत्वाची भूमिका असलेल्या हवाई दलासाठी उच्च प्रतिची विमाने खरेदीचा मुद्दा २००० मध्ये चर्चेत आला़ यावर युपीए सरकारने विविध देशांकडून निविदा मागवून ६३० ते ६५० कोटी रुपये किमतीची १२६ राफेल विमाने खरेदीचा निर्णय घेतला़ यापैकी १८ विमाने ही फ्रान्सकडून तर १०८ विमाने ही एचएएचल कंपनीत तयार केली जाणार होती़

पंतप्रधान मोदी हे २०१५ मध्ये फ्रान्सच्या दौ-यावर गेल्यानंतर त्यांनी हा करार रद्द केला व १६६० कोटी रुपये किमतीची ३६ विमाने खरेदी करण्याचा करार केला़ यातील प्रत्येक विमानासाठी १०५० ते १०६० कोटी रुपये अतिरिक्त देण्यात आले असून यामध्ये ४० हजार कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाला आहे़ याबरोबरच विमाननिर्मितीचे ३० हजार कोटी रुपयांचे काम एचएएल या अनुभवी कंपनीऐवजी काही दिवसांपुर्वीच तयार झालेल्या रिलायन्स कंपनीला देण्यात आले़ या विमान खरेदीतील भ्रष्टाचाराबाबत पंतप्रधान संसदेत उत्तरे देत नाही़ त्या घोटाळ्याची व्याप्ती जनतेपर्यंत पोहोचावी, यातील दोषींची चौकशी व्हावी यासाठी कॉग्रेसतर्फे मोर्चा काढून जनजागृती केली जात असल्याचे चव्हाण यांनी सांगितले़

महात्मा गांधीरोडवरील काँग्रेस कार्यालयापासून या मोर्चास सुरुवात झाली़ मेहेर सिग्नल, अशोकस्तंभ, रविवार कारंजा, मेनरोड, रेडक्रॉस सिग्नल, शालिमारमार्गे हा मोर्चा डॉ़ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ मोर्चाचा समारोप झाला़ यानंतर काँग्रसचे शहराध्यक्ष शरद अहेर, जिल्हाध्यक्ष राजाराम पानगव्हाने व पदाधिका-यांनी निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांना मागण्यांचे निवदेन देण्यात आले़ यावेळी मोर्चेक-यांनी भाजपा सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली़ या मोर्चामध्ये माजी मंत्री डॉ. शोभा बच्छाव, नगरसेवक हेमलता पाटील, शाहू खैरे, डॉ. तुषार शेवाळे, अश्विनी बोरस्ते, कल्पना पांडे, ज्ञानेश्वर काळे, ज्ञानेश्वर गायकवाड, रमेश कहांडळे, वत्सला खैरे, आदींसह पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते़

टॅग्स :PoliticsराजकारणNashikनाशिकcongressकाँग्रेस