शहरं
Join us  
Trending Stories
1
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
2
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
3
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!
4
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
5
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
6
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
7
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
8
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
9
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
10
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
11
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
12
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
13
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
14
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
15
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
16
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
17
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
18
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
19
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
20
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!

गरिबांना मारणाऱ्या विकासाविरोधात उभे राहण्याची गरज : चर्चासत्रातील सूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2020 01:26 IST

संविधानप्रेमी नागरिकांनी एकत्र येऊन धर्मांध, जातीयवादी, गरिबांना मारणाºया विकासाच्या विरोधात उभे राहण्याची गरज निर्माण झाली असल्याचा सूर महाराष्ट्र सोशल फोरमच्या चर्चासत्रातला गुरुवारी (दि. २०) आॅनलाइन चर्चासत्रात उमटला.

ठळक मुद्देमहाराष्ट्र सोशल फोरम : आॅनलाइन माध्यमातून देशासमोरील विविध प्रश्नांचा ऊहापोह

नाशिक : संविधानप्रेमी नागरिकांनी एकत्र येऊन धर्मांध, जातीयवादी, गरिबांना मारणाºया विकासाच्या विरोधात उभे राहण्याची गरज निर्माण झाली असल्याचा सूर महाराष्ट्र सोशल फोरमच्या चर्चासत्रातला गुरुवारी (दि. २०) आॅनलाइन चर्चासत्रात उमटला.डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येला आज सात वर्ष पूर्ण झाली; पण त्यामागचे सूत्रधार अजून पकडले गेले नाही, म्हणून त्याचा निषेध व्यक्त करीत आजचा हा दिवस डॉ. दाभोळकर यांना समर्पित करून महाराष्ट्र सोशल फोरमच्या कार्याची सुरुवात झाली. यात महाराष्ट्रातल्या तीस जिल्ह्यांमध्ये आॅनलाइन बैठका झाल्या. संबंधित जिल्ह्यातील प्रश्न सोडवण्यासाठी राज्य सरकार तसेच केंद्र सरकारने धोरण स्वीकारावे, असे ठराव मांडले गेले. त्यानंतर भंडाºयाचे अविल बोरकर, गडचिरोलीच्या शुभदा देशमुख, नागपूरचे डॉ. प्रमोद मुनघाटे, धुळ्याच्या अश्विनी जाधव, मुंबईचे संदेश लाळगे, साताºयाचे अशोक भालेराव, सांगलीच्या संग्राम संस्थेचे शशिकांत माने आणि परभणीवरून लता आणि सारंग साळवी यांनी त्यांचे प्रश्न मांडले.महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य कार्यवाहक अविनाश पाटील यांनी देशात चाललेल्या वातावरणाला उत्तर देण्यासाठी आवश्यक असणारी कायदे साक्षरता करून युवकांच्या शक्तीला रचनात्मक कामासाठी आणि त्यानिमित्ताने देशाच्या जडणघडणीत सहभागी करून घेण्याचा विचार मांडला. मासूम संस्थेच्या संस्थापक डॉ. मनीषा गुप्ते यांनी एकत्रित चळवळीची गरज व्यक्त केली.लोक संघर्ष मोर्चाच्या प्रतिभा शिंदे यांनी स्वतंत्र विचार मांडणाऱ्यांना धमकावण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप केला. नितीन मते व अनिता पगारे यांनी संयोजन केले.लोकशाही दडपण्यासाठी लॉकडाऊनचा उपयोगसत्तेत असलेल्या शक्तीकडून समाजात ठरवून भूक निर्माण केली असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्या उल्का महाजन यांनी या विचारसत्रात बोलताना केला. कोरोना ही संधी घेत लॉकडाऊनचा उपयोग उपचारासाठी न करता लोकशाहीला दडपण्यात केला गेल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला.धार्मिक बहुसंख्याकवादाचा उन्माद : डॉ. मिन्झराजकीय अभ्यासक प्रा. झोया हसन यांनी देशात धार्मिक बहुसंख्याकवादाचा उन्माद वाढत असल्याची खंत व्यक्त केली तर डॉ. सोनलिहाजा मिन्झ यांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारामुळे महिलांना हक्क मिळाले. पण अजूनही आदिवासी महिला शिक्षण आणि नोकºयांच्या संधीपासून मोठ्याप्रमाणावर वंचित असल्याची खंत व्यक्त केली.

टॅग्स :NashikनाशिकSocialसामाजिक