शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
3
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
4
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
5
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
6
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
7
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
8
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
9
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
10
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
11
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
12
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
13
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
14
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
15
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
16
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
17
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
18
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
19
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
20
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...

गरिबांना मारणाऱ्या विकासाविरोधात उभे राहण्याची गरज : चर्चासत्रातील सूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2020 01:26 IST

संविधानप्रेमी नागरिकांनी एकत्र येऊन धर्मांध, जातीयवादी, गरिबांना मारणाºया विकासाच्या विरोधात उभे राहण्याची गरज निर्माण झाली असल्याचा सूर महाराष्ट्र सोशल फोरमच्या चर्चासत्रातला गुरुवारी (दि. २०) आॅनलाइन चर्चासत्रात उमटला.

ठळक मुद्देमहाराष्ट्र सोशल फोरम : आॅनलाइन माध्यमातून देशासमोरील विविध प्रश्नांचा ऊहापोह

नाशिक : संविधानप्रेमी नागरिकांनी एकत्र येऊन धर्मांध, जातीयवादी, गरिबांना मारणाºया विकासाच्या विरोधात उभे राहण्याची गरज निर्माण झाली असल्याचा सूर महाराष्ट्र सोशल फोरमच्या चर्चासत्रातला गुरुवारी (दि. २०) आॅनलाइन चर्चासत्रात उमटला.डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येला आज सात वर्ष पूर्ण झाली; पण त्यामागचे सूत्रधार अजून पकडले गेले नाही, म्हणून त्याचा निषेध व्यक्त करीत आजचा हा दिवस डॉ. दाभोळकर यांना समर्पित करून महाराष्ट्र सोशल फोरमच्या कार्याची सुरुवात झाली. यात महाराष्ट्रातल्या तीस जिल्ह्यांमध्ये आॅनलाइन बैठका झाल्या. संबंधित जिल्ह्यातील प्रश्न सोडवण्यासाठी राज्य सरकार तसेच केंद्र सरकारने धोरण स्वीकारावे, असे ठराव मांडले गेले. त्यानंतर भंडाºयाचे अविल बोरकर, गडचिरोलीच्या शुभदा देशमुख, नागपूरचे डॉ. प्रमोद मुनघाटे, धुळ्याच्या अश्विनी जाधव, मुंबईचे संदेश लाळगे, साताºयाचे अशोक भालेराव, सांगलीच्या संग्राम संस्थेचे शशिकांत माने आणि परभणीवरून लता आणि सारंग साळवी यांनी त्यांचे प्रश्न मांडले.महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य कार्यवाहक अविनाश पाटील यांनी देशात चाललेल्या वातावरणाला उत्तर देण्यासाठी आवश्यक असणारी कायदे साक्षरता करून युवकांच्या शक्तीला रचनात्मक कामासाठी आणि त्यानिमित्ताने देशाच्या जडणघडणीत सहभागी करून घेण्याचा विचार मांडला. मासूम संस्थेच्या संस्थापक डॉ. मनीषा गुप्ते यांनी एकत्रित चळवळीची गरज व्यक्त केली.लोक संघर्ष मोर्चाच्या प्रतिभा शिंदे यांनी स्वतंत्र विचार मांडणाऱ्यांना धमकावण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप केला. नितीन मते व अनिता पगारे यांनी संयोजन केले.लोकशाही दडपण्यासाठी लॉकडाऊनचा उपयोगसत्तेत असलेल्या शक्तीकडून समाजात ठरवून भूक निर्माण केली असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्या उल्का महाजन यांनी या विचारसत्रात बोलताना केला. कोरोना ही संधी घेत लॉकडाऊनचा उपयोग उपचारासाठी न करता लोकशाहीला दडपण्यात केला गेल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला.धार्मिक बहुसंख्याकवादाचा उन्माद : डॉ. मिन्झराजकीय अभ्यासक प्रा. झोया हसन यांनी देशात धार्मिक बहुसंख्याकवादाचा उन्माद वाढत असल्याची खंत व्यक्त केली तर डॉ. सोनलिहाजा मिन्झ यांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारामुळे महिलांना हक्क मिळाले. पण अजूनही आदिवासी महिला शिक्षण आणि नोकºयांच्या संधीपासून मोठ्याप्रमाणावर वंचित असल्याची खंत व्यक्त केली.

टॅग्स :NashikनाशिकSocialसामाजिक