शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
5
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
6
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
7
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
8
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
9
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
10
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
11
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
12
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
13
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
14
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
15
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
16
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
17
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
18
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
19
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
20
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना

आत्मसन्मानासाठी दिव्यांगांचे पुनर्वसन करण्याची गरर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2019 00:21 IST

समाजातील सर्व प्रकारच्या दिव्यांगांना आपले आयुष्य सन्मानाने जगता यायला हवे, अशी संविधानात तरतूद आहे, मात्र अगोदर त्यांचे पुनर्वसन होणे गरजेचे आहे. त्यावेळी त्यांना आत्मसन्मानाने जगता येईल, असे प्रतिपादन कॅनडास्थित महाराष्ट्र सेवा समिती आॅर्गनायझेशन या सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष जीवन कायंदे यांनी केले.

ठळक मुद्देकायंदे : अपंग निवासी कार्यशाळेची पाहणी

येवला : समाजातील सर्व प्रकारच्या दिव्यांगांना आपले आयुष्य सन्मानाने जगता यायला हवे, अशी संविधानात तरतूद आहे, मात्र अगोदर त्यांचे पुनर्वसन होणे गरजेचे आहे. त्यावेळी त्यांना आत्मसन्मानाने जगता येईल, असे प्रतिपादन कॅनडास्थित महाराष्ट्र सेवा समिती आॅर्गनायझेशन या सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष जीवन कायंदे यांनी केले.येवला येथील मायबोली निवासी कर्णबधिर विद्यालयाच्या बहुद्देशीय अपंग निवासी कार्यशाळेच्या विविध प्रकल्पांची कायंदे यांनी पाहणी केली. यावेळी झालेल्या कार्यक्र मात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी निफाड येथील उद्योजक बबन कडभाने होते. व्यासपीठावर महाराष्ट्र सेवा समितीच्या धुळे येथील कार्यकर्त्या वैशाली सोनगिरे, निफाड येथील प्रगतिशील शेतकरी सुरेश दाते, नाशिक येथील सनदी लेखापाल अजय राठी, समता प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. अर्जुन कोकाटे उपस्थित होते.कायंदे म्हणाले, मायबोली सारख्या अपंग शाळांची संख्या वाढली पाहिजे. ही दिव्यांग शाळा प्रामुख्याने वंचित मुलांना व्यावसायिक प्रशिक्षण देऊन त्यांना त्यांच्या पायावर उभे करण्यासाठी सातत्याने धडपडत असते. विनाअनुदानित असूनही संस्था निवासी मुलांना सकस आहार देऊन सक्षम करीत आहे. त्यामुळेच या मुलांचे आयुष्य उभे राहत आहे, असे गौरवोद्गार त्यांनी काढले. बबन कडभाने म्हणाले, शाळेतील दिव्यांग मुलांची प्रगती पाहून आणि त्यांना मिळत असलेले व्यावसायिक प्रशिक्षण पाहून समाधान वाटले. मुख्याध्यापक बाबासाहेब कोकाटे यांनी सूत्रसंचालन केले. सुखदेव आहेर यांनी आभार मानले.दरम्यान, कर्णबधिर शाळेच्या विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली. ऐकता, बोलता न येणाऱ्या चिमुकल्यांचे कलाविष्कार पाहून मान्यवरांनी समाधान व्यक्त करीत त्यांच्या पुनर्वसनासाठी प्रयत्न होण्याची गरज असल्याची भावना यावेळी व्यक्त केली.

टॅग्स :cultureसांस्कृतिकEducationशिक्षण