शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

घरकुल योजनेच्या फेरआॅडिटची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2018 01:02 IST

केंद्रात संयुक्त पुरोगामी आघाडी सरकार असतानाच राबविण्यात आलेल्या घरकुल योजनेत शहर झोपडपट्टीमुक्त झाले नाही; मात्र निधी पूर्णत: खर्च झाला आहे. त्याहीपेक्षा शहरातील सर्व पात्र व्यक्तींना घरेच मिळाली नाहीत, त्यामुळे या सर्वच योजनेचे आॅडिट करण्याची गरज निर्माण झाली आहे.

नाशिक : केंद्रात संयुक्त पुरोगामी आघाडी सरकार असतानाच राबविण्यात आलेल्या घरकुल योजनेत शहर झोपडपट्टीमुक्त झाले नाही; मात्र निधी पूर्णत: खर्च झाला आहे. त्याहीपेक्षा शहरातील सर्व पात्र व्यक्तींना घरेच मिळाली नाहीत, त्यामुळे या सर्वच योजनेचे आॅडिट करण्याची गरज निर्माण झाली आहे. विशेषत: महापालिका आता पुन्हा राजीव आवास तसेच एसएआरची तयारी करीत असताना त्यात पुन्हा हेच लाभार्थी घुसविण्याआधीच याबाबत चौकशीची गरज निर्माण झाली आहे.  केंद्रात संयुक्त पुरोगामी आघाडी सरकार असताना केंद्र सरकारने घरकुल योजना राबविण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी नाशिक महापालिकेने अत्यंत उत्साह दाखविला आणि १६ हजार घरे बांधण्याची योजना आखली होती; परंतु ही योजना अव्यवहार्य पद्धतीने राबविण्यात आली. नसलेल्या जागा ताब्यात घेण्यासाठी आलेले अडथळे, लाभार्थी ठरविण्यातील गोंधळ आणि मंजूर निधीपेक्षा अवास्तव झालेला खर्च यामुळे ही योजना वादग्रस्त ठरली. योजनेच्या चौकशा करण्याच्या घोषणाही झाल्या; परंतु नंतर त्या थंड बस्त्यात ठेवण्यात आल्या.  केंद्र सरकारने ही योजना सात वर्षांची असताना केवळ घरे पूर्ण करण्यासाठी वेळोवेळी मुदतवाढ दिली होती; परंतु त्याचा लाभ महापालिकेला घेता आला नाही. केंद्रात सत्ताबदल झाल्यानंतर नेहरू अभियान नव्या सरकारने गुंडाळले, त्यालादेखील तीन वर्षे झाली; परंतु अद्यापही योजना पूर्ण झालेली नाही. चुंचाळे येथे सहा हजार घरे बांधण्यासाठी गवगवा करण्यात आला; परंतु येथे तीन हजार घरेच बांधता येऊ शकली, त्यातही येथील जागा सपाटीकरणासाठी कोट्यवधी रुपये ठेकेदाराला अतिरिक्त देण्यात आल्याने कॅगने त्यावर आक्षेप घेतला होता. मूळ निविदेत नसलेले बदल करण्यात आल्याने त्यावर पालिका प्रशासनाने मात्र मौन बाळगले.  आपल्या ताब्यात नसलेल्या जागा खरेदीवर मोठा खर्च करणाऱ्या महापालिकेला केंद्र सरकारने मंजूर केलेल्या घरांच्या दरापेक्षा अधिक खर्च करण्यात आल्याने मोठा भुर्दंडदेखील सहन करावा लागला; परंतु त्याबाबतही प्रशासनाने हे प्रकरण दडपले. घरकुल योजनेसाठी लाभार्थींची निवड हा मुद्दा अजूनही गाजत नगरसेवकाच्या मातापित्यांना लाभार्थी ठरविण्यात आले होते, याशिवाय एकाच कुटुंबातील अनेकांची रेशन कार्डे वेगवेगळी करून त्यावर त्यांना लाभार्थी ठरविण्याचे प्रकार देखील घडले होते. या सर्व प्रकारांचा विचार करता केंद्र शासन आणि महापालिकेने कोट्यवधी रुपये खर्च करून हाती काय पडले हा प्रश्नच असून, त्यामुळेच योजनेचे सर्वंकष मूल्यमापन करण्याची गरज निर्माण झाली आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिका