शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
2
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन
3
'मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा वैतागले'; प्रताप सरनाईकांनी सांगितलं 'मराठी मोर्चा'चा मुद्दा का चिघळला?
4
MS धोनीला कायदेशीर चॅलेंज! Captain Cool Trademark अर्जावर आक्षेप, कारण...
5
म्हणे, यांना इंग्रजी येत नाही, त्यांच्या देशात परत पाठवा; ब्रिटिश महिलेची भारतीय कर्मचाऱ्यांवर आगपाखड
6
ट्रम्प टॅरिफचा बाजारावर परिणाम नाही? कोटक महिंद्रात सर्वाधिक वाढ, तर घसरणाऱ्यांमध्ये टाटाचा शेअर
7
ट्रम्प यांनी १४ देशांवर लावलं टॅरिफ, द.कोरिया-जपानलाही सोडलं नाही; पण भारत-चीनला हातही लावला नाही, कारण काय?
8
Air India विमान अपघाताचे कारण लवकरच समोर येणार; तपास पथकाने सादर केला प्राथमिक अहवाल
9
आता मागणीनुसार बदलणार ओला-उबरचे भाडे! सरकारचे नवीन नियम, आता 'या' गोष्टी बदलणार!
10
तुम्हाला माहिती नसेल... सर्वाधिक पगार कोणत्या देशातील लोकांना मिळतो, तो किती आहे?
11
“विधानसभा निवडणुकीतील दस्तावेज नष्ट करण्याचे निवडणूक आयोगाचे परिपत्रक मतचोरी केल्याचाच पुरावा”
12
लय भारी! एकही पैसा खर्च न करता इन्स्टाग्रामवर कसे वाढवायचे फॉलोअर्स? 'ही' आहे सोपी पद्धत
13
रेखा झुनझुनवालांना ₹१००० कोटींचं नुकसान; Tata Group चा हा शेअर जोरदार आपटला, कारण काय?
14
चोरांवर मोर! दरोडेखोरांनाच घातला गंडा, ७५ लाखांच्या दागिन्यांचे १ लाखच दिले, त्यानंतर घडलं असं काही...
15
एक्सपायर झाल्यानंतर 'ही' १७ औषथे कचऱ्यात टाकण्याऐवजी टॉयलेटमध्ये फ्लश करा, कारण काय?
16
"मी गौरीसोबत लग्न केलंय...", आमिर खानचा मोठा खुलासा, चाहत्यांना आश्चर्याचा धक्का
17
"माझे हात थरथरत होते, ऐश्वर्या रायच्या ब्लाउजचं हूक..."; अभिनेत्रीने सांगितला 'तो' किस्सा
18
गुरुवारी गुरुपौर्णिमा: गुरु स्वामींचे दैवी शिष्यगण, आजही करतात मार्गदर्शन; सार्थक होते जीवन
19
Realme: आवाज ऐकताच फोटो एडीट करून देईल रिअलमीचा 'हा' फोन, लवकरच बाजारात करतोय एन्ट्री!
20
Gold Silver Price 8 July: सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; किंमत लाखांच्या पार, खरेदीपूर्वी पाहा नवे दर

चांगले वातावरण निर्माण करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे -बाळासाहेब थोरात

By admin | Updated: February 9, 2015 02:09 IST

चांगले वातावरण निर्माण करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे -बाळासाहेब थोरात

नाशिक : पूर्वीच्या आणि आताच्या निवडणुकांत बराच फरक पडला आहे. निवडणुकीची आताची पद्धत पाहिल्यावर लोकशाहीचे पुढे कसे होईल, उमेदवारी करावी की नाही, असा प्रश्न पडतो. निवडणुकांतील वाढता खर्च हा काळजीचा विषय झाला असून, याबाबत चांगले वातावरण निर्माण करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे मत माजी मंत्री तथा संगमनेरचे आमदार बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केले.येथील सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने कै. माधवराव लिमये यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दरवर्षी दिला जाणारा कार्यक्षम आमदार पुरस्कार स्वीकारल्यानंतर थोरात बोलत होते. परशुराम साईखेडकर नाट्यगृहात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कर्मवीर काकासाहेब वाघ शिक्षणसंस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब वाघ होते. थोरात यांच्या पत्नी कांचन, पुरस्कार निवड समितीचे जयप्रकाश छाजेड, वंदन पोतनीस, सावानाचे अध्यक्ष प्रा. विलास औरंगाबादकर, उपाध्यक्ष वासुदेव दशपुत्रे, कार्याध्यक्ष प्रा. विनया केळकर, देणगीदार डॉ. शोभा नेर्लीकर व्यासपीठावर उपस्थित होत्या. कार्यक्रमात बाळासाहेब वाघ यांच्या हस्ते बाळासाहेब थोरात यांना कार्यक्षम आमदार पुरस्कार सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला. पन्नास हजार रुपये, सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप होते.सत्काराला उत्तर देताना थोरात म्हणाले की, हा पुरस्कार हा आपल्या लोकप्रतिनिधित्वाचा सन्मान आहे. कौतुकामुळे उमेद वाढते. संगमनेरच्या जनतेचे प्रतिनिधित्व करण्याची संधी वयाच्या तिशीतच मिळाली. वडील भाऊसाहेब यांनी पाया तयार करून ठेवला होता. लोकप्रतिनिधीसाठी त्याचा मतदारसंघ सर्वांत महत्त्वाचा असतो. नियोजन, प्रामाणिकपणा व सातत्य यामुळेच यश मिळू शकले. काम केले नाही असा एकही दिवस गेला नाही. पाटबंधारे, शिक्षण, कृषी, महसूल अशा सर्व खात्यांत काम करण्याच्या संधीचे चीज केले. विरोधक, पक्षांतर्गत विरोधक, लोकांच्या अपेक्षा, कामांचे दडपण, प्रतिमेची जपणूक अशा अनेक आघाड्यांवर आमदाराला लढावे लागते. महाराष्ट्रात अनेक आमदार चांगले काम करीत आहेत. त्यांना सन्मानित केल्यास त्यांची उमेद वाढेल. नाशिक जिल्ह्याच्या प्रश्नांबाबत एकत्र येऊन, चर्चा करून मार्ग काढावा लागेल, असे ते म्हणाले.मुख्यमंत्र्यांची केली स्तुतीआमदार बाळासाहेब थोरात यांनी गतवर्षीचे कार्यक्षम आमदार पुरस्कारविजेते तथा विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्तुती केली. फडणवीस यांना विधानसभेतील कामकाजाचा फायदा झाल्याचे सांगत त्यांना लोकांच्या प्रश्नांची चांगली जाण असून, ते प्रश्नांची चांगली मांडणी करीत असल्याचेही ते म्हणाले. जयप्रकाश छाजेड, वंदन पोतनीस यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रा. औरंगाबादकर यांनी प्रास्ताविक केले. सावानाचे नाट्यगृह सचिव सुरेश गायधनी, प्रा. विनया केळकर यांनी परिचय करून दिला. दिनेश गायधनी, देवांग जोशी, विजय पाठक यांनी पुरस्कार वितरणापूर्वी वेदमंत्राचा उद्घोष केला. नरेश महाजन यांनी सूत्रसंचालन केले. जयप्रकाश जातेगावकर यांनी आभार मानले. आमदार डॉ. सुधीर तांबे, संगमनेरच्या नगराध्यक्ष दुर्गा तांबे, विनायकदादा पाटील, माधवराव पाटील, रावसाहेब कसबे, गुरुमित बग्गा, राजाराम पानगव्हाणे, शरद अहेर आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)