शहरं
Join us  
Trending Stories
1
ना ठराव, ना निर्णय! भारताच्या गैरहजेरीतही UNSC बैठकीत पाकिस्तानची 'अशी' झाली फजिती
2
"युद्ध झालं तर आम्ही भारताला साथ देऊ..."; पाकिस्तानच्या मशिदीत मौलानाची घोषणा
3
मिठी स्वच्छताप्रकरणी मुंबई पोलिसांची छापेमारी; गाळ काढल्याची खोटी माहिती देऊन लाटले ५५ कोटी
4
युद्ध झालं तर पाकिस्तानच्या हाती येईल 'भीक मागण्याच्या कटोरा', Moody's च्या रिपोर्टमधून झाले अनेक खुलासे
5
VIDEO: ३ इन १ माईनमधून वाचणे पाकिस्तानसाठी कठीण; DRDO च्या क्षेपणास्त्रामुळे एक चूक ठरणार शेवटची
6
"विराटचे चाहते त्याच्यापेक्षा मोठे जोकर", राहुल वैद्यने कोहलीला मारला टोमणा; नक्की झालं काय?
7
Met Gala 2025: हातात हात घालून आले सिड-कियारा, प्रेग्नंट बायकोची काळजी घेताना दिसला सिद्धार्थ मल्होत्रा
8
भारताविरोधात आणखी एक इस्लामिक देश पाकच्या मदतीला धावला; कराचीला पाठवली युद्धनौका
9
PNB मध्ये १ लाख रुपये जमा करा, मिळेल ₹१६,२५० चं फिक्स व्याज; पटापट चेक करा स्कीम डिटेल्स
10
भारत-पाकिस्तान तणावावर UNSC बैठकीत काय चर्चा झाली?; पाक म्हणतं, "जे पाहिजे ते मिळाले..." 
11
भाजपच्या माजी खासदारावर प्राणघातक हल्ला, कार्यकर्त्यांनी घरात लपवल्यामुळे वाचला जीव
12
पाकिस्तानसोबत युद्ध झाले तर मी पीएम फंडला ११ लाख देणार; 'या' व्यावसायिकाने केली मोठी घोषणा
13
या Mother's Day ला साडी-सोनं नको, आईला द्या इन्व्हेस्टमेंटचं बेस्ट गिफ्ट; भविष्य होईल सुरक्षित, मिळेल मोठं रिटर्न
14
महिला सेक्स अ‍ॅडिक्ट असली तरी...; निर्दोष सुटलेल्या आरोपीला सात वर्षांची शिक्षा, अलाहाबाद हायकोर्टाचा निकाल
15
Crime News : धक्कादायक! पत्नीचा मृतदेह दुचाकीवर घेऊन फिरत होता, पतीला पोलिसांनी अटक केली
16
Met Gala 2025: कियाराच्या बेबी बंप डेब्यूपासून शाहरूखच्या सिग्नेचर पोझपर्यंत, मेट गालामध्ये झळकले हे कलाकार
17
पाकिस्तान घाबरला! 'भारत नियंत्रण रेषेजवळ कधीही हल्ला करू शकतो', पाकिस्तानचे संरक्षण मंत्री चिंतेत
18
'ब्लॅकआऊट' म्हणजे काय?; १९७१ नंतर देशात पहिल्यांदाच युद्धजन्य परिस्थितीचे संकेत
19
India Pakistan: पाकिस्तानच्या सीमेवर कुरापती सुरूच; सलग १२व्या दिवशी गोळीबार
20
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 

भारतात भारतीय ज्ञानच देण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2019 01:44 IST

भारताची संस्कृती प्राचीन असल्यामुळे इतर देशातील लोक आपल्या संस्कृतीचा अभ्यास करत आहेत. मात्र आपल्या देशात सध्या पाश्चात्य ज्ञान मोठ्या प्रमाणावर शिकविले जात असून, यामुळे आपणच आपली संस्कृती जोपासत नाही. त्यामुळे आपल्या देशात भारतीय ज्ञानच देण्याची गरज असल्याचे प्रतिपादन पुनर्उत्थान विद्यापीठ, अहमदाबादच्या कुलगुरू इंदुमती काटदरे यांनी केले.

ठळक मुद्देइंदुमती काटदरे : कृष्णाजी वझे स्मृतिदिनी गौरव ग्रंथाचे प्रकाशन

नाशिक : भारताची संस्कृती प्राचीन असल्यामुळे इतर देशातील लोक आपल्या संस्कृतीचा अभ्यास करत आहेत. मात्र आपल्या देशात सध्या पाश्चात्य ज्ञान मोठ्या प्रमाणावर शिकविले जात असून, यामुळे आपणच आपली संस्कृती जोपासत नाही. त्यामुळे आपल्या देशात भारतीय ज्ञानच देण्याची गरज असल्याचे प्रतिपादन पुनर्उत्थान विद्यापीठ, अहमदाबादच्या कुलगुरू इंदुमती काटदरे यांनी केले.भारतीय इतिहास संकलन समिती, नाशिक व वैदिक शिल्प शोध प्रतिष्ठान, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी (दि.१५) रुंग्टा हायस्कूल येथे कृष्णाजी विनायक वझे यांच्या १५०व्या स्मृतिदिनानिमित्त ‘गौरव ग्रंथ : भाग १’ या ग्रंथाच्या प्रकाशन सोहळ्याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून काटदरे बोलत होत्या. यावेळी त्यांनी भारताच्या प्राचीन इतिहासाची साक्ष देणाऱ्या काही गोष्टी सांगितल्या. तसेच भारताला लवकरात लवकर प्रगती करायची असेल तर आपल्या भारताचा प्राचीन इतिहास समोर आणलाच पाहिजे.आपले प्राचीन विचार हे अजरामर असून, कोणताही देश याची बरोबरी करू शकत नाही. आपले लोक याला त्याला पुरून उरण्याची भाषा करत असतात. मात्र आपल्या विचारांनी लोकांवर पुरून उरण्याची भाषा आपण करणे आवश्यक आहे. यामुळे इतर देशांना आपले महत्त्व कळेल, असे त्यांनी सांगितले.या ग्रंथांचे संपादन मोहिनी पेणेकर यांनी केले आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संशोधक ओमप्रकाश कुलकर्णी हे होते. यावेळी इतिहास संकलन समितीचे अध्यक्ष राजेंद्र भामसे, आर्किटेक्ट महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. प्राजक्ता बस्ते, जयंत गायधनी, विजयप्रसाद उपाध्याय आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन बागेश्री पारनेरकर यांनी तर आभार देवेंद्र पंड्या यांनी मानले.

टॅग्स :Nashikनाशिकhistoryइतिहासcultureसांस्कृतिक