शहरं
Join us  
Trending Stories
1
शिरूरमध्ये 'तुतारी'ने वाढवलं अमोल कोल्हेंचं टेन्शन; निवडणूक आयोगाकडे आक्षेप नोंदवणार?
2
INDIA आघाडीचे ४ मुद्दे पडले भारी; भाजपाच्या 'अबकी बार ४०० पार' ला ब्रेक लागणार?
3
Solapur: पाणी देण्याचे वचन न पाळणाऱ्या शरद पवारांना धडा शिकवा! माळशिरसच्या सभेत नरेंद्र मोदींचा घणाघात
4
संरक्षण मंत्री राजनाथ सिंहांची संपत्ती किती? रिव्हॉल्व्हर, बंदूक, 12 किलो चांदी...
5
“कृपया तीन लाख लीडच्या चर्चा नको”; बाळासाहेब थोरातांनी ठाकरेंच्या उमेदवाराला थेट सांगितले
6
२५०० महिलांचे लैंगिक शोषण करणारा खासदार रेवन्ना परदेशात कसा पळाला? कर्नाटकात खळबळ
7
युद्ध शमणार की आणखी तीव्र होणार? हमासचे शिष्टमंडळ प्रतिक्रिया न देताच परतले, पुढे काय?
8
Amit Shah : "केजरीवालांची जेलमध्ये हत्या होऊ शकते"; AAP च्या आरोपांवर काय म्हणाले अमित शाह?
9
भाग्यवान! अवघ्या 210 रुपयांत मिळाली 10 लाखांची कार; शेतकऱ्याचं 'असं' फळफळलं नशीब
10
मुघलांच्या घोड्यांना संताजी, धनाजी दिसायचे तसे मोदींना ठाकरे, पवार दिसतात; राऊतांची टीका
11
'ती' कविता ऐकून थेट उद्धव ठाकरेंचा संकर्षण कऱ्हाडेला फोन, म्हणाले...
12
'देवरा' सिनेमात मराठमोळ्या अभिनेत्रीची वर्णी, ज्युनिअर एनटीआरच्या पत्नीची भूमिका साकारणार
13
नाशिक: राऊड घाटात एसटीचा भीषण अपघात; ६ प्रवाशांचा मृत्यू, टायर फुटून ट्रकला धडकली
14
Amit Shah : "हे लोक कन्फ्यूज, यूपी सोडून पळून गेले"; अमित शाह यांचा राहुल-प्रियंका गांधींवर जोरदार हल्लाबोल
15
Ravindra Waikar तिढा सुटला, उमेदवार ठरला! मुंबई उत्तर-पश्चिममध्ये रविंद्र वायकरच महायुतीचे उमेदवार
16
“भाजपा नेत्यांना मराठ्यांचा द्वेष, म्हणूनच PM मोदींना इतक्या सभा घ्याव्या लागतात”: मनोज जरांगे
17
‘कॉलर उडवताना सकाळ आहे की संध्याकाळ हे पाहावं लागतं’, शरद पवारांची उदयनराजेंवर बोचरी टीका 
18
१३९ दिवस शनी वक्री: ५ राशींना लॉटरी, वरदान काळ; गुंतवणुकीतून लाभ, पदोन्नती, पगारवाढ शक्य!
19
Video - बापमाणूस! घटस्फोटानंतर वडिलांनी वाजत-गाजत लेकीला आणलं आपल्या घरी
20
May Born Astro: मे महिन्यात जन्मलेले लोक म्हणजे चेहऱ्याने लोभस, डोक्याने तापट आणि लहरी स्वभावाचे मिश्रण!

जीवनात ज्ञान, आराधना, सात्त्विकता यांना महत्त्वाचे स्थान देण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2020 11:49 PM

मनुष्य जीवनात ज्ञान, आराधना, सात्त्विकता यांना महत्त्वाचे स्थान देण्याची गरज आजच्या काळात निर्माण झाली आहे. दर्शन, चरित्र, संयम, तप निर्मलता या सर्व गोष्टी पूर्वीपासूनच समाजात आहेत, परंतु त्याचा विसर सर्व समाजाला आणि मनुष्याला पडत चालला आहे. किमती मोबाइल आणि भरजरी कपडे या गोष्टींना महत्त्व आल्याने आंतरिक ज्ञानाकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे संस्कृती नष्ट होत चालली आहे, असे प्रतिपादन आचार्य रत्नसुंदर सुरीश्वरजी महाराज यांनी केले.

ठळक मुद्देआचार्य रत्नसुंदर सुरीश्वरजी महाराज : जैन साधू-संतांच्या आगमनानिमित्त मिरवणूक

नाशिक : मनुष्य जीवनात ज्ञान, आराधना, सात्त्विकता यांना महत्त्वाचे स्थान देण्याची गरज आजच्या काळात निर्माण झाली आहे. दर्शन, चरित्र, संयम, तप निर्मलता या सर्व गोष्टी पूर्वीपासूनच समाजात आहेत, परंतु त्याचा विसर सर्व समाजाला आणि मनुष्याला पडत चालला आहे. किमती मोबाइल आणि भरजरी कपडे या गोष्टींना महत्त्व आल्याने आंतरिक ज्ञानाकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे संस्कृती नष्ट होत चालली आहे, असे प्रतिपादन आचार्य रत्नसुंदर सुरीश्वरजी महाराज यांनी केले. रविवारी (दि. १२) सकाळी ९.३० वाजता पुण्यप्रकाश, राका कॉलनी, शरणपूररोड येथे ‘सफलता के सही मायने’ या विषयावर महाराज बोलत होते.दरम्यान, जैन साधू-संतांच्या आगमनानिमित्त शहरातील कॉलेजरोड येथून कॅनडा कॉर्नरमार्गे शरणपूररोडवरील राका कॉलनीपर्यंत भव्य मिरवणूक काढण्यात आली.आचार्य रत्नसुंदर सुरी यांचे ‘सफलता के सही मायने’ या विषयावर सुमारे दीड तासाचे प्रवचन झाले. यावेळी महाराज म्हणाले की, जीवनात काही पाहिजे हे बरोबर आहे, पण फळाची अपेक्षा करू नका, संसारात तुम्ही राहता पण जीवनात आनंदी ठेवणारी एकतरी गोष्ट शाश्वत आहे काय? पूर्वीच्या काळात स्वत:चे वजन होते ते आता कागदावर आले, असे सांगून महाराज म्हणाले की, आज तुम्ही सुखी आहात का? जीवनात प्राप्ती आणि त्यानंतर तृप्ती या दोन्हींपैकी कशात सुख आहे हे आपण सांगावे पवित्रता, सुख, सफलता, विजय, सिद्धी हे जीवनाचे अंग आहेत, त्यामुळे याचा उपयोग निश्चितपणे करणे गरजेचे आहे. जीवनात काय मिळविले आणि माझ्याकडून काय गेलं याचा विचारदेखील आपण केला पाहिजे. राजन पारीख यांनी स्वागत केले.यावेळी राजेंद्र शहा, विलास शहा, प्रवीण जैन, शरद शहा, महेश शहा, गौतम सुराणा, डॉ. शैलेश शहा, सुंदर शहा, सुनील शहा यांच्यासह हजारो जैन बांधव उपस्थित होते. उद्या सोमवारी (दि. १३) सकाळी ९.१५ वाजता ‘संबंधो का टॉप सिक्रेट’ विषयावर प्रवचन होणार आहे.आचार्य रत्नसुंदर सुरींच्या प्रवचनातील बोलमला दीक्षा घेण्यास ५३ वर्ष झाली असून आजही आनंदी आहे.४आपण दर रविवारी मनोरंजन करताना कधी पांजरापोळ, गोशाळा, हॉस्पिटलला भेट दिली का? एखाद्या गरिबाला उपयोगी पडण्याची इच्छा झाली काय?४ब्रॅँडेड कपडे पाहिजे म्हणतो पण आपण ब्रॅँडेड आहात का? असे महाराज यावेळी म्हणाले.मिरवणुकीचे स्वागतआचार्य रत्नसुंदर सुरीश्वरजी महाराज, आचार्य पद्मसुंदर सुरीजी महाराज आणि जैन साधू-संत यांच्या नाशिक शहरातील आगमनानिमित्त सकाळी भव्य मिरवणूक काढण्यात आली. कॉलेज रोडवरील शेखरभाई सराफ यांच्या निवासस्थानापासून मिरवणुकीला प्रारंभ झाला. मिरवणुकीत महिलांच्या डोक्यावर कलश होते. तसेच यानिमित्त रस्त्यावर आकर्षक रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. या मिरवणुकीत वाद्य पथक, नृत्य पथक, सफेद वस्त्र परिधान केलेले नागरिक सहभागी झाले होते. मिरवणूक कॅनडा कॉर्नर, शरणपूर मार्गे राका कॉलनी येथे आली.

टॅग्स :NashikनाशिकJain Templeजैन मंदीरReligious programmeधार्मिक कार्यक्रम