शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमादरम्यान झाला गोळीबार  
3
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
4
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
5
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
6
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
7
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
8
‘कोहिनूर’ची ‘बहीण’ ११७ वर्षांनी दिसणार! या बहिणीचं नाव आहे ‘दरिया-ए-नूर’ 
9
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
10
विशेष लेख: एका परिवर्तनशील, सहृदय नेतृत्वाचा अमृतमहोत्सव
11
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
12
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
13
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
14
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
15
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
16
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
17
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
18
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
19
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
20
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता

कौशल्यनिपुण बनण्याची गरज : ललिता वीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2019 01:02 IST

सध्याच्या स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांनी शैक्षणिक गुणवत्तेसोबतच कौशल्यपूर्ण शिक्षण घेण्याची गरज असल्याचे प्रतिपादन माजी शिक्षणाधिकारी ललिता वीर यांनी केले आहे. सद्यस्थितीत अभियांत्रिकीसारख्या तंत्रशिक्षण शाखेच्या विद्यार्थ्यांची वाईट अवस्था असून, शैक्षणिक गुणवत्ता असूनही केवळ प्रत्यक्ष कामाचे कौशल्य विद्यार्थ्यांकडे नसल्याने त्यांना करिअरच्या अनेक संधी गमवाव्या लागत असल्याचे त्यांनी सांगितले.

नाशिक : सध्याच्या स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांनी शैक्षणिक गुणवत्तेसोबतच कौशल्यपूर्ण शिक्षण घेण्याची गरज असल्याचे प्रतिपादन माजी शिक्षणाधिकारी ललिता वीर यांनी केले आहे. सद्यस्थितीत अभियांत्रिकीसारख्या तंत्रशिक्षण शाखेच्या विद्यार्थ्यांची वाईट अवस्था असून, शैक्षणिक गुणवत्ता असूनही केवळ प्रत्यक्ष कामाचे कौशल्य विद्यार्थ्यांकडे नसल्याने त्यांना करिअरच्या अनेक संधी गमवाव्या लागत असल्याचे त्यांनी सांगितले.द्वारका परिसरातील स्वामी समर्थ मंगल कार्यालयात मराठा समाज उत्कर्ष संस्था व मराठा समाज ‘सय’ सामाजिक व शैक्षणिक उन्नती मंडळ यांच्यातर्फे संयुक्तरीत्या मराठा समाजातील दहावी व बारावीच्या सुमारे दोनशे गुणवंत विद्यार्थ्यांचा स्मृतिचिन्ह व प्रशस्तिपत्र देऊन गुणगौरव करण्यात आला. व्यासपीठावर प्राचार्य डॉ. व्ही. बी. गायकवाड, एन. एस. शिंदे, शंकरराव टाकेकर, डॉ. अनिकेत ढोबळे, अनिकेत गाढवे उपस्थित होते. यावेळी ललिता वीर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना, शिक्षण घेतानाच संबंधित क्षेत्रात काम करण्यासाठी आवश्यक कौशल्य आत्मसात करण्याचा सल्ला दिला. यावेळी मराठा समाज उत्कर्ष संस्थेचे अध्यक्ष बापू चव्हाण, मराठा समाज ‘सय’ सामाजिक व शैक्षणिक उन्नती मंडळाचे संस्थापक अध्यक्ष विजय खैरे, अध्यक्ष यशवंत शिंदे, हिरामण वाघ, प्रभा प्रभाणे, नानासाहेब जगताप आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन व प्रास्ताविक अरुण पळसकर यांनी केले, तर अरुण मोरे यांनी आभार मानले.मोबाइलचे दुष्परिणामप्राचार्य एन. एस. शिंदे यांनी विद्यार्थ्यांनी मोबाइल आणि इंटरनेटच्या जाळ्यातून बाहेर पडण्याची गरज व्यक्त केली. मोबाइचा अमर्याद आणि अवास्तव वापर विद्यार्थ्यांकडून होत असून त्याचा उच्च शिक्षणातील गुणवत्तेवर दुष्परिणाम होत आहे. मोबाइलच्या दुष्परिणामामुळेच दहावी व बारावीचे विद्यार्थ्यांच्या तुलनेत उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता घसरताना दिसून येत असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.

टॅग्स :Studentविद्यार्थीEducationशिक्षण