शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

कौशल्यनिपुण बनण्याची गरज : ललिता वीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2019 01:02 IST

सध्याच्या स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांनी शैक्षणिक गुणवत्तेसोबतच कौशल्यपूर्ण शिक्षण घेण्याची गरज असल्याचे प्रतिपादन माजी शिक्षणाधिकारी ललिता वीर यांनी केले आहे. सद्यस्थितीत अभियांत्रिकीसारख्या तंत्रशिक्षण शाखेच्या विद्यार्थ्यांची वाईट अवस्था असून, शैक्षणिक गुणवत्ता असूनही केवळ प्रत्यक्ष कामाचे कौशल्य विद्यार्थ्यांकडे नसल्याने त्यांना करिअरच्या अनेक संधी गमवाव्या लागत असल्याचे त्यांनी सांगितले.

नाशिक : सध्याच्या स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांनी शैक्षणिक गुणवत्तेसोबतच कौशल्यपूर्ण शिक्षण घेण्याची गरज असल्याचे प्रतिपादन माजी शिक्षणाधिकारी ललिता वीर यांनी केले आहे. सद्यस्थितीत अभियांत्रिकीसारख्या तंत्रशिक्षण शाखेच्या विद्यार्थ्यांची वाईट अवस्था असून, शैक्षणिक गुणवत्ता असूनही केवळ प्रत्यक्ष कामाचे कौशल्य विद्यार्थ्यांकडे नसल्याने त्यांना करिअरच्या अनेक संधी गमवाव्या लागत असल्याचे त्यांनी सांगितले.द्वारका परिसरातील स्वामी समर्थ मंगल कार्यालयात मराठा समाज उत्कर्ष संस्था व मराठा समाज ‘सय’ सामाजिक व शैक्षणिक उन्नती मंडळ यांच्यातर्फे संयुक्तरीत्या मराठा समाजातील दहावी व बारावीच्या सुमारे दोनशे गुणवंत विद्यार्थ्यांचा स्मृतिचिन्ह व प्रशस्तिपत्र देऊन गुणगौरव करण्यात आला. व्यासपीठावर प्राचार्य डॉ. व्ही. बी. गायकवाड, एन. एस. शिंदे, शंकरराव टाकेकर, डॉ. अनिकेत ढोबळे, अनिकेत गाढवे उपस्थित होते. यावेळी ललिता वीर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना, शिक्षण घेतानाच संबंधित क्षेत्रात काम करण्यासाठी आवश्यक कौशल्य आत्मसात करण्याचा सल्ला दिला. यावेळी मराठा समाज उत्कर्ष संस्थेचे अध्यक्ष बापू चव्हाण, मराठा समाज ‘सय’ सामाजिक व शैक्षणिक उन्नती मंडळाचे संस्थापक अध्यक्ष विजय खैरे, अध्यक्ष यशवंत शिंदे, हिरामण वाघ, प्रभा प्रभाणे, नानासाहेब जगताप आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन व प्रास्ताविक अरुण पळसकर यांनी केले, तर अरुण मोरे यांनी आभार मानले.मोबाइलचे दुष्परिणामप्राचार्य एन. एस. शिंदे यांनी विद्यार्थ्यांनी मोबाइल आणि इंटरनेटच्या जाळ्यातून बाहेर पडण्याची गरज व्यक्त केली. मोबाइचा अमर्याद आणि अवास्तव वापर विद्यार्थ्यांकडून होत असून त्याचा उच्च शिक्षणातील गुणवत्तेवर दुष्परिणाम होत आहे. मोबाइलच्या दुष्परिणामामुळेच दहावी व बारावीचे विद्यार्थ्यांच्या तुलनेत उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता घसरताना दिसून येत असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.

टॅग्स :Studentविद्यार्थीEducationशिक्षण