शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

कौशल्यनिपुण बनण्याची गरज : ललिता वीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2019 01:02 IST

सध्याच्या स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांनी शैक्षणिक गुणवत्तेसोबतच कौशल्यपूर्ण शिक्षण घेण्याची गरज असल्याचे प्रतिपादन माजी शिक्षणाधिकारी ललिता वीर यांनी केले आहे. सद्यस्थितीत अभियांत्रिकीसारख्या तंत्रशिक्षण शाखेच्या विद्यार्थ्यांची वाईट अवस्था असून, शैक्षणिक गुणवत्ता असूनही केवळ प्रत्यक्ष कामाचे कौशल्य विद्यार्थ्यांकडे नसल्याने त्यांना करिअरच्या अनेक संधी गमवाव्या लागत असल्याचे त्यांनी सांगितले.

नाशिक : सध्याच्या स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांनी शैक्षणिक गुणवत्तेसोबतच कौशल्यपूर्ण शिक्षण घेण्याची गरज असल्याचे प्रतिपादन माजी शिक्षणाधिकारी ललिता वीर यांनी केले आहे. सद्यस्थितीत अभियांत्रिकीसारख्या तंत्रशिक्षण शाखेच्या विद्यार्थ्यांची वाईट अवस्था असून, शैक्षणिक गुणवत्ता असूनही केवळ प्रत्यक्ष कामाचे कौशल्य विद्यार्थ्यांकडे नसल्याने त्यांना करिअरच्या अनेक संधी गमवाव्या लागत असल्याचे त्यांनी सांगितले.द्वारका परिसरातील स्वामी समर्थ मंगल कार्यालयात मराठा समाज उत्कर्ष संस्था व मराठा समाज ‘सय’ सामाजिक व शैक्षणिक उन्नती मंडळ यांच्यातर्फे संयुक्तरीत्या मराठा समाजातील दहावी व बारावीच्या सुमारे दोनशे गुणवंत विद्यार्थ्यांचा स्मृतिचिन्ह व प्रशस्तिपत्र देऊन गुणगौरव करण्यात आला. व्यासपीठावर प्राचार्य डॉ. व्ही. बी. गायकवाड, एन. एस. शिंदे, शंकरराव टाकेकर, डॉ. अनिकेत ढोबळे, अनिकेत गाढवे उपस्थित होते. यावेळी ललिता वीर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना, शिक्षण घेतानाच संबंधित क्षेत्रात काम करण्यासाठी आवश्यक कौशल्य आत्मसात करण्याचा सल्ला दिला. यावेळी मराठा समाज उत्कर्ष संस्थेचे अध्यक्ष बापू चव्हाण, मराठा समाज ‘सय’ सामाजिक व शैक्षणिक उन्नती मंडळाचे संस्थापक अध्यक्ष विजय खैरे, अध्यक्ष यशवंत शिंदे, हिरामण वाघ, प्रभा प्रभाणे, नानासाहेब जगताप आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन व प्रास्ताविक अरुण पळसकर यांनी केले, तर अरुण मोरे यांनी आभार मानले.मोबाइलचे दुष्परिणामप्राचार्य एन. एस. शिंदे यांनी विद्यार्थ्यांनी मोबाइल आणि इंटरनेटच्या जाळ्यातून बाहेर पडण्याची गरज व्यक्त केली. मोबाइचा अमर्याद आणि अवास्तव वापर विद्यार्थ्यांकडून होत असून त्याचा उच्च शिक्षणातील गुणवत्तेवर दुष्परिणाम होत आहे. मोबाइलच्या दुष्परिणामामुळेच दहावी व बारावीचे विद्यार्थ्यांच्या तुलनेत उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता घसरताना दिसून येत असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.

टॅग्स :Studentविद्यार्थीEducationशिक्षण