शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसे-शिवसेना युतीत जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला; कोण किती जागा लढवणार? समोर आली माहिती
2
ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांची गाडी अज्ञात व्यक्तीने पेटवली; जालन्यातील घटना
3
एका महिलेचा कॉल अन् करोडपती बँकरला २३ कोटींचा गंडा; एक महिन्यासाठी केले डिजिटल अरेस्ट
4
Monsoon update: यंदाची दिवाळी पावसातच जाणार का? मान्सून भारतातून कधी परत जाणार?
5
Video - हायव्होल्टेज ड्रामा! लग्नाचं वेड, जीवाशी खेळ; गर्लफ्रेंड न भेटल्याने 'तो' टॉवरवर चढला
6
Health Tips: पाणी पिण्याची योग्य वेळ कोणती? जेवण करण्यापूर्वी, जेवण करताना की जेवणानंतर? 
7
"ऑपरेशन सिंदूरचा पार्ट २, पार्ट ३ अजून बाकी"; राजनाथ सिंहांचा पाकिस्तानला 'मेसेज', मोरक्कोमध्ये काय बोलले?
8
खेळण्यातली बंदूक वापरली अन् ३ बँकांवर डल्ला मारला! पोलिसांनी दरोडेखोराला पकडताच समोर आलं धक्कादायक सत्य
9
सणासुदीच्या काळात कार खरेदी करणे झाले स्वस्त! जीएसटीमध्ये मोठी कपात, कर्जही झाले स्वस्त
10
पाकिस्ताननं कर्जाच्या आकडेवारीत असं काय लपवलं की, अमेरिकेनं दिला अल्टिमेटम; भारताशी तर कनेक्शन नाही ना?
11
दणदणीत विजयानंतर गंभीरने पाकिस्तानला डिवचले, खेळाडूंना अशी सूचना देत जखमेवर मीठ चोळले
12
ब्रेकअपचं खोटं अन् हत्येनंतरचा बनाव...कानपूर सुटकेस 'कांड' प्रकरणात ट्विस्ट, २ आरोपींना अटक
13
Accident: पाण्याचा टँकर आणि दुचाकीत भीषण धडक; तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू
14
डोनाल्ड ट्रम्प अन् इलॉन मस्कची 'दिलजमाई' झाली? चार्ली किर्कच्या शोकसभेत दिसले एकत्र! ‘तो’ एक फोटो चर्चेत
15
VIRAL: रिक्षात बसलेल्या विदेशी तरुणाला रिक्षाचालकाने फ्रेंचमध्ये विचारला प्रश्न; त्यानंतर जे झालं ते...
16
'या' ग्राहकांना हेल्थ इन्शुरन्सवर GST माफीचा फायदा नाही; आरोग्य विम्या कंपन्यांनी केलं स्पष्ट
17
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' सिनेमात मराठी मालिकाविश्वातील 'या' अभिनेत्याची लागली वर्णी, स्वतः दिली माहिती
18
"पैसे कमावतो, टॅक्स भरतो; चोरी करत नाही...", तगड्या कमाईवरुन अक्षय कुमारचं स्पष्टीकरण
19
FD-RD विसरुन जाल, LIC ची ही स्कीम आहे जबरदस्त, मुलीच्या लग्नासाठी मिळेल २७ लाखांची रक्कम
20
फक्त गरबाच खेळा...हुल्लडबाजी नको; दांडियामध्ये साध्या वेशात महिला पोलीस सहभागी होणार

परिवर्तनाच्या लढाईत तरुणाईच्या विवेक जागृतीची गरज, श्रीकृष्ण कोकाटे यांचे प्रतिपादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2018 20:17 IST

तरुण पिढीने कोणतीही कृती करताना आपला विवेक जागृत ठेवणे आवश्यक असून सामाजिक परिवर्तनाची लढाई जिंकण्यासाठी तरुणाईचा विवेक जागा होण्याची गरज असल्याचे प्रतिपादन पोलीस उपायुक्त श्रीकृष्ण कोकाटे यांनी केले.

ठळक मुद्देकिरकोळ गुन्ह्याचे परिणाम मोठेगुन्हेगारी दूर कऱण्यासाठी विवेक जागृतीची गरजविवेक विचार सप्ताहात श्रीकृष्ण कोकाटे यांचे प्रतिपादन

नाशिक : गुन्हा कुठलाही असो त्याची सुरुवात किरकोळ कारणामुळे होत असते, परंतु त्याचे परिणाम मात्र अतिशय मोठे असतात, त्यामुळे तरुण पिढीने कोणतीही कृती करताना आपला विवेक जागृत ठेवणे आवश्यक असून सामाजिक परिवर्तनाची लढाई जिंकण्यासाठी तरुणाईचा विवेक जागा होण्याची गरज असल्याचे प्रतिपादन पोलीस उपायुक्त श्रीकृष्ण कोकाटे यांनी केले.विवेकवाहिनी व विवेक युवा विचार सप्ताह समितीतर्फे विवेक युवा विचार सप्ताहाअंतगर्त क्रांतीवीर वसतराव नारायण नाईक महाविद्यालयात व्याख्यानेमालेचे दुसरे पुष्प गुंफताना नाशिकचे पोलीस उपायुक्त श्रीकृष्ण कोकाटे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. ते म्हणाले, विद्यार्थ्यांनी प्रत्येक क्षेत्रात नेतृत्व स्वीकारावे. कोणतीही गोष्ट मिळविण्यासाठी आपल्याला शॉर्ट कट हवा असतो, यामुळे अनेकदा असा शॉर्ट कट निवडल्याने आपले नुकसान होते. त्यामुळे परीश्रम करून यश मिळविण्यासाछी प्रयत्न करतानाच विद्यार्थ्यांनी सायबर स्पेसचा वापर योग्य करणे गरजेचे आहे. स्वामी विवेकानंदांचे विचार अनुसरले तर ते जीवनात परिवर्तन घडवून आणणे शक्य असल्याचेही त्यांनी नमूद केले. युवापिढीसाठी इंटरनल सिक्युरिटी हा अतिशय महत्वाचा विषय सून तरुणानी याविषयावरही अभ्यास करणे गरजेचे आहे. भारताच्या 76 मुख्य जिल्ह्यांमध्ये नक्षलवाद वाढलेला आहे. शासन ही शोषण करणारी यंत्रणा आहे असे वातावरण तयार करून तरुणांच्या मनात ते बिंबवले जाते. त्यामुळे आपण यावर गंभीरतेने विचार करणे गरजेचे आहे असल्याचे त्यांनी सांगितले. नाशिकमध्ये मोटारसायकल चोरी आणि मालमत्तांसदर्भात गुन्हे ही अतिशय मोठी समस्या आहे. या विकृत मनोवृत्तीला समाजातून हद्दपार करण्यासाठीच तरुणाईचा विवेक जागृत करणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले. विद्यार्थ्यांनी त्यांच्या उद्दिष्टासाठी स्वतःला झोकून द्यायला हवे. सध्याच्या काळात 90% तरुणाईचा वेळ हा मोबाईलच्या चुकीच्या वापरात वाया जात आहे, तो त्यांनी नवनवीन संशोधनात्मक गोष्टींचा अभ्यास करण्यसाठी सत्कारणी लावावा असे आवाहन त्यांनी केले. यावेळी के.व्ही.एन नाईक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष कोंडाजी आव्हाड, प्राचार्य बडगुजर आदि उपस्थित होते. प्रास्ताविक सुरेश नखाते यांनी केले. सूत्रसंचालन किरण सोनवणे यांनी केले. शरद काकड यांनी आभार मानले, दरम्यान, क्रांतीवीर वसतराव नारायण नाईक महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी बनवलेल्या भित्तीपत्रकाचेही यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते स्वामी विवेकानंद आणि आजचा तरुण या विषयावर भाष्य करणाऱ्या भित्तीपत्रकाचा यावेळी अनावरण करण्यात आले.

टॅग्स :Studentविद्यार्थीNashikनाशिकcollegeमहाविद्यालय