शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

संविधानाचे तत्त्वज्ञान अंगीकारण्याची गरज :  तुकाराम मुंढे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2018 00:56 IST

न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधूता हे संविधानाचे चार तत्त्व अभ्यासण्याची गरज आहे. संविधानाचे तत्त्वज्ञान समजून घेत दैनंदिन जीवनात ते अंगिकारल्यास ‘संविधानाचा जागर’ करण्याची वेळ येणार नाही आणि संविधानाला अभिप्रेत असलेल्या राष्टनिर्मितीचे कार्य प्रत्येक भारतीयाकडून होण्यास मदत होईल, असे प्रतिपादन मंत्रालयातील नियोजन विभागाचे सहसचिव तुकाराम मुंढे यांनी केले.

नाशिक : न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधूता हे संविधानाचे चार तत्त्व अभ्यासण्याची गरज आहे. संविधानाचे तत्त्वज्ञान समजून घेत दैनंदिन जीवनात ते अंगिकारल्यास ‘संविधानाचा जागर’ करण्याची वेळ येणार नाही आणि संविधानाला अभिप्रेत असलेल्या राष्टनिर्मितीचे कार्य प्रत्येक भारतीयाकडून होण्यास मदत होईल, असे प्रतिपादन मंत्रालयातील नियोजन विभागाचे सहसचिव तुकाराम मुंढे यांनी केले.संविधान दिनाच्या पूर्वसंध्येला रविवारी (दि.२५) महाकवी कालिदास कलामंदिरात संविधान सन्मान समितीच्या वतीने आयोजित ‘जागर संविधानाचा’ या परिसंवादाच्या उद्घाटनाप्रसंगी मुंढे उद्घाटक म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त न्यायाधीश अनिल वैद्य होते.प्रमुख पाहुणे म्हणून अ‍ॅड. डॉ. गुणरत्न सदावर्ते, सामाजिक कार्यकर्ते विश्वंबर चौधरी उपस्थित होते. यावेळी मुंढे म्हणाले, संविधानाने न्याय तत्त्वांतर्गत सर्वप्रथम देशातील प्रत्येक घटकाला आर्थिक न्याय मिळवून देण्याची तरतूद केली आहे. त्यानंतर सामाजिक, राजकीय न्याय संविधानाने सांगितले आहे. कारण आर्थिक न्याय न मिळाल्यास सामाजिक-राजकीय न्यायदेखील देता येणे अवघड आहे. स्वातंत्र्य तत्त्वामध्ये प्रत्येकाला स्वातंत्र्य दिले आहे; मात्र आपल्या स्वातंत्र्यामुळे इतरांच्या स्वातंत्र्यावर गंडांतर येणार नाही किंवा त्यांच्या संविधानिक अधिकारांवर गदा येणार नाही, हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे, हे आपण विसरून चालणार नाही, असेही मुंढे यांनी यावेळी सांगितले. तसेच स्वातंत्र्य-समता या नाण्याच्या दोन बाजू आहेत. कुठल्याही प्रकारचा भेदाभेद न करता धर्मनिरपेक्ष भारतातील प्रत्येक घटकाला समान वागणूक मिळाली पाहिजे, असे संविधानाला अभिप्रेत आहे. जेथे समानता नसेल तेथे न्याय होऊ शकत नाही. या तीन तत्त्वांचे संरक्षण करत प्रत्येक बंधुता निर्माण करण्याचे प्रत्येकाचे कर्तव्य आहे, तरच राष्टÑनिर्माणाचे कार्य एक भारतीय म्हणून आपल्या हातून घडेल, असेही मुंढे म्हणाले. दरम्यान, चौधरी, सदावर्ते यांनीही संविधानाविषयी मनोगत व्यक्त केले.

टॅग्स :Nashikनाशिकtukaram mundheतुकाराम मुंढे