शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
2
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
3
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
4
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
5
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
6
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
7
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
8
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
9
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
10
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
11
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
12
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
13
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
14
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
15
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
16
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
17
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
18
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
19
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
20
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार

संविधानाचे तत्त्वज्ञान अंगीकारण्याची गरज :  तुकाराम मुंढे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2018 00:56 IST

न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधूता हे संविधानाचे चार तत्त्व अभ्यासण्याची गरज आहे. संविधानाचे तत्त्वज्ञान समजून घेत दैनंदिन जीवनात ते अंगिकारल्यास ‘संविधानाचा जागर’ करण्याची वेळ येणार नाही आणि संविधानाला अभिप्रेत असलेल्या राष्टनिर्मितीचे कार्य प्रत्येक भारतीयाकडून होण्यास मदत होईल, असे प्रतिपादन मंत्रालयातील नियोजन विभागाचे सहसचिव तुकाराम मुंढे यांनी केले.

नाशिक : न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधूता हे संविधानाचे चार तत्त्व अभ्यासण्याची गरज आहे. संविधानाचे तत्त्वज्ञान समजून घेत दैनंदिन जीवनात ते अंगिकारल्यास ‘संविधानाचा जागर’ करण्याची वेळ येणार नाही आणि संविधानाला अभिप्रेत असलेल्या राष्टनिर्मितीचे कार्य प्रत्येक भारतीयाकडून होण्यास मदत होईल, असे प्रतिपादन मंत्रालयातील नियोजन विभागाचे सहसचिव तुकाराम मुंढे यांनी केले.संविधान दिनाच्या पूर्वसंध्येला रविवारी (दि.२५) महाकवी कालिदास कलामंदिरात संविधान सन्मान समितीच्या वतीने आयोजित ‘जागर संविधानाचा’ या परिसंवादाच्या उद्घाटनाप्रसंगी मुंढे उद्घाटक म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त न्यायाधीश अनिल वैद्य होते.प्रमुख पाहुणे म्हणून अ‍ॅड. डॉ. गुणरत्न सदावर्ते, सामाजिक कार्यकर्ते विश्वंबर चौधरी उपस्थित होते. यावेळी मुंढे म्हणाले, संविधानाने न्याय तत्त्वांतर्गत सर्वप्रथम देशातील प्रत्येक घटकाला आर्थिक न्याय मिळवून देण्याची तरतूद केली आहे. त्यानंतर सामाजिक, राजकीय न्याय संविधानाने सांगितले आहे. कारण आर्थिक न्याय न मिळाल्यास सामाजिक-राजकीय न्यायदेखील देता येणे अवघड आहे. स्वातंत्र्य तत्त्वामध्ये प्रत्येकाला स्वातंत्र्य दिले आहे; मात्र आपल्या स्वातंत्र्यामुळे इतरांच्या स्वातंत्र्यावर गंडांतर येणार नाही किंवा त्यांच्या संविधानिक अधिकारांवर गदा येणार नाही, हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे, हे आपण विसरून चालणार नाही, असेही मुंढे यांनी यावेळी सांगितले. तसेच स्वातंत्र्य-समता या नाण्याच्या दोन बाजू आहेत. कुठल्याही प्रकारचा भेदाभेद न करता धर्मनिरपेक्ष भारतातील प्रत्येक घटकाला समान वागणूक मिळाली पाहिजे, असे संविधानाला अभिप्रेत आहे. जेथे समानता नसेल तेथे न्याय होऊ शकत नाही. या तीन तत्त्वांचे संरक्षण करत प्रत्येक बंधुता निर्माण करण्याचे प्रत्येकाचे कर्तव्य आहे, तरच राष्टÑनिर्माणाचे कार्य एक भारतीय म्हणून आपल्या हातून घडेल, असेही मुंढे म्हणाले. दरम्यान, चौधरी, सदावर्ते यांनीही संविधानाविषयी मनोगत व्यक्त केले.

टॅग्स :Nashikनाशिकtukaram mundheतुकाराम मुंढे