शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

आंबेडकरांचे विचार आत्मसात करण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 03, 2018 1:18 AM

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी २ मार्च १९३० रोजी ऐतिहासिक सत्याग्रह करून दलितांना काळाराम मंदिरात प्रवेश मिळवून दिला. समाजातील जातिभेद निर्मूलनासाठी त्यांनी प्रयत्न केले.

नाशिक : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी २ मार्च १९३० रोजी ऐतिहासिक सत्याग्रह करून दलितांना काळाराम मंदिरात प्रवेश मिळवून दिला. समाजातील जातिभेद निर्मूलनासाठी त्यांनी प्रयत्न केले. परंतु, सध्या काही समाजविघातक शक्ती वेगवेगळ्या जातिधर्मांत तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. या स्थितीवर मात करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आत्मसात करून त्यांनी दिलेल्या राज्यघटनेचा आदर व पालन करण्याची गरज असल्याचा सूर अभिवादन सभेत उमटला.गोदाघाटावरील गौरी पटांगणावर काळाराम मंदिर सत्याग्रह दिनानिमित्त शुक्रवारी (दि. २) नाशिक काळाराम मंदिर सत्याग्रह भूमिपुत्र समितीतर्फे आयोजित अभिवादन सभेत वेगवेगळ्या समाज व संघटनांच्या प्रतिनिधींनी सहभाग घेतला. अभिवादन सभेच्या अध्यक्षस्थानी ओबीसी जनक्रांती परिषदेचे अध्यक्ष अनिल महाजन यांच्यासह व्यासपीठावर रिपाइं गवई गटाचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉ. राजेंद्र गवई, छावा क्रांतिवीर संघटनेचे अध्यक्ष करण गायकर, माजी महापौर अशोक दिवे, राष्ट्रीय नेते तानसेन नन्नावरे, अण्णासाहेब कटारे, नाना भालेराव, गणेश उन्हवणे, आनंद सोनवणे, सचिन खरात, नगरसेवक राहुल दिवे, प्रियंका घाटे, शांताबाई हिरे आदी उपस्थित होते. प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. यावेळी वामनदादा कर्डक यांच्या विविध भीमगीतांसह बुद्धगीतांच्या माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. स्वागताध्यक्ष किशोर घाटे यांनी प्रास्ताविक, तर दीपक नन्नावरे यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी प्रकाश पगारे, मुकुंद गांगुर्डे, कै लास तेलोरे, रोषन घाटे, योगेश नन्नावरे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. काळाराम मंदिरात २ मार्च १९३० रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दलितांना प्रवेश मिळवून देण्यासाठी सुरू केलेल्या सत्याग्रहासह महाड येथील चवदार तळ्याचे पाणी दलितांना खुले करून देणाºया सत्याग्रहाचे वर्णन ‘दिले दलितांना करून खुले, काळाराम मंदिर, चवदार तळे’ यासारख्या विविध बुद्ध व भीमगीतांच्या माध्यमातून गायक संतोष जोंधळ यांनी केले. त्यांच्यासह संगीत मंडळाने सादर केलेल्या भीमगीतांवर उपस्थितांना ठेका धरायला लावला.

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkarडॉ. बाबासाहेब आंबेडकर