शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

त्र्यंबकला नळांना मीटर बसविण्यास शहर राष्ट्रवादीचा तिव्र विरोध !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2018 16:43 IST

त्र्यंबकेश्वर : येथील पालिका हद्दीतील खाजगी नळांना पाण्याचे मीटर बसविण्याचा घाट पालिकेने घातला असुन सर्वसाधारण सभेत सभासदाचा विरोध असतांना सभेची ...

ठळक मुद्देआजही शहरात 45 मिनिटांपेक्षा जास्त पाणी सोडले जात नाही.

त्र्यंबकेश्वर : येथील पालिका हद्दीतील खाजगी नळांना पाण्याचे मीटर बसविण्याचा घाट पालिकेने घातला असुन सर्वसाधारण सभेत सभासदाचा विरोध असतांना सभेची मंजुरी न घेताच निविदा देखील वर्तमान पत्रात प्रसिध्द केली आहे. या पाशर््वभूमीवर येथील शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने नगराध्यक्षांना निवेदन देउन तिव्र विरोध केला आहे. विशेष म्हणजे उदभव जलाशयांना पाणी कमी असतांनाही पालिकेने 24 तास पाणी पुरवण्याचा दावा केला आहे.यापुर्वी पालिकेने मीटर बसविलेही होते. पण तो प्रयोग अयशस्वी ठरला होता. तरीही पालिका प्रशासनाने परत मीटर बसविण्याचा घाट घालुन शहरातील हजारो कुटुंबांना लाखो रु पयांचा भुर्दंड सहन करावा लागणार असल्याने संपुर्ण गावातुन मोठ्या प्रमाणात पालिकेला असंतोषाला सामोरे जावे लागणार आहे.आज पालिकेला दिलेल्या निवेदनात राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे म्हटले आहे की, त्र्यंबक न.प. ही क वर्ग नगरपरिषद आहे. येथील 60 त्न लोक मोलमजुरी करु न राहणारे आहेत. हातावर पोट भरु न उदर निर्वाह करणारे आहेत. काही वर्षांपुर्वी बसविलेल्या मीटर्सचा अनुभव पालिकेला चांगला आला नाही. उलट हवे तेवढे पाणी न दिल्याने मीटरप्रमाणे कुणीही भाडे भरु शकले नाही. उलट त्यावेळेस पालिक तोट्यात आली.आजही शहरात 45 मिनिटांपेक्षा जास्त पाणी सोडले जात नाही. याशिवाय यावर्षी अवघा 1610 मि.मि.पाउस पडल्याने धरणातील पाण्याचा साठा कमीआहे. उन्हाळ्यात शहराला एक दिवसाआड तर कधी दोन दिवसाआड पाणी सोडावे लागते. अशा परिस्थितीत मीटर पध्दतीने गावात 24 तास पाणी पुरवठा करु , असे सांगून गावात मीटर बसविण्याची सक्ती केली जात असल्याचे निवेदनात म्हटले आहे.त्र्यंबकेश्वर तालुक्यात सरासरीपेक्षा कमी पाउस झाला आहे, ही वस्तुस्थिती आहे. त्यातच हवामान खात्याच्या अंदाजानुसार उन्हाळ्यात तापमानात वाढ होणार असुन अती उष्णतेमुळे पाण्याचे बाष्पीभवन होउन जलाशय आटल्याने कमी होणार आहेत. अशा अवस्थेत 24 तास पाणी पुरवठा कसा होउ शकेल ? असा प्रश्न निर्माण होउ शकतो. अशी सर्वच विरोधाची परिस्थिती असतांना नागरिकांना पुरेसे पाणी पुरविता येणे शक्य होणार नाही. परिणामी शासनाचे पर्यायाने जनतेचे लाखो रु पये खर्च करु न नळांना मीटर बसविण्याचा आग्रह केला जाउ नये. तरी मीटर बसउ नये. नगरसेवकांचा देखील विरोध असल्याचे समजते. मीटर बसविण्याची सक्ती केल्यास गावातुन संतापाचा उद्रेक होउन जनआंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागेल. असा इशारा शेवटी देण्यात आला आहे. या निवेदनावर राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष लक्ष्मीकांत म.काण्णव वसंत भोसले संतोष कडलग बंडोपंत मिसिर प्रविण गंगापुत्र मोहन कालेकर पुरु षोत्तम कडलग विजय व.गांगुर्डे कौस्तुभ कुलकर्णी परशुराम पाडेकर संदीप कुलकर्णी ज्ञानेश्वर गुंड राजेंद्र भोसले अरु ण वाघ राजु झोले विजय म. गांगुर्डे अनिल काळे स्विप्नल बागडे विजय मुर्तडक उमेश दाते अनिल कासट राकेश झोले अमोल परदेशी सागर चौधरी योगेश खोडे जितेंद्र झोले आदींच्या स्वाक्षरी आहेत.