शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

Chhagan Bhujbal: “राज्यात भाजपचे सरकार येईल, पण...”; छगन भुजबळांचा देवेंद्र फडणवीसांना खोचक टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2022 15:33 IST

गोव्यात मोठ्या प्रमाणात मतविभाजन झाले असून, भाजपची लाट आता कमी होताना दिसत आहे, असे छगन भुजबळ यांनी म्हटले आहे.

नाशिक: गोव्यासह देशातील पाच राज्यांसह चार राज्यांमध्ये भाजपने जोरदार मुसंडी मारत मोठे यश मिळवले आहे. यानंतर आता भाजपचा आत्मविश्वास वाढल्याचे सांगितले जात आहे. गोव्यातील विजयोत्सव साजरा करण्यासाठी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) नागपुरात दाखल झाले, तेव्हा त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी बोलताना महाराष्ट्रात पुन्हा भाजपचे सरकार आणणार असल्याचा निर्धार फडणवीस यांनी व्यक्त केला. यावर महाविकास आघाडीतील नेत्यांच्या प्रतिक्रिया येत असून, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी देवेंद्र फडणवीस यांना खोचक टोला लगावला आहे. 

नाशिकमध्ये पत्रकारांशी बोलताना छगन भुजबळ यांनी भाजपवर निशाणा साधला. तसेच राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महाविकास आघाडीचे लोक कसे निवडून येतील यासाठी प्रयत्न करू, असे छगन भुजबळ म्हणाले. विधानसभा अध्यक्षाच्या निवडीसाठी राज्यपालांना विनंतीपत्र पाठवले आहे. त्यांनी आदेश दिला की लवकरात लवकर निवड होईल. उच्च न्यायालयानंही याबाबत लवकर निर्णय घेण्याच्या सूचना दिल्या आहेत, अशी माहिती छगन भुजबळ यांनी यावेळी दिली. 

राज्यात भाजपचे सरकार येईल, पण...

महाराष्ट्रात भाजपचे सरकार येईल असे त्यांचे नेते म्हणत असतील तर ठीक आहे. पण त्यासाठी त्यांना अडीच वर्षे थांबावे लागेल. जेव्हा विधानसभेच्या निवडणुका होतील, तेव्हा कळेलच. आता तरी तशी कुठलीही परिस्थिती नाही, असे सांगत, चार राज्यांत भाजपचा विजय झालेला आहे, हे आम्हाला मान्य आहे. पण भाजपची सत्ता आली असली तरी एकट्या उत्तर प्रदेशात भाजपचे ५० हून अधिक आमदार कमी झालेत. शरद पवार यांनी सांगितल्याप्रमाणे विरोधक वेगवेगळे न लढता एकत्र लढले असते तर चित्र वेगळे दिसले असते. भाजपची लाट ही कमी होताना दिसत आहे. गोव्यात भाजपचे सगळे विरोधक वेगवेगळे लढले. तिथे मतांचे मोठ्या प्रमाणावर विभाजन झाले, त्याचा फायदा भाजपला झाला, असे छगन भुजबळ म्हणाले. 

दरम्यान, ओबीसी आरक्षण संदर्भात कमिशन नेमण्यात आले आहे. या कमिशनने कामही सुरू केले आहे. येत्या दोन महिन्यांत त्याचे काम पूर्ण करेल, अशी अपेक्षा आहे. राज्य सरकार प्रभाग रचना तयार करून निवडणूक आयोगाला देईल. त्यानंतर निवडणूक आयोगाने निवडणूक ठरवावी, असे भुजबळ यांनी नमूद केले आहे.  

टॅग्स :Chhagan Bhujbalछगन भुजबळDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMahavikas Aghadiमहाविकास आघाडीPoliticsराजकारण