शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
5
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
6
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
7
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
8
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
9
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
10
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
11
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
12
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
13
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
14
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
15
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
16
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
17
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
18
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
19
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
20
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे

Chhagan Bhujbal: “राज्यात भाजपचे सरकार येईल, पण...”; छगन भुजबळांचा देवेंद्र फडणवीसांना खोचक टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2022 15:33 IST

गोव्यात मोठ्या प्रमाणात मतविभाजन झाले असून, भाजपची लाट आता कमी होताना दिसत आहे, असे छगन भुजबळ यांनी म्हटले आहे.

नाशिक: गोव्यासह देशातील पाच राज्यांसह चार राज्यांमध्ये भाजपने जोरदार मुसंडी मारत मोठे यश मिळवले आहे. यानंतर आता भाजपचा आत्मविश्वास वाढल्याचे सांगितले जात आहे. गोव्यातील विजयोत्सव साजरा करण्यासाठी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) नागपुरात दाखल झाले, तेव्हा त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी बोलताना महाराष्ट्रात पुन्हा भाजपचे सरकार आणणार असल्याचा निर्धार फडणवीस यांनी व्यक्त केला. यावर महाविकास आघाडीतील नेत्यांच्या प्रतिक्रिया येत असून, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी देवेंद्र फडणवीस यांना खोचक टोला लगावला आहे. 

नाशिकमध्ये पत्रकारांशी बोलताना छगन भुजबळ यांनी भाजपवर निशाणा साधला. तसेच राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महाविकास आघाडीचे लोक कसे निवडून येतील यासाठी प्रयत्न करू, असे छगन भुजबळ म्हणाले. विधानसभा अध्यक्षाच्या निवडीसाठी राज्यपालांना विनंतीपत्र पाठवले आहे. त्यांनी आदेश दिला की लवकरात लवकर निवड होईल. उच्च न्यायालयानंही याबाबत लवकर निर्णय घेण्याच्या सूचना दिल्या आहेत, अशी माहिती छगन भुजबळ यांनी यावेळी दिली. 

राज्यात भाजपचे सरकार येईल, पण...

महाराष्ट्रात भाजपचे सरकार येईल असे त्यांचे नेते म्हणत असतील तर ठीक आहे. पण त्यासाठी त्यांना अडीच वर्षे थांबावे लागेल. जेव्हा विधानसभेच्या निवडणुका होतील, तेव्हा कळेलच. आता तरी तशी कुठलीही परिस्थिती नाही, असे सांगत, चार राज्यांत भाजपचा विजय झालेला आहे, हे आम्हाला मान्य आहे. पण भाजपची सत्ता आली असली तरी एकट्या उत्तर प्रदेशात भाजपचे ५० हून अधिक आमदार कमी झालेत. शरद पवार यांनी सांगितल्याप्रमाणे विरोधक वेगवेगळे न लढता एकत्र लढले असते तर चित्र वेगळे दिसले असते. भाजपची लाट ही कमी होताना दिसत आहे. गोव्यात भाजपचे सगळे विरोधक वेगवेगळे लढले. तिथे मतांचे मोठ्या प्रमाणावर विभाजन झाले, त्याचा फायदा भाजपला झाला, असे छगन भुजबळ म्हणाले. 

दरम्यान, ओबीसी आरक्षण संदर्भात कमिशन नेमण्यात आले आहे. या कमिशनने कामही सुरू केले आहे. येत्या दोन महिन्यांत त्याचे काम पूर्ण करेल, अशी अपेक्षा आहे. राज्य सरकार प्रभाग रचना तयार करून निवडणूक आयोगाला देईल. त्यानंतर निवडणूक आयोगाने निवडणूक ठरवावी, असे भुजबळ यांनी नमूद केले आहे.  

टॅग्स :Chhagan Bhujbalछगन भुजबळDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMahavikas Aghadiमहाविकास आघाडीPoliticsराजकारण