शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलची राजधानी तेलअवीव येथे कारमध्ये मोठा स्फोट, अनेक जण जखमी झाल्याची शक्यता
2
संकट अद्याप टळलेले नाही, पुढील २ दिवस पाऊस वाढण्याचा अंदाज; विदर्भ, मराठवाड्यात काय होणार?
3
लडाख हिंसाचारानंतर सोनम वांगचुक यांच्यावर मोठी कारवाई; सरकारने रद्द केला एनजीओचा परवाना
4
Suryakumar Yadav Hearing On PCB Complaint : सूर्याला फक्त वॉर्निंग की... फायनल आधी होणार फैसला!
5
कोथरूड मारहाण प्रकरणात निलेश घायवळही आरोपी; दहशत वाढवण्यासाठी दिली होती पिस्तुल
6
'शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी PM केअर फंड वापरा'; उद्धव ठाकरेंची सरकारकडे मोठी मागणी
7
कपड्यांवरून ट्रोलिंगबाबत अखेर अमृता फडणवीस यांनी सोडलं मौन, म्हणाल्या- "ज्या महिलेकडे..."
8
झुबिन गर्गच्या मृत्यू प्रकरणात नवं वळण; संगीतकार ज्योती गोस्वामीला अटक, अनेकांची चौकशी सुरु
9
Taskin Ahmed 100 Wickets : पाक विरुद्ध बांगलादेशी गोलंदाजाची कमाल! पहिल्याच षटकात साधला 'शतकी' डाव
10
“विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची मानसिकता नाही, MPSC पुढे ढकला”; कुणी केली सरकारकडे मागणी? 
11
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
12
Asia Cup 2025 Final: सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
13
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
14
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
15
VIDEO: दिसण्यावर जाऊ नका... काकांनी गायलेलं रोमँटिंक गाणं ऐका, नक्कीच त्यांचे 'फॅन' व्हाल
16
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक
17
Pranjal Khewalkar: रोहिणी खडसेंचे पती प्रांजल खेवलकर यांना पुणे न्यायालयाकडून जामीन मंजूर
18
कोण आहे Jolly LLB 2 मधील इक्बाल कादरी? पाकिस्तानी समजून नाकारले गेले चित्रपट, ओळख पटवण्यासाठी मागितला व्हिसा
19
“सरसकट भरपाई हाच योग्य मार्ग, एकरी ₹५० हजार इतकी थेट मदत तातडीने मिळाली पाहिजे”: जयंत पाटील
20
पैसे देता म्हणजे उपकार करता का? अजित पवारांच्या विधानावरुन उद्धव ठाकरे संतापले

स्थापनेपासून राष्टवादीचे अस्तित्व टिकून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2019 01:26 IST

विदेशी नागरिकत्व व पंतप्रधान पदाच्या मुद्द्यावरून काँग्रेसमधून १९९९ मध्ये बाहेर पडलेल्या राष्टवादी काँग्रेसने गेल्या वीस वर्षांत जिल्ह्यातील आपले अस्तित्व कायम ठेवले आहे. राष्टवादीच्या स्थापनेमुळे जिल्ह्यातील कॉँग्रेसला घरघर लागली. अवघ्या काही काळातच राष्टवादीने स्थानिक स्वराज्य संस्थांवर कब्जा केला तर याच काळात राष्टवादीने राज्याच्या सत्तेला दिलेली धडक व राज्याच्या मंत्रिमंडळात जिल्ह्याला स्थान मिळाले.

नाशिक : विदेशी नागरिकत्व व पंतप्रधान पदाच्या मुद्द्यावरून काँग्रेसमधून १९९९ मध्ये बाहेर पडलेल्या राष्टवादी काँग्रेसने गेल्या वीस वर्षांत जिल्ह्यातील आपले अस्तित्व कायम ठेवले आहे. राष्टवादीच्या स्थापनेमुळे जिल्ह्यातील कॉँग्रेसला घरघर लागली. अवघ्या काही काळातच राष्टवादीने स्थानिक स्वराज्य संस्थांवर कब्जा केला तर याच काळात राष्टवादीने राज्याच्या सत्तेला दिलेली धडक व राज्याच्या मंत्रिमंडळात जिल्ह्याला स्थान मिळाले.नाशिक जिल्हा अनेक वर्षे कॉँग्रेसचा बालेकिल्ला राहिला असताना १९९९ मध्ये राष्ट्रवादीच्या स्थापनेमुळे या पक्षाची मोठ्या प्रमाणात पडझड झाली. शरद पवार यांनी कॉँग्रेसमधून बाहेर पडताच, त्यांच्यासोबत कोण कोण नेते येतात व कोणत्या जिल्ह्यातून समर्थन मिळते याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून होते. पवार यांचा निर्णय जाहीर होताच, सर्व प्रथम नाशिकमध्ये पवार समर्थकांची बैठक झाली व त्यात शरद पवार यांच्यापाठीशी उभे राहण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यात सर्वच कॉँग्रेसजन होते.प्रत्यक्ष राष्टवादीची स्थापना झाल्यानंतर अन्य पक्षातील नेते, कार्यकर्त्यांनी पक्षात प्रवेश केला. नाशिकच्या रूपाने छगन भुजबळ हे पहिले प्रदेशाध्यक्ष झाले. भुजबळ यांचे आजोळ नाशिक असल्यामुळे त्यांनीही जिल्ह्यात पक्षाच्या वाढीला प्राधान्य दिले.पक्षाची स्थापना झाल्या झाल्या विधानसभा निवडणुकीला सामोरे जावे लागल्याने नाशिक मतदारसंघात राष्टवादीने स्व. डॉ. वसंत पवार यांना उमेदवारी दिली. तिरंगी लढतीत त्यांचा पराभव झाला असला तरी, राष्टवादीने दुसऱ्या क्रमांकाची मते घेतली. ग्रामीण भागात मात्र राष्टÑवादीला पहिल्याच दणक्यात चार जागांवर विजय मिळाला. दोन्ही कॉँग्रेसने एकत्र येत राज्यात सत्ता स्थापन केली.सत्तेत राष्टवादी सहभागी झाल्याने त्याचा फायदा पक्ष वाढीस झाला. सन २००४ मध्ये छगन भुजबळ यांनी विधानसभा निवडणुकीसाठी थेट येवला मतदारसंघाची निवड केली. त्यांच्या माध्यमातून उपमुख्यमंत्रिपद तसेच दहा वर्षे मंत्रिपद कायम राहिले.मोदी लाटेतही चार जागाजिल्ह्यातील निफाड, दिंडोरी, बागलाण, नांदगाव, येवला, कळवण या आदिवासी मतदारसंघांमध्ये स्व. ए. टी. पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्टवादीने मुसंडी मारली. अवघ्या दहा वर्षांत पक्षाचे स्वमालकीचे अद्ययावत कार्यालयही नाशकात उभे राहिले. लोकसभा, विधानसभा, विधान परिषद, साखर कारखाने, सहकारी बॅँका, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मोठा शिरकाव झाला. सन २०१४ मध्ये देशात मोदी लाट असतानाही राष्टÑवादीने विधानसभा निवडणुकीत चार जागांवर विजय कायम ठेवून ही लाट रोखण्यात हातभार लावला, तर नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत दोन्ही मतदारसंघांत दुसºया क्रमांकाची मते घेत आपले अस्तित्व कायम ठेवले.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019NCPराष्ट्रवादी काँग्रेसSharad Pawarशरद पवार