शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
2
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
3
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
4
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
5
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
6
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
7
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
8
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
9
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
10
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
11
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
12
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
13
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
14
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
15
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
16
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...
17
“पूरग्रस्तांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी सर्वस्व पणाला लावू”; अजित पवारांचा VCद्वारे संवाद
18
नवरात्रात सोनं खरेदी करणं झालं अवघड! सर्वकालीन उच्चांकी पातळीच्या अगदी जवळ जाऊन पोहोचलं; चेक करा 'लेटेस्ट रेट'
19
“PM केअर फंडात महाराष्ट्राचाही पैसा, ५० हजार कोटींची मदत जाहीर करावी”; उद्धव ठाकरेंची मागणी
20
“संकट आले तेव्हा आम्ही पंचांग काढून बसलो नाही, सरकारने सरसकट कर्जमाफी द्यावी”: उद्धव ठाकरे

राष्टवादी काँग्रेसच्या वतीने  दोन तास ठिय्या आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2018 00:14 IST

तालुक्यातील वीज, पाणी व रस्त्यांसह इतर कामांची सोडवणूक व्हावी या मागणीसाठी राष्टवादी काँग्रेसच्या वतीने मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या पायरीवर दोन तास ठिय्या आंदोलन करण्यात आले.

कळवण : तालुक्यातील वीज, पाणी व रस्त्यांसह इतर कामांची सोडवणूक व्हावी या मागणीसाठी राष्टवादी काँग्रेसच्या वतीने मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या पायरीवर दोन तास ठिय्या आंदोलन करण्यात आले. तालुक्यातील वीज वितरण व्यवस्था ढासळली असून, वीज पुरवठा सुरळीत करा, कनाशी-हतगड रस्त्यासह रस्त्यांचे सर्वेक्षण करून दुरुस्ती करा, सुळे उजवा व डाव्या कालव्याला व चणकापूर उजव्या कालव्याला पाणी सोडावे या प्रमुख मागण्यांसाठी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष जयश्री पवार, ज्येष्ठ नेते रवींद्र देवरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजेंद्र भामरे, पंचायत समिती सभापती आशा पवार, उपसभापती विजय शिरसाठ यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. त्यानंतर तहसीलदार कैलास चावडे यांना निवेदन देण्यात आले. प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिल्यानंतर तहसीलदार कैलास चावडे यांना निवेदन देऊन दोन तासानंतर ठिय्या आंदोलन मागे घेण्यात आले. कळवण तालुक्यातील विजेचा खेळखंडोबा व निर्माण झालेल्या समस्यांसंदर्भात मुख्य अभियंता कुमठेकर यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन प्रश्न सोडविण्याचे आश्वासन कार्यकारी अभियंता टेंभुर्णे यांनी दिले तर सुळे उजव्या व डाव्या कालव्याला तसेच चणकापूर उजव्या कालव्याला पाणी सोडण्याबाबत जिल्हाधिकारी यांच्याकडे प्रस्ताव सादर करून आदेशान्वये पाणी सोडण्याचे आश्वासन अभियंता मुसळे व चौधरी यांनी दिले. कनाशी ते हतगड रस्त्यासंदर्भात शासनस्तरावर प्रस्ताव सादर करण्यात आला असून, तालुक्यातील रस्ते दुरुस्तीबाबत प्रस्ताव पाठविण्याचे आश्वासन सहाय्यक अभियंता आदित्य भोसले यांनी दिल्यानंतर आंदोलकन मागे घेण्यात आले. पाणी असून विजेअभावी शेतपिकांना पाणी देता येत नाही. वीज ग्राहक वीजबिल भरणा नियमित करीत असूनसुद्धा वीज नियोजित वेळेनुसार नियमित मिळत नाही. अवघे दोन तासपण अनियमित वीजपुरवठा मिळतो. कमी दाबाच्या वीजपुरवठ्यामुळे नुकसान होत आहे. मुख्य अभियंता कुमठेकर यांच्याकडे बैठकीत प्रश्न मार्गी लागले नाहीतर तर आंदोलन करावे लागेल.  - जयश्री पवार, माजी अध्यक्ष, जिल्हा परिषदशेतीला लागणारे पाणी हे विजेवर अवलंबून आहे. त्यामुळे वीजपुरवठा वेळेवर मिळत नसल्याने सातत्याने होणारे भारनियमन व विजेच्या खेळखंडोबामुळे शेतपिकांचे नुकसान होत असल्याने शेती व्यवसाय उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. वीज ठरवून दिलेल्या निर्धारित वेळेत न मिळता केव्हाही येते आणि केव्हाही जाते.  - रमेश पवार, सरपंच, दळवट

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसNashikनाशिक