राष्ट्रीय हातमाग दिन साजरा
By Admin | Updated: August 8, 2015 23:01 IST2015-08-08T23:00:11+5:302015-08-08T23:01:16+5:30
समस्या सोडविणार : विविध मान्यवरांचा सत्कार

राष्ट्रीय हातमाग दिन साजरा
राष्ट्रीय हातमाग दिन साजरा
येवला : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते चेन्नई येथे राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त विणकरांचा सत्कार करून राष्ट्रीय हातमाग दिन संपन्न होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्याचा ‘राष्ट्रीय हातमाग दिन’ पैठणी उत्पादन क्षेत्र व राज्यातील सर्वाधिक हातमाग असणाऱ्या येवला शहरात पृथ्वी लॉनवर संपन्न झाला.
केंद्र सरकारने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेनुसार ७ आॅगस्ट हा दिवस राष्ट्रीय हातमाग दिन’ घोषित करण्यात आला आहे. प्रत्येक राज्याचा स्वतंत्र कार्यक्र म सकाळी ११ वाजता देशात एकाचवेळी संपन्न करण्याचे नियोजन होते.
महाराष्ट्र शासनाच्या वस्त्रोद्योग विभागाच्या संचालक रिया बागला यांच्या अध्यक्षतेखाली व बुनकर सेवा केंद्राचे उपसंचालक आर.एम. परमार यांच्या उपस्थितीत येथील कार्यक्र मात संत कबीर पुरस्कारप्राप्त शांतीलाल भांडगे, राष्ट्रपती पारितोषिकविजेते महेश भांडगे, मनोज दिवटे, पंकज पहिलवान, अहेमद खत्री, राजू परदेशी, महाराष्ट्र हातमाग कापड स्पर्धेतील प्रथम पुरस्कारविजेते सुरेश पहिलवान यांचा यावेळी यथोचित सत्कार करण्यात आला.
आपल्या अध्यक्षीय भाषणात श्रीमती रिया बागला यांनी ७००पेक्षा जास्त विणकर ओळखपत्र वाटप केल्याचे सांगितले. आगामी काळात येवल्यावर अधिक लक्ष देऊन शासन स्तरावर पाठपुरावा करून विणकरांच्या समस्या सोडविल्या जातील, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.
बुनकर सेवा केंद्राचे सहायक संचालक एस.एस. खंदारे केंद्रीय रेशीम बोर्डाचे व्ही. रमेश, टेक्सटाइल कमेटी, मुंबईचे किशोर कौशक, संत कबीर पुरस्कारार्थी शांतीलाल भांडगे यांनी यावेळी आपापल्या विभागांचे कार्य कसे चालते, याविषयी मार्गदर्शन केले.
विणकरांच्या वतीने महाटेक्सचे संचालक मनोज दिवटे यांनी शेतकऱ्यांप्रमाणे चार टक्के व्याजदराने कर्जपुरवठा करण्याची मागणी
केली तसेच भारनियमन होत
असल्याने हातमागावरील उत्पादनावर परिणाम होतो विणकर मेटाकुटीला येतो, यावर उपाय म्हणून केंद्र व
राज्य सरकारने प्रमाणित हातमाग योजनेप्रमाणे ‘सोलर युनिट’ची
योजना सुरू करावी व विणकर बांधवांनी आपल्या उत्पादित मालाला सिल्क मार्क, हॅण्डलूम मार्क,
असे लोगो लावण्याचे आवाहन केले. पैठणी क्लस्टरचे प्रमुख विक्रम गायकवाड, कारागीर रमेश भावसार यांनी विणकरांच्या समस्यांचे कथन केले.
कार्यक्रमास सहायक निबंधक जितेंद्र शेळके, महाराष्ट्र बँकेचे व्यवस्थापक सोमासे, येवल्याचे नगराध्यक्ष प्रदीप सोनवणे, राजू नागपुरे, सागर पहिलवान, आप्पा अनभुले, ललित भांडगे, गणेश खळेकर, बाबुलाल आढाव, संजय कडतन, गणेश फासे, भाऊ वडे, विनोद बाकळे, प्रवीण पहिलवान, प्रमोद आवणकर, जितेंद्र पहिलवान, श्याम नाकोड, प्रदीप वाखारे, लालचंद आवणकर आदि उपस्थित होते. (वार्ताहर)