शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

नाशिककर अडकले वाहनांच्या गराड्यात !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2018 01:04 IST

अशोकस्तंभ ते त्र्यंबक नाका यादरम्यान स्मार्ट रस्त्याचे काम सुरू झाल्याने एकेरी मार्गाचा फटका नाशिककरांना बसत आहे. एकेरी मार्गाचे नियोजन फसल्याने या वाहतुकीचा ताण गोळे कॉलनीमधील अंतर्गत रस्ते, वकीलवाडी, रविवार कारंजा, घनकर गल्ली, पोलीस आयुक्तालय मार्ग, घारपुरे घाट रस्ता, टिळकवाडी सिग्नल, कॅनडा कॉर्नर, शालिमार चौक, जीपीओरोड, द्वारका, भाभानगर या भागातील रस्त्यांवर आला होता. वरील ठिकाणी वाहतूक कोंडी निर्माण होऊन नागरिकांना तासन् तास वाहनांच्या गराड्यात प्रतीक्षा करावी लागली.

नाशिक : अशोकस्तंभ ते त्र्यंबक नाका यादरम्यान स्मार्ट रस्त्याचे काम सुरू झाल्याने एकेरी मार्गाचा फटका नाशिककरांना बसत आहे. एकेरी मार्गाचे नियोजन फसल्याने या वाहतुकीचा ताण गोळे कॉलनीमधील अंतर्गत रस्ते, वकीलवाडी, रविवार कारंजा, घनकर गल्ली, पोलीस आयुक्तालय मार्ग, घारपुरे घाट रस्ता, टिळकवाडी सिग्नल, कॅनडा कॉर्नर, शालिमार चौक, जीपीओरोड, द्वारका, भाभानगर या भागातील रस्त्यांवर आला होता. वरील ठिकाणी वाहतूक कोंडी निर्माण होऊन नागरिकांना तासन् तास वाहनांच्या गराड्यात प्रतीक्षा करावी लागली. भर उन्हात वाहतूक कोंडीत अडकल्यामुळे नागरिकांनी प्रशासनाच्या गलथान काराभाराविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली.कान्हेरेवाडीचा मार्ग बंद करावा लागेलआदर्श संस्थेची विद्यार्थी संख्या मोठी असल्यामुळे विद्यार्थ्यांची ने-आण करणाऱ्या सुमारे दोनशे वाहनांना उभे राहण्यासाठी जागा उपलब्ध होणे कठीण झाले आहे. त्यामुळे संस्थाचालकांनी कान्हेरेवाडीमधील रस्त्यावर परवानगी पोलिसांकडे मागितली आहे. मात्र अद्याप त्या मागणीबाबत विचार झालेला नाही. कान्हेरेवाडीपर्यंत विद्यार्थ्यांना पायपीट करत यावे लागणार आहे; मात्र त्यास नाईलाज असून, पोलिसांनी किमान कान्हेरेवाडीमध्ये तरी वाहने उभी करण्यास परवानगी द्यावी व भालेकर मैदानाकडून कान्हेरेवाडीतून येणारी वाहतूक शाळा सुटण्याच्या व भरण्याच्या वेळेस थांबवावी, अशी मागणी शाळेचे संचालक, शिक्षक व पालकांनी केली आहे.‘त्या’ व्यक्तींवर पोलिसांची मेहेरनजरएकेरी वाहतुकीमुळे रविवार कारंजा चौकावर ताण निर्माण झालेला असताना शहर वाहतूक पोलिसांकडून नियोजनही ‘स्मार्ट’ पध्दतीने होणे गरजेचे होते. मात्र दुर्दैवाने तसे होऊ शकले नाही, परिणामी वाहतूक व्यवस्थेचा फज्जा उडाल्याचे चित्र शहरात सोमवारी प्रमुख रस्त्यांवर तसेच चौकाचौकात दिसले. रविवार कारंजावर एका बॅँकेच्या निवडणुकीनिमित्त राजकीय पुढारी, लोकप्रतिनिधींसह ‘बड्या’ व्यक्तींची गर्दी जमली होती. यावेळी त्यांची वाहने सर्रासपणे बेशिस्तपद्धतीने उभी करण्यात आल्याने वाहतूक कोंडीत भर पडली; मात्र पोलिसांनी त्यांच्यावर मेहेरनजर दाखविणे पसंत केले. एरवी ‘पिवळ्या पट्ट्या’चा नियम पाळत सर्वसामान्यांची वाहने उचलून नेण्याची कारवाई करणाºया पोलिसांनी यावेळी काणाडोळा केला. त्यामुळे नागरिकांनी पोलिसांच्या काराभाराविषयी व स्वत:ला लोकप्रतिनिधी म्हणून घेणाºयांविषयी तीव्र संताप व्यक्त केला.शालेय  विद्यार्थ्यांसह पालकांची कसरतएकेरी वाहतुकीच्या निर्णयामुळे सीबीएस परिसरातील शाळांमधील विद्यार्थ्यांचे अतोनात हाल झाले. पालकांना विद्यार्थ्यांना शाळेत ने-आण करताना कसरत करावी लागली. कान्हेरेवाडी कॉर्नरवर पालकांसह शालेय वाहतूक करणाºया वाहनचालकांनी वाहने उभी करून विद्यार्थ्यांची चढ-उतार केली. यावेळी पायपीट करत बॅरिकेड टाकून बंद करण्यात आलेल्या रस्त्यामधील अडथळ्यांची शर्यत पार करत विद्यार्थ्यांनी शाळेचा उंबरा गाठला. त्यामुळे पालकांनी नाराजी व्यक्त केली.

टॅग्स :NashikनाशिकTrafficवाहतूक कोंडीtraffic policeवाहतूक पोलीस