शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

नाशिककर अडकले वाहनांच्या गराड्यात !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2018 01:04 IST

अशोकस्तंभ ते त्र्यंबक नाका यादरम्यान स्मार्ट रस्त्याचे काम सुरू झाल्याने एकेरी मार्गाचा फटका नाशिककरांना बसत आहे. एकेरी मार्गाचे नियोजन फसल्याने या वाहतुकीचा ताण गोळे कॉलनीमधील अंतर्गत रस्ते, वकीलवाडी, रविवार कारंजा, घनकर गल्ली, पोलीस आयुक्तालय मार्ग, घारपुरे घाट रस्ता, टिळकवाडी सिग्नल, कॅनडा कॉर्नर, शालिमार चौक, जीपीओरोड, द्वारका, भाभानगर या भागातील रस्त्यांवर आला होता. वरील ठिकाणी वाहतूक कोंडी निर्माण होऊन नागरिकांना तासन् तास वाहनांच्या गराड्यात प्रतीक्षा करावी लागली.

नाशिक : अशोकस्तंभ ते त्र्यंबक नाका यादरम्यान स्मार्ट रस्त्याचे काम सुरू झाल्याने एकेरी मार्गाचा फटका नाशिककरांना बसत आहे. एकेरी मार्गाचे नियोजन फसल्याने या वाहतुकीचा ताण गोळे कॉलनीमधील अंतर्गत रस्ते, वकीलवाडी, रविवार कारंजा, घनकर गल्ली, पोलीस आयुक्तालय मार्ग, घारपुरे घाट रस्ता, टिळकवाडी सिग्नल, कॅनडा कॉर्नर, शालिमार चौक, जीपीओरोड, द्वारका, भाभानगर या भागातील रस्त्यांवर आला होता. वरील ठिकाणी वाहतूक कोंडी निर्माण होऊन नागरिकांना तासन् तास वाहनांच्या गराड्यात प्रतीक्षा करावी लागली. भर उन्हात वाहतूक कोंडीत अडकल्यामुळे नागरिकांनी प्रशासनाच्या गलथान काराभाराविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली.कान्हेरेवाडीचा मार्ग बंद करावा लागेलआदर्श संस्थेची विद्यार्थी संख्या मोठी असल्यामुळे विद्यार्थ्यांची ने-आण करणाऱ्या सुमारे दोनशे वाहनांना उभे राहण्यासाठी जागा उपलब्ध होणे कठीण झाले आहे. त्यामुळे संस्थाचालकांनी कान्हेरेवाडीमधील रस्त्यावर परवानगी पोलिसांकडे मागितली आहे. मात्र अद्याप त्या मागणीबाबत विचार झालेला नाही. कान्हेरेवाडीपर्यंत विद्यार्थ्यांना पायपीट करत यावे लागणार आहे; मात्र त्यास नाईलाज असून, पोलिसांनी किमान कान्हेरेवाडीमध्ये तरी वाहने उभी करण्यास परवानगी द्यावी व भालेकर मैदानाकडून कान्हेरेवाडीतून येणारी वाहतूक शाळा सुटण्याच्या व भरण्याच्या वेळेस थांबवावी, अशी मागणी शाळेचे संचालक, शिक्षक व पालकांनी केली आहे.‘त्या’ व्यक्तींवर पोलिसांची मेहेरनजरएकेरी वाहतुकीमुळे रविवार कारंजा चौकावर ताण निर्माण झालेला असताना शहर वाहतूक पोलिसांकडून नियोजनही ‘स्मार्ट’ पध्दतीने होणे गरजेचे होते. मात्र दुर्दैवाने तसे होऊ शकले नाही, परिणामी वाहतूक व्यवस्थेचा फज्जा उडाल्याचे चित्र शहरात सोमवारी प्रमुख रस्त्यांवर तसेच चौकाचौकात दिसले. रविवार कारंजावर एका बॅँकेच्या निवडणुकीनिमित्त राजकीय पुढारी, लोकप्रतिनिधींसह ‘बड्या’ व्यक्तींची गर्दी जमली होती. यावेळी त्यांची वाहने सर्रासपणे बेशिस्तपद्धतीने उभी करण्यात आल्याने वाहतूक कोंडीत भर पडली; मात्र पोलिसांनी त्यांच्यावर मेहेरनजर दाखविणे पसंत केले. एरवी ‘पिवळ्या पट्ट्या’चा नियम पाळत सर्वसामान्यांची वाहने उचलून नेण्याची कारवाई करणाºया पोलिसांनी यावेळी काणाडोळा केला. त्यामुळे नागरिकांनी पोलिसांच्या काराभाराविषयी व स्वत:ला लोकप्रतिनिधी म्हणून घेणाºयांविषयी तीव्र संताप व्यक्त केला.शालेय  विद्यार्थ्यांसह पालकांची कसरतएकेरी वाहतुकीच्या निर्णयामुळे सीबीएस परिसरातील शाळांमधील विद्यार्थ्यांचे अतोनात हाल झाले. पालकांना विद्यार्थ्यांना शाळेत ने-आण करताना कसरत करावी लागली. कान्हेरेवाडी कॉर्नरवर पालकांसह शालेय वाहतूक करणाºया वाहनचालकांनी वाहने उभी करून विद्यार्थ्यांची चढ-उतार केली. यावेळी पायपीट करत बॅरिकेड टाकून बंद करण्यात आलेल्या रस्त्यामधील अडथळ्यांची शर्यत पार करत विद्यार्थ्यांनी शाळेचा उंबरा गाठला. त्यामुळे पालकांनी नाराजी व्यक्त केली.

टॅग्स :NashikनाशिकTrafficवाहतूक कोंडीtraffic policeवाहतूक पोलीस