शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
2
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
3
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
4
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
5
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
6
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
7
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
8
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
9
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: ओशिवरामध्ये बोगस मतदान झाल्याची मनसे नेत्याची तक्रार
10
बुलढाणा: आग लागल्याने घरातील साहित्य जळून खाक, संपूर्ण कुटुंब बेघर
11
"मुंबईकर मतदानाला उतरलाय, पण काही ठिकाणी मुद्दाम उशीर केला जातोय"; आदित्य ठाकरेंचा आरोप
12
बॉलिवूडच्या बादशाहाने केलं मतदान, पत्नी आणि मुलांसह केंद्रावर पोहोचला अन्...
13
सामूहिक बलात्कारानंतर अल्पवयीन मुलीला जिवंत वीट भट्टीत जाळले; नराधमांना फाशीची शिक्षा
14
Chhattisgarh Accident: छत्तीसगडमध्ये मृत्यूचे तांडव; मजुरांच्या वाहनाचा भीषण अपघात; १७ जण दगावले
15
"आशिष शेलार यांनी लोकसभा निवडणुकीतून काढला पळ’’, मुंबईतील मतदानादरम्यान ठाकरे गटाचा टोला 
16
'शिंदेंसोबत जायला मी विरोध केला होता'; गजानन किर्तीकरांच्या पत्नीने मांडली रोखठोक भूमिका
17
...अन् अचानक तरुण झाला कोट्यधीश; खात्यात आले 9900 कोटी, बँक मॅनेजरही हैराण
18
"ही अत्यंत खेदाची गोष्ट आहे...", अभिनेत्री वैशाली भोसलेला मतदान करता न आल्यामुळे व्यक्त केला संताप
19
अहमदाबाद विमानतळावर मोठी कारवाई, इस्लामिक स्टेटचे ४ दहशतवादी पकडले, श्रीलंकेचे कनेक्शन उघड
20
Maharashtra HSC 12th Result 2024 राज्यभरातील विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी: उद्या १२ वीचा निकाल जाहीर होणार

शिक्षण व्यवस्थेतील प्रश्नांची ‘वारी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 08, 2019 5:44 PM

  ऐन परीक्षेच्या कालावधीत कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांनी असहकार पुकारला आहे. गेल्यावर्षीही असाच बहिष्कार उत्तरपत्रिका तपासणीवर टाकण्यात आला होता. शिक्षकांना ...

  ऐन परीक्षेच्या कालावधीत कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांनी असहकार पुकारला आहे. गेल्यावर्षीही असाच बहिष्कार उत्तरपत्रिका तपासणीवर टाकण्यात आला होता. शिक्षकांना ऐन परीक्षेच्या कालावधीत असा कठोर निर्णय घ्यावा लागत असेल तर मंत्रिमहोदयांना याचा शोध शिक्षण विभागातच घ्यावा लागणार आहे. प्रश्न केवळ कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचा नाही तर शिक्षकांचे प्रश्न घेऊन प्राथमिक, माध्यमिक, महाविद्यालयीन, तसेच अगदी सेवानिवृत्त शिक्षकही रांगेत आहेत. शिक्षण विभागातून निर्णय जाहीर झाल्यानंतरही अंमलबजावणीचे अधिकार असलेल्या अधिकाऱ्यांकडून तत्परता दाखविली जाणार नसेल तर मग शिक्षकांच्या प्रश्नांची वारी अशीच सुरू राहील.मंत्र्यांच्या प्रगती पुस्तकात शिक्षणमंत्र्यांच्या कामकाजाला ‘अ’ श्रेणी मिळाल्याने या विभागाच्या कामकाजात आमूलाग्र बदल झाला असा त्याचा अर्थ काढणे घाईचे ठरेल. काही निर्णय खरोखरीच व्यवस्थेला दिशा देणारे ठरले आहेत तर काही नावीन्यपूर्ण संकल्पनाही सर्वसमावेशक असल्याने त्यांचेही स्वागत झाले. नवीन संकल्पना रुजविणे आणि ती खाली झिरपेपर्यंतचा काही कालावधी नक्कीच जाऊ द्यावा लागेल. परंतु वर्षानुवर्षाच्या परिपाठातील कामकाजालाही दिरंगाई होणार असेल तर मग शिक्षकांनी फक्त पाठपुरावा करीच रहावे का? असाही प्रश्न निर्माण होतो.संच मान्यता दुरुस्तीचा गोंधळ अजूनही संपलेला नाही. इतकेच कशाला तर सन १९१८/१९ च्या मान्यतादेखील अद्याप आलेल्या नाहीत. अतिरिक्त ठरलेले शिक्षक आणि रिक्त जागांबाबतचे स्पष्ट धोरण जाहीर होताना दिसत नाही. दुसरीकडे पवित्र पोर्टलचा घोळ तरी अद्याप कुठे निस्तरलाय. गेल्या तीन वर्षांपासून मुलांना शिष्यवृत्ती मिळालेली नाही. शालार्थ आयडीच्या घोळाकडे लक्ष द्यायला कुणाला वेळ आहे असे वाटत नाही. आॅनलाइन पगाराची व्यवस्था तर केव्हाच कोलमडून पडली आहे. प्रश्न अजूनही आहेत. ती सोडविण्यासाठी अधिकाऱ्यांची मानसिकता बदलणे अपेक्षित आहे. त्यांनी कामाचा निपटारा करून स्थानिक पातळीवरील प्रश्न सोडविणे अपेक्षित आहे. स्थानिक पातळीवरील शाळांचे वार्षिक नियोजन जेथे होऊ शकलेले नाही तेथे त्यांच्याकडून अपेक्षा काय करणार.जळगावातील कॉपी प्रकरणाने तर कॉपीमुक्त अभियानाची धिंड निघाली असतांना याप्रकरणी मात्र कोणीही बोलायला तयार नाही. आयटीआय परीक्षेतील गुणदानपद्धतीचा गोंधळ आणि विधी शाखेच्या परीक्षेतील चुकीच्या प्रश्नपत्रिका. वैद्यकीय जागांबाबतचे गोंधळलेले धोरण आणि विद्यार्थ्यांचे बायोमेट्रिक या साऱ्यांचा नुसता गोंधळ उडालाय. कुठेच सुसूत्रता लागत नाही. अधिवेशनापासून ते परीक्षेच्या कालावधीपर्यंत आंदोलनाची भूमिका घेण्याचा शिक्षकांचा सिलसिला सुरूच आहे. आंदोलनाच्या वाºया या वर्षीही चुकलेल्या नाहीत. चुका शिक्षण व्यवस्थेत आहेत, अधिकाºयांना निर्णयाचा अधिकार हवाय.

टॅग्स :Nashikनाशिकnashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषद