शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकच्या ‘मविप्र’ची पवार व्याख्यानमाला : वाढत्या लोकसंख्येमुळे पाणीसाठा आटतोय - होलानी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2018 22:36 IST

मविप्रच्या वतीने तीन दिवसीय डॉ. वसंतराव पवार व्याख्यानमालेचे आयोजन रावसाहेब थोरात सभागृहात करण्यात आले. या व्याख्यानमालेचे पहिले पुष्प होलानी यांनी ‘पाणी एक लढा’ या विषयावर गुंफले.

ठळक मुद्दे२०१४ साली केवळ एक हजार १४५ क्युबिक लिटर प्रतिव्यक्ती इतके पाणी १९६२ साली भारतामध्ये तीन हजार क्युबिक लिटर प्रतिव्यक्ती पाणी उपलब्ध होते

नाशिक : पाणीप्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला असून, आशिया-आफ्रिका खंडामधील देशांपुढे भविष्यात पाण्याची मोठी समस्या निर्माण होणार आहे. कारण वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत मानवी उपयोगासाठी लागणारी पाण्याची उपलब्धता अत्यंत कमी असून, लोकसंख्येच्या वाढत्या भस्मासुरामुळे पाणीसाठा संपुष्टात येऊ लागला आहे. त्यासाठी योग्य व्यवस्थापन करणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन राज्य जीवन प्राधिकरणाचे माजी सचिव सदस्य व पाणी विषयाचे अभ्यासक राजेंद्र होलानी यांनी केले.मविप्रच्या वतीने तीन दिवसीय डॉ. वसंतराव पवार व्याख्यानमालेचे आयोजन रावसाहेब थोरात सभागृहात करण्यात आले. या व्याख्यानमालेचे पहिले पुष्प होलानी यांनी ‘पाणी एक लढा’ या विषयावर गुंफले. जागतिक स्तरावर निर्माण होणारी पाण्याशी संबंधित समस्या, त्यामागील कारणे आणि उपाययोजना यावर त्यांनी चर्चा केली. पृथ्वीवरील एकूण पाणीसाठ्यापैकी मानवी जीवनसृष्टीसाठी वापराण्याजोगे असलेला पाणीसाठा आणि लोकसंख्या याबाबत विविध आलेखांच्या माध्यमातून होलानी यांनी उपस्थितांसमोर निरीक्षणे नोंदविली. व्याख्यानमालेच्या उद्घाटनाप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून मविप्रच्या सरचिटणीस नीलिमा पवार, नाना महाले, डॉ. तुषार शेवाळे, माणिकराव बोरस्ते, डॉ. सुनील ढिकले, भाऊसाहेब खताळे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना होलानी म्हणाले, कमीत-कमी पाण्यामध्ये जास्तीत जास्त पिके कशी घेता येतील त्याचप्रमाणे पाण्याचा कमी वापर केल्यास शेतीचीही उत्पादन सुधारण्यास मदत होईल, असे ते म्हणाले. यावेळी त्यांनी १९६२ साली भारतामध्ये तीन हजार क्युबिक लिटर प्रतिव्यक्ती पाणी उपलब्ध होत होते; मात्र ते २०१४ साली केवळ एक हजार १४५ क्युबिक लिटर प्रतिव्यक्ती इतके कमी झाले. एकूणच वाढत्या लोकसंख्या आणि पाण्याचे ढिसाळ व्यवस्थापनामुळे पाणीसाठा अपुरा पडू लागला असल्याचा निष्कर्ष त्यांनी यावेळी सांगितला. प्रास्ताविक प्राचार्य डॉ. व्ही. बी. गायकवाड यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. डी. पी. पवार यांनी केले व आभार प्रा. योगेशकुमार होले यांनी मानले.

टॅग्स :NashikनाशिकWaterपाणीeducationशैक्षणिक